‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !

‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात. प्रार्थनेच्या माध्यमातून देवाची अनुभूती आल्यावर त्यांचा देवाप्रती थोडाफार भाव निर्माण होतो. ते या टप्प्याला केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करतात. त्यापुढे गेल्यावर म्हणजेच संत झाल्यावर ‘सर्वकाही ईश्वरइच्छेने होते’, हे लक्षात घेऊन मग पुन्हा प्रार्थना करत नाहीत. … Read more

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते. यासाठी पूजेसारख्या कृती नामजप करत कराव्यात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्‍हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्‍या मनातील विचारांचाही आपल्‍या अवतीभवतीच्‍या परिसरावर परिणाम होत असतो, उदा. एखादी गृहिणी स्‍वयंपाक करत असेल, तर तिच्‍या मनातील विचारांचा परिणाम त्‍या पदार्थांवर होतो. चांगले विचार असतील, तर चांगला परिणाम होतो आणि अयोग्‍य विचार असल्‍यास त्‍याचा नकारात्‍मक परिणाम होतो. याच कारणास्‍तव स्‍वयंपाक … Read more

साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !

‘साधना करतांना ‘सर्वस्वाचा त्याग’, हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. यासाठी काही वेळा काही साधकांकडून इतरांचे ऐकून भावनेपोटी कृती केली जाते. त्यामुळे अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. कधी साधक सर्वस्वाचा त्याग करतांना त्यामध्ये ‘मला हे पाहिजे.’, यांसारख्या विचारांनी कृती करत असल्यास त्यामध्ये स्वार्थ असतो. त्यामुळे केलेल्या कृतीसाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभत नाही. परिणामी अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. हीच … Read more

मनोविकारांचे मूळ कारण स्वेच्छा होय !

‘स्वतःच्या इच्छेप्रमाणे झाले नाही, की मानसिक ताण वाढून पुढे अनेकविध मनोविकार होतात. त्यावर हल्लीचे मनोविकार तज्ञ विविध उपाय सांगतात; पण कोणीही ‘स्वेच्छाच नको’, असे शिकवत नाहीत. त्यामुळे जगभर अशा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वस्वाचा त्याग केलेल्या ऋषी-मुनी आणि संत यांना कधीच मनोविकार झाला नाही. याउलट ते नेहमी सत्-चित् आनंदात असायचे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना करतांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व !

‘अध्यात्मशास्त्र म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या संदर्भातील तात्त्विक माहिती, तर साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या कृती. त्यामुळे काही जणांना प्रश्न पडतो की, ‘प्रत्यक्ष कृती करणे, म्हणजे साधना करणे महत्त्वाचे असतांना अध्यात्मशास्त्र किती महत्त्वाचे असते?’ त्याचे उत्तर म्हणजे, साधना करतांना ईश्वरप्राप्तीच्या टप्प्याला जाईपर्यंत साधकाला अनेक अनुभूती येतात. या अनुभूतींबद्दल त्या साधकाला अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर, म्हणजे त्याच्या … Read more

बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !

साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्‍वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होऊ नये; म्हणून कधी कुणाकडे काही मागू नका !

‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! दोन व्यक्तींमधील ‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे, एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीकडून काहीतरी मागून घेणे. अशा मागण्यामुळे आपण इतरांचे देणेकरी होतो. त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी. असे असले … Read more

स्थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले