भक्त भगवान होतो कि दोघे विभक्तच रहातात ?

‘भक्ती हा अहंकार तोडण्याचा विधी, अभ्यास आहे; परंतु भक्तीमार्गांत द्वैत ठेवण्याची प्रथा आहे म्हणजे ‘भक्त नेहमी परमेश्‍वराच्या पायाशीच शरण असला पाहिजे’, असे सांगतात. याचे कारण अज्ञानी भक्ताला सांगितले की, तू भगवानच आहेस, तर त्याचा अहंकार वाढेल. प्रत्यक्षात मात्र भक्त भगवान होतो. भक्त असतांना तो अव्यक्त भगवानच असतो; परंतु भक्ताला ‘तू भगवान होऊच शकत नाहीस’, अशी … Read more

‘मी’पण नष्ट होणार असल्याने भगवंताशी एकरूप होण्याचे भय वाटणे

‘स्वतःचे ‘मी’पण नाहीसे करणे सर्वांत कठीण असते. कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत लिहिले आहे, ‘मी जन्मोजन्मी भगवंताचा शोध घेत होतो. एकदा भगवंताच्या दारी पोचलो. दार ठोठावणार इतक्यात घाबरलो; कारण भगवंताला भेटल्यानंतर माझा ‘मी’पणा नाहीसा होईल. मीच उरणार नाही तेव्हापासून मी भगवंताचा पत्ता ठाऊक असूनही ‘भगवंत नाही’, अशा ठिकाणी भगवंताचा शोध घेत भटकत असतो.’ – … Read more

ऋषींच्या सांगण्याप्रमाणे देह उभा चिरून देत असतांना त्याग सत्कारणी लागल्याने राजाच्या डोळ्यांत आनंदाश्रू येणे

‘एक राजा त्यागासाठी प्रसिद्ध होता. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी एक ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझे शरीर उभे चिरून त्यातील उभा भाग मला दे; परंतु तू खरा त्यागी असशील, तर तुझ्या डोळ्यांत दुःखाश्रू येता कामा नयेत.’’ राजाचे शरीर उभे चिरण्यास आरंभ झाला. तेव्हा राजाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझा त्याग … Read more

तथाकथित पुरोगाम्यांनो, देवावरील विश्‍वास, कुटुंबव्यवस्था आणि संत यांच्यामुळेच समाज टिकून आहे, हे लक्षात घ्या !

भारतात भयानक परिस्थिती असूनही पाश्‍चात्त्यांच्या तुलनेने मानसिक तणाव आणि मानसिक विकृती यांचे प्रमाण फार अल्प का आहे ? भारतात इतर देशांप्रमाणे यादवी होऊन राजसत्ता उलथून का टाकली जात नाही ? ३. हिंदूंच्या देवावरील विश्‍वासामुळे हिंदूंना धनदांडग्यांचा हेवा वाटण्याचे प्रमाण न्यून असणे : हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते धर्माचरण करत नसले, तरी मध्यमवर्गियांचा आणि विशेषतः खेडेगावातल्या बहुसंख्य … Read more

नैवेद्याची चव घेऊन मग तो कालीमातेला दाखवणारे रामकृष्ण !

रामकृष्ण हे कालीमातेचे भक्त होते. कालीमातेला नैवेद्य दाखवतांना ते नेहमी जेवण चाखून मगच दाखवत असत. लोकांनी याचे कारण त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, आई आपल्या मुलाला जेवण द्यायच्या आधी स्वतः त्याची चव घेते. त्यातील तिखट आणि मीठ यांचे प्रमाण बघते आणि मगच मुलाला देते. मग मी कालीमातेचा नैवेद्य आधी का चाखून पाहू नये ? – … Read more

अकर्मकर्माचे उदाहरण : संपूर्ण विरक्त असल्याने अनेक स्त्रियांचा पती असलेल्या कृष्णाने आपले ब्रह्मचारित्व आणि फळे खाऊनही ऋषींनी आपले निराहारित्व टिकवणे

