देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !

‘आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न हे प्रामुख्याने मनाच्या स्तरावर करायचे असतात. त्यामुळे ते जिवंत असतांना आणि देहत्याग केल्यावरही करायचेच असतात. जिवंत असतांना मनावर साधनेचा संस्कार केला, उदा. सतत नामजप करणे, तरच देहत्याग केल्यावरही साधना करणे शक्य होते, अन्यथा ते अशक्य होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वयोमानानुसार सुखाच्या संदर्भातील विचारसरणीमध्ये होणारा पालट

‘व्यक्ती तरुणपणात विचार करते की, ‘बरे झाले, आपण अजून तरुण आहोत. विविध प्रकारचे सुख अनुभवता येईल.’ हीच व्यक्ती पुढे म्हातारपणी विचार करते की, ‘बरे झाले, आता काही करता येत नाही. आपल्याला या मायेतून लवकर सुटता येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !

‘मला नमस्कार करा’, असे साधकांना सांगण्यापेक्षा ‘तुम्ही कोणती साधना करणे योग्य आहे ?’, हे सांगणे महत्त्वाचे आहे; म्हणून मी साधकांना केवळ साधनाच सांगितली, कुणालाही ‘मला नमस्कार करा’, असे सांगितलेले नाही. त्यामुळे सनातनच्या बहुसंख्य साधकांनी मला कधी नमस्कारही केलेला नाही. ते देवालाच नमस्कार करतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !

‘हनुमंतानें व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

‘पैसे कमवणे आणि ते वापरणे, हे करतांनाही साधना होणे आवश्यक असते. कर्तव्य म्हणून सत्मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. मिळवलेले पैसे वापरतांनाही सुखाची आसक्ती न बाळगता मिळालेल्या सुखात समाधानी रहाणे योग्य ठरते. आर्थिक व्यवहार करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक अल्प करणे, हीच खरी साधना होय … Read more

खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सनातन करत असलेले शेकडो यज्ञ आणि ग्रंथप्रकाशने यांचा मूळ उद्देश ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा असला, तरी त्यातून प्रथम एक ‘आदर्श राष्ट्र’ निर्माण होईल आणि त्यानंतर कालांतराने खऱ्या अर्थाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही वेळ आहे !

‘रामसेतु बांधणे चालू असतांना खारही त्यामध्ये सहभागी झाली होती. ती वाळूत लोळून तिच्या अंगाला चिकटलेली वाळू सेतूवर अंग झटकून पसरवत होती. रामकार्यामध्ये इतक्या लहान जिवानेही अशा प्रकारे सहभाग घेतला होता आणि श्रीरामाने तिचाही उद्धार केला होता. आता पुन्हा आपल्याला रामराज्य आणायचे आहे. त्या खारीचा आदर्श घेऊन आपणही या कार्यात आपल्या परीने सहभागी होणे आवश्यक आहे.’ … Read more

व्यवहारापेक्षा परमार्थ सोपा !

‘व्यवहारामध्ये संपत्ती आणि मानसन्मान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याउलट साधना करतांना स्वतःचे तन, मन आणि धन हे केवळ अर्पण करायचे असते. काही तरी मिळवण्यापेक्षा देणे सोपे असते. त्यामुळे व्यवहारापेक्षा परमार्थ हा सोपा असतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ अध्यात्माचा अभ्यास करण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करा !

‘अध्यात्म’ म्हणजे आत्म्याचे स्वरूप सांगणारे शास्त्र ! हे शास्त्र अनादी अनंत आहे. त्यामुळे त्याचा कितीही अभ्यास केला, तरी तो कमीच असतो. प्रत्यक्षात हे केवळ शब्दजन्य ज्ञान असल्यामुळे त्यातून केवळ आत्मा, ईश्वर, त्याचे कार्य करण्याची पद्धत यांसारख्या विषयांची तात्त्विक माहिती मिळते. त्याचा मूळ ईश्वरप्राप्तीसाठी खूप लाभ होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष साधना करणेच आवश्यक असते.’ – सच्चिदानंद … Read more

झाड बहरण्यासाठी मुळांना पाणी घालतो, तसे व्यक्तीमत्त्व सुधारण्यासाठी अंतर्मनाला सूचना द्या !

‘जसे आपण झाडाची पाने चांगली दिसतात; म्हणून त्यांना पाणी न घालता, झाडाच्या मुळांनाच पाणी घालतो. त्याचप्रकारे स्वतःच्या व्यक्तीमत्त्वामध्ये पालट करण्यासाठी केवळ बाह्यमन आणि बुद्धी यांना न सांगता अंतर्मनाला सूचना देणे आवश्यक असते. अंतर्मनाला सूचना देण्याची पद्धत सनातन सांगत असलेल्या ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिये’त शिकवली जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले