बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !

साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्‍वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शरीरशुद्धीला महत्त्व द्या !*

‘शरीर ही पहिली वास्तू आहे. प्रथम तिच्या शुद्धीचा विचार करावा, नंतर बांधलेल्या वास्तूचा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच वैयक्तिक गुणही महत्त्वाचे!

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे अधिक भयावह प्रदूषण !

‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे सर्वांत मोठे दोन दोष म्हणजे जिज्ञासेचा अभाव आणि ‘मला सर्व कळते’, हा अहंभाव !

‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पगार देणारी नोकरी आणि आनंद देणारी सेवा !

‘सनातन संस्थेमध्ये विद्यावाचस्पती (पीएच्.डी.), आधुनिक वैद्य, अभियंते यांसारखे उच्च विद्याविभूषित साधक त्यांची नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करत आहेत. नोकरीमध्ये त्यांना प्रतिदिन ८ – १० घंट्यांच्या कामासाठी प्रतिमास सहस्रो रुपये पगार मिळत होता. सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी हे साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात. याचे कारण हे की, त्यांना नोकरीच्या ठिकाणी … Read more

कर्मकांडाचे महत्त्व !

‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे ज्योतिषशास्त्र !

‘कुठे भविष्यात काय होणार, याचे एकाही व्यक्तीच्या संदर्भात सर्व तपासण्या करूनही सांगता न येणारे आणि निसर्गाच्या संदर्भात केवळ ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे केवळ निसर्गाचेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे भविष्य जन्मकुंडली आणि नाडीपट्ट्या अन् संहिता यांच्या आधारे सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांपेक्षा ‘मला दिसत नाही’, असे प्रांजळपणे कबूल करणारा श्रेष्ठ !

‘मोतीबिंदू झालेल्याला बारीक अक्षर दिसत नाही. कुणी ते बारीक अक्षर वाचून दाखवले, तर मोतीबिंदू झालेला त्याला ‘तेथे अक्षर आहे’, असे तुम्ही खोटेच भासवता आहात’, असे म्हणत नाही. तो म्हणतो, ‘मला बारीक अक्षरे दिसत नाहीत.’ त्याने चष्मा लावल्यावर त्याला बारीक अक्षर वाचता येते. याउलट बुद्धीप्रामाण्यवादी त्यांना मान्य नसणारे ‘सर्व खोटे आहे’, असे म्हणतात. ‘साधनेने सूक्ष्म दृष्टी … Read more