वैराग्य दाखवण्यापेक्षा मनातील वैराग्य हे अधिक महत्त्वाचे असते. सर्व गोष्टींचा संपूर्ण उपभोग घेत असूनही श्रीकृष्ण मनातून पूर्णतः विरक्त होता. एकदा यमुनेला पूर आलेला होता. यमुनेच्या पलीकडे आलेल्या निराहारी तपस्वी मुनींना भेट म्हणून कृष्णाने आपल्या मित्राला फळे घेऊन जाण्यास सांगितले. मित्राने विचारले, यमुनेला तर पूर आलेला आहे. एकही नावाडी आपली होडी सोडावयास तयार नाही. मग मी … Read more

एकत्र कुटुंबपद्धतीमुळे भारतामध्ये आपत्काळात केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मनोधैर्य ढासळणे, तर पाश्‍चात्त्य देशांत ३० ते ४० टक्के एवढ्या जणांचे मनोधैर्य ढासळणे

त्सुनामी झाली, तरी तामिळनाडूचा समुद्रकिनारा आणि अंदमान-निकोबार येथील उद्ध्वस्त कुटुंबे केवळ त्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे, तसेच नातेवाईक आणि जातभाई यांच्याकडून मिळालेल्या आश्‍वासक साहाय्यामुळे स्वतःला सावरू शकली. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये लातूर आणि ख्रिस्ताब्द २००० मध्ये भूज येथे झालेल्या भूकंपांत कुटुंब, तसेच नातेवाईक यांच्याशी असलेल्या संबंधामुळे लोक सावरू शकले. केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मानसिक स्थैर्य ढासळले. याउलट पाश्‍चात्त्य … Read more

हिंंदु संस्कृतीची वैशिष्ट्ये

१. हिंदु संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी नवीन पिढीवरील संस्कार महत्त्वाचे ! : प्रत्येक देशाचे अस्तित्व म्हणजेच त्या देशाची जीवनप्रणाली आणि संस्कृती यांचे अस्तित्व. ही संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी नवीन पिढीवर जन्मापासून केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात. २. हिंदु संस्कृतीनुसार विवाह हा करार नसून ईश्वराने निर्माण केलेला संस्कार असणे : आपली संस्कृती ४ आश्रम, १६ संस्कार, पंचयज्ञ आणि सनातन … Read more

भीक आणि भिक्षा यांमधील भेद

१. भिक्षा मागण्याचे लाभ : सनातन धर्मात ब्रह्मचारी आणि संन्यासी यांनी काही ठराविक घरांतून भिक्षा मागून अन्न खावे, असे सांगितले आहे. २. ब्रह्मचर्याश्रम : गुरुकुलात रहाणारी काही मुले श्रीमंत घरांतील असतात आणि त्यांचे पालक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतात; पण राजा असो वा रंक प्रत्येकाने भिक्षा, म्हणजेच माधुकरी मागून पोट भरावे, असा गुरुकुलाचा नियम असल्यामुळेे … Read more

सिंहाने प्राणी किंवा माणसाला मारणे आणि मनुष्याने प्राणीहत्या करणे यांतील भेद

कोणत्याही कर्मामागील हेतू काय असेल, त्यानुसार फळ मिळते. सिंहाला ज्या वेळी भूक लागते, त्या वेळी तो प्राण्यांना मारून पोट भरतो. तो माणसालाही मारू शकतो. ही नैसर्गिक क्रिया असल्याने येथे पाप-पुण्याचा प्रश्न येत नाही. मनुष्य स्वतःला शिकारीचे आणि मांस खाण्याचे सुख मिळावे; म्हणून तो प्राण्यांची हत्या करतो. तसेच द्वेष, लोभ, मत्सर, सूड घेणे इत्यादींसाठी एक मनुष्य … Read more