शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा

मार्ग दाखवणारी

25 years of Sanatan Sanstha

सनातन संस्था

शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा

मार्ग दाखवणारी

25 years of Sanatan Sanstha

सनातन संस्था

आपल्या सर्वांचे सनातन संस्था मनापासून स्वागत करते. गेली 25 वर्षे सनातन संस्था एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अध्यात्माची आवड असलेल्यांना मार्गदर्शन आणि सनातन धर्माचे रक्षण करण्याचे कार्य करत आहे. अशांना व्यक्तिगत मार्गदर्शन, ऑनलाईन सत्संग, धर्मशिक्षण वर्ग या माध्यमातून कृती प्रवण करणे आणि अशा जिज्ञासूंसाठी पोषक वातावरण निर्माण करणे यासाठी सनातन संस्था समर्पित भावाने कार्य करत आहे. व्यवसायाने मनोचिकित्सक असणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने २२.३.१९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. सनातन संस्थेने ईश्वर आणि प.पू. भक्तराज महाराज यांची कृपा, विविध संत अन् शंकराचार्य यांचे आशीर्वाद, तसेच समाजाकडून मिळालेले प्रेम अन् पाठबळ यांमुळे २५ वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश !

‘ईश्वराला अवतार घेण्यास आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यास भाग पाडणारे साधक-भक्त सिद्ध करणे’, हे सनातन संस्थेचे मुख्य ध्येय आहे ! : ‘भगवान श्रीकृष्णाने ‘भक्तांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी मी पुनःपुन्हा अवतार घेईन’, असे वचन दिले आहे. ‘राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना श्रीकृष्णाने अवतार का घेतला नाही ?’, असा प्रश्न समाजाला पडला आहे. याचे उत्तर असे की, ‘भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेईल’, अशी भक्त प्रल्हादासारखी भक्ती आपल्यात नाही. आपण आपली साधना आणि भक्ती इतकी वाढवली पाहिजे की, भगवंत अवतार घेण्यास भाग पडेल. ‘भक्तीमध्ये शक्ती असते’, असे आपण नेहमी म्हणतो.’

– (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत बाळाजी आठवले

सनातन संस्थेच्या संपर्कात ग‍वसली आत्मोदयाची वाट

आपल्या अध्यात्मिक वाटचालीतील अनुभव शेअर करा !

सनातन संस्थेचे अद्वितीयत्व

गुरुकृपायोग

गुरुकृपायोग – आनंदप्राप्तीचा (मोक्षप्राप्तीचा) सर्वांत सोपा मार्ग

स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन

प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)

अहं-निर्मूलन

नामजप

भावजागृती

सत्संग

सत्सेवा

सत्साठी त्याग

स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन

अहं-निर्मूलन

नामजप

भावजागृती

सत्संग

सत्सेवा

सत्साठी त्याग

प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)

वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले. प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना एक प्रकारे ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचे अधिकारीच बनवले. वर्ष १९९४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या तीनही योगांचा संगम असलेल्या गुरुकृपायोगाची निर्मिती केली. गुरुकृपायोगानुसार सांगितलेली अष्टांग साधना करणारा प्रत्येक साधक ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या माध्यमांतून साधना करून अध्यात्मात प्रगती करतो. सनातनचे साधक साधना करून याची प्रचीती घेत असून अध्यात्मात प्रगती करत आहेत. २५ वर्षांच्या अल्प कालावधीत सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणार्‍या अनेक साधकांनी आध्यात्मिक प्रगती केली आहे, तर काहींनी संतपद आणि सद्गुरुपद प्राप्त केले आहे.

सनातन संस्थेचा वटवृक्ष

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वटवृक्षाप्रमाणे सहस्रो जीवांना आपल्या अध्यात्मिक छायेत घेतले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्वसामान्य सहस्रो जिवांना साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु म्हणून सिद्ध केले आहे अन् हीच सनातन संस्थेची खरी संपत्ती आहे.

परात्पर गुरु

(९० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक)

सद्गुरु

(८० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक)

संत

(७० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक)

साधक

(६१ टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक)

परात्पर गुरु

(९० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक)

सद्गुरु

(८० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक)

संत

(७० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले साधक)

साधक

(६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीगाठलेले साधक)

कलेच्या माध्यमातून साधना

‘चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य आणि स्थापत्य’, अशा विविध कलांमध्ये पारंगत असलेले साधक-कलाकार कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्या अनुषंगाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलांमध्ये निपुण असलेले साधक-कलाकार कलेमध्ये सात्त्विकता आणण्याच्या दृष्टीने संशोधन करत आहेत. त्यांत संगीत, शिल्पकला, चित्रकला, सात्त्विक मेंदी, सात्त्विक रांगोळी आणि नृत्यकला यांचा समावेश आहे.

संगीत

शिल्पकला

चित्रकला

सा‌त्त्विक मेंदी काढणे

सात्त्विक रांगोळी काढणे

नृत्यकला

संगीत

शिल्पकला

चित्रकला

सा‌त्त्विक मेंदी काढणे

सात्त्विक रांगोळी काढणे

नृत्यकला

सनातनची ग्रंथसंपदा

सनातन-निर्मित ग्रंथ अध्यात्माविषयी जिज्ञासा असणार्‍या लक्षावधी जिज्ञासूंचे मार्गदर्शक आहेत. हे ग्रंथ म्हणजे ‘दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याची प्रायोगिक माहिती देणारे दीपस्तंभ आहेत. सनातनची विविधांगी ग्रंथसंपदा जिज्ञासूंना समाधान देणारी आहे. या ग्रंथांमध्ये

अध्यात्मातील ‘का ? आणि कसे ?’, या प्रश्नांची उत्तरे मिळतात.
सरळ आणि सोप्या भाषेत माहिती आहे.
विषयाचे आकलन चांगल्या प्रकारे होण्यासाठी सूक्ष्म-ज्ञानावर आधारित चित्रे आणि विश्लेषणे आहेत.

