समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय सांगता येत नाहीत. … Read more

‘अध्यात्मात ज्ञानयोगानुसार
‘चूक व बरोबर’ असे काही नसते.’

१. मानसिक स्तर: ‘बरोबर असले की आनंद होतो. चूक झाली असता, ती का झाली याचे शास्त्र कळले की तेव्हाही आनंद होतो. आनंद म्हणजे सत्य व सत्य म्हणजेच बरोबर. – सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी आश्रम, गोवा. २. आध्यात्मिक स्तर : ज्ञानयोगानुसार सर्वत्र फक्त ब्रह्मच असल्याने त्यात ‘चूक व बरोबर’ असे काही नसते – डॉ. आठवले (८.७.२००७)

अध्यात्मात ‘बुद्धीप्रमाण’ हा शब्दच नसणे

‘मनाने मनन केले जाते. चित्ताने चिंतन केले जाते, तर बुद्धीने निर्णय घेतले जातात. अध्यात्मात शास्त्रप्रमाण हा शब्द आहे; पण प्रत्येकाची बुद्धी निराळी असल्याने ‘बुद्धीप्रमाण’ हा शब्दच नाही !’ अर्थ : बुद्धी निर्णय घ्यायचे कार्य करते. ‘बुद्धी’ हा शब्द ‘अहं’शी संबंधित असतो आणि ‘अहं’ हा आध्यात्मिक उन्नतीला घातक असल्याने त्याला अध्यात्मात शून्य टक्के महत्त्व आहे.’ – … Read more

अध्यात्माचा अभ्यास करण्यात शब्दांना असलेली मर्यादा

‘अध्यात्मात जास्तीतजास्त ५० टक्के एवढेच ज्ञान शब्दांत मिळू शकते. त्यापुढचे सर्व ज्ञान अनुभूतींनीच मिळते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. १. जिथे साखरेची गोडी शब्दांत सांगता येत नाही, ती अनुभवावीच लागते, तिथे चांगल्या आणि वाईट शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती इत्यादी आध्यात्मिक परिभाषेतील शब्दांचा अर्थ शब्दांत कसा सांगता येईल ? २. लांबी, रुंदी, उंचीआणि काळ … Read more

अंतर्मनात अखंड नामजप चालू असल्याची लक्षणे

‘अंतर्मनात अखंड नामजप चालू आहे कि नाही, हे समजण्याच्या खुणा म्हणजे झोपेतून जाग आल्यावर नामजप चालू असल्यास ते अनुभवणे, संभाषण संपल्यावर नामजप चालू होणे, आपले काम चालू असतांना मधे मधे नामजपाची आठवण होणे इत्यादी.’ – डॉ. आठवले (२१.६.२००७)

नाम श्‍वासाला जोडण्यातील फायदे

हल्ली (अयोग्य विचारांमुळे) वायूमंडल बिघडलेले असल्यामुळे श्‍वासाबरोबर बिघडलेले (दूषित) विचारही मनात येतात आणि मनोविकार होतात. तसेच इतर विचारही मनात येतात. श्‍वासाबरोबर नामजप करतांना इतर विचारांचे प्रमाण अल्प होते आणि त्यामुळे विशिष्ट प्रकारचा अनुभव आल्याचे जिवास भासते. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

जमीनको आधार नहीं, आसमानको कबर नहीं, इन्सानको सबूर नहीं ।

भावार्थ : ‘इन्सानको सबूर नहीं’ म्हणजे व्यावहारिक अर्थाने फुरसत नाही, वेळ नाही आणि आध्यात्मिक अर्थाने आयुष्य इतके लवकर निघून जाते की, साधना करायला वेळच मिळत नाही. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

श्‍वास आणि नाम : नाम श्‍वासाला जोडणे

भावार्थ : आपण श्‍वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्‍वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्‍वासाला जोडायचे असते. श्‍वास नामाला जोडायचा नसतो. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

फकीरकी लकीर और लकीरका फकीर ।

भावार्थ : ‘फकीरकी लकीर’ म्हणजे फकीराची ललकारी, म्हणजे शिष्य. हाच पुढे ‘लकीरका फकीर’ म्हणजे ‘शिष्याचा गुरु’ होतो. लकीर (ललकारी) आणि फकीर यांच्यात जसे अद्वैत असते, तसेच पुढे गुरु-शिष्यात अद्वैत होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

सद्‍गुरुनाथा तू अपराधी । तुझेच अपराध घे पदरात ।।

भावार्थ : सद्‍गुरूंना शिष्याने एकदा सर्वस्व अर्पण केले की, शिष्याचे स्वतःचे असे काही उरत नाही; म्हणून अशा शिष्याच्या शरिराने किंवा मनाने काही चुका झाल्या, तर त्या एकप्रकारे गुरूंच्याच ठरतात ! गुरुच अपराधी ठरतात ! – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज