कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण करणे आवश्यक !

श्रीकृष्ण माझ्या रूपात अनुभूती देतो. साधकांना वाटते, प.पू. डॉक्टरांमुळे अनुभूती आल्या. यातून शिकण्यासारखे हे की, श्रीकृष्णाने अनुभूती दिल्या, तरी तो कर्तेपण मला देतो. साधकांनीही हे लक्षात ठेवून प्रत्येक कृतीचे कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण केले पाहिजे. – डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२२.५.२०१३))

निराधार हिंदूंकडून साधना करवून घेणे, हाच त्यांच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

हल्लीचे बहुसंख्य धर्माचार्य मिरवणुका, पाद्यपूजा, सन्मान यांशिवाय काय करतात ? बहुतेक कीर्तनकार आणि प्रवचनकार केवळ कीर्तने आणि प्रवचने करतात. त्यामुळे कितीजण साधना करायला लागले, याचा ते विचारही करत नाहीत. मुसलमानांना मुल्ला-मौलवींचा आणि ख्रिस्तींना फादरचा आधार वाटतो. तसा हिंदूंना कोणाचाही आधार वाटत नाही. काही धर्माचार्यांचा हिंदूंना आधार वाटला असता; पण तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यांच्याहीबद्दल हिंदूंच्या मनात विकल्प … Read more

विज्ञानाचे थिटेपण आणि साधनेचे महत्त्व

विज्ञानाला कोणत्याही गोष्टीच्या कार्यकारणभावातील फक्त वरवरचा आणि वर्तमानकाळातील, म्हणजे फारतर १ लक्षांश एवढाच भाग कळतो. याचे कारण हे की, विज्ञानाला आधीचे जन्म, प्रारब्ध इत्यादी काही ज्ञात नसते. त्यामुळे विज्ञानाने सांगितलेली उपाययोजना फारच वरवरची असते. ती मुळापर्यंत जाऊन उपाय करू शकत नाही. एखाद्याला क्षयरोगामुळे खोकला येत असला, तर त्याला केवळ खोकल्याचे औषध देणे जितके हास्यास्पद ठरेल, … Read more

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात तळमळ अत्यावश्यक !

हिंदु जनजागृती समितीतर्फे दुसरे अखिल भारतीय हिंदु अधिवेशन रामनाथी, गोवा येथे ६ ते १० जून २०१३ या काळात आयोजित करण्यात आले होते. त्यांतील बहुतेक प्रतिनिधी साधना करणारे किंवा वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करणारे नव्हते, तरीही त्यांचा उत्साह आणि एकमेकांबद्दलचा प्रेमभाव भरभरून वहात होता. त्यामुळे अधिवेशनात उत्साह वाटत होता. याउलट अधिवेशनासाठी उत्तर भारतातून आलेल्या सनातन संस्थेच्या … Read more

मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असणे

काही जणांना वनस्पती, पशू-पक्षी, इतकेच काय, तर निर्जीव वस्तूही काय बोलतात, हे कळते. ते आयुष्यभर त्यातच रममाण होतात. हा झाला सिद्धीचा एक प्रकार. मायेतील स्थुलातील कळणे जसे ईश्‍वरप्राप्तीच्या संदर्भात निरर्थक असते, तसेच मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असते. – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (२१.४.२०१३))

सांप्रदायिक साधनेने जलद प्रगती न होण्याचे कारण

व्हिटामिन ए, बी, सी, डी यांपैकी, तसेच लोह, कॅल्शियम इत्यादी धातूंपैकी जे कमी असेल, ते घ्यायला आधुनिक वैद्य (डॉक्टर) सांगतात. तसेच ज्या देवतेचे तत्त्व कमी असेल किंवा ज्या साधनामार्गाने साधना करणे आवश्यक असेल, त्यानुसार उपासना करायची असते. हे ज्ञात नसल्याने सांप्रदायिक साधना करणारे सर्वजण एकच उपासना करतात. असे करणे हे एखाद्या आधुनिक वैद्यांनी सर्व रुग्णांना … Read more

स्थुलातून पूजा, साष्टांग नमस्कार इत्यादी कृती करण्यापेक्षा त्या मनाने केल्यास अधिक लाभ होणे

याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. स्थुलातून कृती करत असतांना देहाकडेही लक्ष द्यावे लागते. त्याच कृती मनाने करतांना तसे लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे त्या कृती एकाग्रतेने आणि भावपूर्ण करणे सुलभ होते. २. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे. सूक्ष्मतम ईश्‍वराकडे जाण्यासाठी साधना सूक्ष्मातून करणे अधिक महत्त्वाचे आहे. – डॉ. आठवले (वैशाख अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (८.६.२०१३))

साधकांनो, उपाय गांभीर्याने करा !

माझा महामृत्यूयोग, साधकांना होणारे त्रास, हिंदु राष्ट्राची स्थापना यांसंदर्भात विविध संतांनी सांगितलेले सर्व उपाय मी करतो. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष ८, कलियुग वर्ष ५११५ (१७.६.२०१३)

सात्त्विक छंद जोपासण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने तन-मन-धनाचा त्याग करणे म्हणजे साधना !

काही जणांना क्रिकेटचा, काही जणांना गाण्याचा, काही जणांना नृत्याचा, काही जणांना फिरायला बाहेरगावी जाण्याचा, असे विविध छंद असतात. त्याचप्रमाणे काही जणांना तीर्थक्षेत्री जाण्याचा, काही जणांना भजन, कीर्तन किंवा प्रवचन यांना जाण्याचा, तर काही जणांना संतांकडे जाण्याचा छंद असतो. आधीच्या छंदांपेक्षा हे छंद बरे असले, तरी त्याच्यामुळे होणारी एक हानी, म्हणजे आपण साधना करतो, या भ्रमात … Read more

समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे … Read more