राजकारण आणि अध्यात्म यांतील भेद

१. राजकारणातील क्षणभंगुरता अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्‍या व्यक्तीला दायित्व … Read more

ज्ञान आणि अज्ञान यांतील भेद

‘जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे. जे मायेत अडकवते, जे अशाश्वताविषयी सांगते आणि जे अहंकार जोपासते ते ‘अज्ञान’ आहे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१२.९.२०१७)

देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवण्याचे महत्त्व !

अ. साधकांनी ‘स्वतःकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया होत नाही’, असा विचार करत रहाण्यापेक्षा देवाशी अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘देवाशी असलेले अनुसंधानाचे विचारच साधकाला मोक्षापर्यंत नेतात; म्हणून देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवून प्रत्येक कृती करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’ आ. ‘प्रत्येक प्रसंगात समोरच्या व्यक्तीला छान (योग्य शब्दांत) उत्तर देणे’, ही … Read more

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम प्रत्येक गोष्टीला लागू पडतो; म्हणून कोणत्याच गोष्टीत अडकू नये

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम प्रत्येक गोष्टीला लागू पडतो; म्हणून कोणत्याच गोष्टीत अडकू नये. कोणतीच गोष्ट ‘माझी, माझी’ म्हणू नये. ‘ती एक दिवस नष्ट होणार’, हे ओळखून असावे. मनाला अशा पद्धतीने समजावले, तर मन कोणत्याच गोष्टीत अडकत नाही. मनाला विषयापासून दूर नेल्यावर आपोआपच मनुष्याची त्या त्या गोष्टीतील आसक्ती संपते आणि जीवनात ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रगती … Read more

सनातन संस्था आणि हिंदु राष्ट्र यांचा परस्परसंबंध !

सनातन संस्था म्हणजे केवळ एक संस्था नसून तेथे हिंदु राष्ट्राचे (ईश्वरी राज्याचे) प्रत्यक्ष वातावरण आहे. हे वातावरणच पुढे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची निर्मिती करणार आहे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्याचे महत्त्व !

गुरुमुखातून आलेले शब्द नादरूपाने आकाशमंडलात रहातात. गुरूंचे हे चैतन्यमय शब्द प्रत्यक्षात उतरवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अध्यात्मात गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे, तरच आपली प्रगती होते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते

देवाप्रती भाव असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर ठेवतो. भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते आणि आपल्याला साधनेत पुढे नेते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते

‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते !

एखादी कृती किंवा घटना यांना काळानुसार आपण ‘देवाची लीला’ म्हणू शकतो. साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते. जीवनात दुःख आले, तरी साधकाला ती भगवंताची एक लीलाच वाटते; परंतु सामान्य माणसाला मात्र तीच गोष्ट दुःख देऊन जाते. श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो !

‘खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)