कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी अहंनिर्मूलनासाठी भक्तीयोग अधिक साहाय्यक !

‘साधना करतांना अहंनिर्मूलन होणे आवश्यक असते; पण ज्ञानयोग, कर्मयोग आणि हठयोग या मार्गांनी साधना करतांना अहंनिर्मूलन करणे, फार थोड्या जणांना जमते. त्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करतांना अहंनिर्मूलन लवकर आणि सहजतेने होते. आजवर अनेक ज्ञानयोगी संत होऊन गेले; परंतु त्यांनीही कोणत्या तरी देवतेची अथवा त्यांच्या गुरूंची भक्ती केली. त्यामुळे अन्य साधनामार्गांनी साधना करणार्‍यांनी समवेत भक्तीयोगानुसारही काही … Read more

साधनेला आरंभ करतांना आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?

‘साधनेला आरंभ केल्यावर काहीजण उत्सुकतेपोटी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करू लागतात. त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, साधनेला दिशा मिळेल, प्रोत्साहन मिळेल असे ग्रंथ वाचावे. त्याच प्रमाणे हे ग्रंथ केवळ वाचण्यासाठी न वाचता त्यांचा अभ्यास करावा आणि त्यानुसार साधनेला आरंभ करावा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व !

‘साधकांनो, अध्यात्मात काहीतरी पुढच्या टप्प्याचे शिकायचे आहे’, असे वाटत असेल, तर तुम्ही १ – २ आठवडे किंवा तुम्हाला आवश्यक तितके दिवस आश्रमात रहायला या; कारण ‘अध्यात्म’ घरी राहून शिकता येत नाही. पूर्वी साधू-संतांचे आश्रम असायचे. तिकडे सर्वजण शिकायला जात असत. तसेच तुम्ही सनातनच्या आश्रमांत येऊ शकता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भित्रेपणा’ वर केवळ ‘साधना करणे’, हाच उपाय !

‘भित्रेपणा’ हा मूलतः स्वतःबद्दलच्या विचारांची तीव्रता अधिक असल्यामुळे येत असतो, म्हणजेच साधकत्वाच्या अभावामुळे येत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी कितीही मानसोपचार केले, तरी अपेक्षित लाभ होत नाही. त्यावर ‘मी’पणा कमी करणारी साधना करणे’, हाच खरा उपाय आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवाकडे कधी काही मागू नये !

‘देवाला ‘प्रत्येक जीव माझ्याकडे परत जावा’, याची तळमळ अधिक असते. त्यासाठी तो प्रत्येक जिवाला आवश्यक ते वेळोवेळी देतच असतो. त्यामुळे आपण देवाकडे कधी काही मागण्याची आवश्यकताच उरत नाही. अशा परिस्थितीमध्ये देवाकडे काही मायेतील गोष्टी मागणे, ही एक स्वेच्छा होते. साधना करतांना मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवाला प्रार्थना करणे, हा केवळ ईश्वरावरील श्रद्धा वाढण्यासाठीचा साधनेतील एक टप्पा … Read more

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्‍चय प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक !

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या. त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा मनाचा निश्‍चय करून त्यासाठी प्रत्येक हिंदूने लढाऊ वृत्तीने आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more

कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य !

‘भक्तीयोगानुसार साधना करणारा नामजपाच्या माध्यमातून अखंड साधना करू शकतो; कारण देवाचा नामजप करण्यासाठी त्याला स्थळ, काळ यांसारख्या घटकांची मर्यादा नसते. ज्ञानयोगी वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन करू शकतो, कर्मयोगी असेल त्या परिस्थितीत अपेक्षारहित राहू शकतो, हठयोगी केवळ श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून अखंड साधनारत राहू शकतो. अशा प्रकारे कोणत्याही मार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य … Read more

मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

खरा ब्राह्मण !

ईश्वरप्राप्तीची तळमळ असणाराच खरा ब्राह्मण होय ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शिक्षणासोबतच वैयक्तिक गुणांनाही नोकरीत महत्त्व !

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले