…आणि माझा अहं अल्प झाला !

आतापर्यंत डॉ. आठवले यांनी सनातन संस्था स्थापन केली, अशी संस्थेची ओळख करून दिली जायची. आता सनातन संस्थेचे डॉ. आठवले, असे मला ओळखतात ! – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (३.६.२०१३))

मंदिरांतील पुजार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

मंदिरांतील पुजार्‍यांनी आपण देवाचे भक्त आहोत आणि मंदिरात येणार्‍यांना भक्ती करायला शिकवणे, ही आपली साधना आहे, या दृष्टीने आपल्या पुजारीपणाकडे पाहिले पाहिजे. असे केले, तरच समाजाला पुजारी आपले वाटतील आणि त्यांचीही प्रगती होईल. – डॉ. आठवले (२३.१.२०१४)

ईश्‍वर सर्वव्यापी असतांना फक्त स्वतःचा विचार करत गेल्याने मानवाची होत गेलेली परमावधीची अधोगती !

१. पूर्वी सर्व गाववाले एक असत. २. पुढे फक्त एकत्र कुटुंबातील सर्वजण एक असत. ३. आता एका कुटुंबातील पती-पत्नीही घटस्फोट घेतात आणि मुलेही आई-वडिलांना विचारत नाहीत ! या स्थितीत राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वांनी एकत्र येणे किती कठीण आहे, हे लक्षात येईल. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे साधना करून सर्वांबद्दल प्रीती निर्माण करणे. – … Read more

शांतीच्या लहरी संदर्भात स्पष्टीकरण

सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्‍या साधकांना आलेला अनुभव असतो. … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, अध्यात्मात बुद्धीला महत्त्व नाही, तर बुद्धीलयाला महत्त्व आहे, हे प्राथमिक तत्त्व समजून घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी बालवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना वय पहातात. अध्यात्मात वयानुसार नाही, तर पात्रतेनुसार शिक्षण मिळते, उदा कु. वैभवी भोवर (वय १६ वर्षे), सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ५१ वर्षे) आणि डॉ. अजय जोशी (वय ५८ वर्षे) हे आज एकाच दिवशी ६१ टक्के पातळीचे झाले. एवढेच नव्हे, तर शाळेत कधीही न गेलेला अन् शारीरिकदृष्ट्या अपंग … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःचे हसे करून घेऊ नका !

एखाद्या वैद्याने संगणकाबद्दल किंवा भूगर्भशास्त्राबद्दल बोलणे किंवा जमिनीने हिमालयाची उंची मोजणे जसे हास्यास्पद होईल, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी अध्यात्माबद्दल बोलणे हास्यास्पद होते ! – डॉ. आठवले (३१.८.२०१३)

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःचा अहं वाढू देऊ नका !

अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना अहंभाव नसतो. त्यामुळे त्यांची बुद्धी विश्‍वबुद्धीशी एकरूप होऊन त्यांना स्थूल आणि सूक्ष्म, म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना समजणारे आणि त्यांच्या पलिकडील अशा दोन्ही प्रकारचे ज्ञान होते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मला सर्व कळते हा अहंभाव असतो. त्यामुळे त्यांना एका विषयाचेही परिपूर्ण ज्ञान नसते. या अहंभावामुळेच त्यांची अधोगती होते. – डॉ. आठवले (३१.८.२०१३)

सौंदर्य वर्धनालयात (ब्युटीपार्लरमध्ये) जाणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

१. सौंदर्य वर्धनालयात जाणे म्हणजे स्थूलदेहात अडकणे आणि दुसर्‍यांनी आपल्याला सुंदर म्हणावे, अशी बहिर्मुखता निर्माण होणे २. मनोरुग्ण स्थूलदेहात अडकू नयेत; म्हणून मी माझ्या चिकित्सालयात Beautiparlour for Mind म्हणजे मनाचे सौंदर्य वर्धनालय असा फलक लावला होता. ३. उपचारामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले की, व्यक्तीचे स्वतःच्या चेहर्‍याकडे विशेष लक्ष जात नाही. ४. भावामुळे सौंदर्य … Read more

साधनेतील कठीणता

म्हातारपणी किंवा थकवा आल्यावर पाऊल उचलून उंबरठ्यावरून पुढे जाणे कठीण होते (हे मी अनुभवतो.), तर एकेका लोकात पावले टाकून पुढच्या पुढच्या लोकांत जाऊन सप्तलोकांच्या पलिकडे, म्हणजे निर्गुणात जाणे किती कठीण असेल ! – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२३.४.२०१३))

निराधार हिंदूंकडून साधना करवून घेणे, हाच त्यांच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

हल्लीचे बहुसंख्य धर्माचार्य मिरवणुका, पाद्यपूजा, सन्मान यांशिवाय काय करतात ? बहुतेक कीर्तनकार आणि प्रवचनकार केवळ कीर्तने आणि प्रवचने करतात. त्यामुळे कितीजण साधना करायला लागले, याचा ते विचारही करत नाहीत. मुसलमानांना मुल्ला-मौलवींचा आणि ख्रिस्तींना फादरचा आधार वाटतो. तसा हिंदूंना कोणाचाही आधार वाटत नाही. काही धर्माचार्यांचा हिंदूंना आधार वाटला असता; पण तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यांच्याहीबद्दल हिंदूंच्या मनात विकल्प … Read more