जगाला सूक्ष्म-जगताची ओळख करून देणे

स्थूल जगतापेक्षा सूक्ष्म जगत् हे अधिक व्यापक आणि शक्तीशाली आहे. सूक्ष्म जगत् हे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या आकलनाच्या पलीकडे आहे. हे अदृश्य जग मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम करते. वर्ष १९८२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात या सूक्ष्म जगताविषयी प्रथम जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हापासून ते स्वतः याचा अभ्यास करतात आणि साधकांना सूक्ष्म ज्ञानाशी संबंधित विविध पैलुंवर मार्गदर्शन करतात जसे सूक्ष्मातील ज्ञान मिळवणे, सूक्ष्म परीक्षण करणे आणि सूक्ष्म ज्ञानावर आधारित चित्रे काढणे. सनातन आश्रमात या अदृश्य जगताचे दृश्य परिणाम दाखवणारे संग्रहालय आहे. सनातनच्या ग्रंथांमध्ये या सूक्ष्म-ज्ञानावर आधारित अमूल्य माहिती समाविष्ट आहे.

अध्यात्मिक संशोधन

सध्याच्या युगातील लोक वैज्ञानिक परिभाषेत म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाण, आकडेवारी यांवर विश्वास ठेवणारे आहेत. हे लक्षात घेऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्म आणि आध्यात्मिक करणांमुळे होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास विविध वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून केला. त्याला ते सूक्ष्म ज्ञानाची जोड देत. विविध वैज्ञानिक उपकरणे वापरून केलेल्या संशोधनामुळे देवतांची स्पंदने, सूक्ष्म-जगताचा स्थूल जगावर होणारा चांगला आणि वाईट परिणाम, तसेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर विविध अध्यात्मिक उपचारपद्धतींचा हाोणारा परिणाम इत्यादी असंख्य विषयांवर माहिती जमा झाली आहे.

आध्यात्मिक संग्रहालय

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची स्थापना करण्यात येत आहे. या संग्रहालयात आध्यात्मिक दृष्टीने अमूल्य व अद्वितीय अशा वस्तू, माती, पाणी, पंचमहाभूतांचा (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) परिणाम दर्शवणाऱ्या सहस्रो वस्तू, तसेच भारतातील विविध तीर्थक्षेत्रे, मंदिरे, संतांचे मठ, समाधी स्थाने आणि ऐतिहासिक स्थळे यांचे फोटो आणि १६ सहस्त्रांहून अधिक चलचित्रे (व्हिडीओ) यांचे जतन करण्यात येणार आहे. पुढील पिढ्यांना शिकण्यासाठी या सर्व दैवी आणि आध्यात्मिक शक्ती असलेल्या वस्तूंचे जतन व संग्रह हा अध्यात्मिक जगताच्या इतिहासातील एक नवीन अध्यायच असेल.

स्वयंउपचार पद्धती

मनुष्याच्या शारीरिक किंवा मानसिक त्रासांचे मूळ कारण हे बहुतांशी आध्यात्मात असते. त्यांतही सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वाईट शक्ती ! सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी या विषयावर सखोल संशोधन करून आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या अभिनव पद्धती शोधून काढल्या आहेत. या सहज-सोप्या उपचारपद्धती अत्यंत प्रभावी आहेत. सनातनचे ग्रंथ, संकेतस्थळ आणि सामजिक प्रसारमाध्यमे (सोशल मिडिया) यांद्वारे या उपचारपद्धती संपूर्ण समाजासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

व्यक्तीचा सर्वांगीण विकास

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्या लक्षात आले की, मनुष्याच्या जीवनात येणारी दुःखे आणि असमाधान यांचे कारण त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं आहेत. एक संमोहन-उपचारतज्ञ म्हणून त्यांनी मनुष्याचा व्यक्तीमत्त्व विकास आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी यांसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेतले. अशाप्रकारे त्यांनी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेला आरंभ करून ती विकसित केली. ही एक अग्रगण्य प्रकिया असून, ती सहस्रो लोकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यास साहाय्यभूत ठरली आहे. प्रतिदिन करायची ही प्रक्रिया सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासासाठी लाभदायक आहे.

दैवी बालकांची ओळख

गेल्या काही वर्षांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या निदर्शनास काही उत्तम गुणवैशिष्ट्ये असलेली असामान्य बालके आली, ज्यांचा जन्मतःच आध्यात्मिक स्तर उच्च आहे. या बालकांमध्ये अन्य गुणांसोबत अलौकिक बुद्धीमत्ता, सूक्ष्मातील कळण्याची अफाट क्षमता आणि भगवंतावरील दृढ श्रद्धा या गुणांचे आधिक्य आहे. गुरुदेवांनी केलेल्या आध्यात्मिक संशोधनावरून ही बालके उच्च लोकांतून जन्माला येत आहेत, हे समजले. दैवी बालकांचे महत्त्व आणि सध्याच्या काळात त्यांच्या जन्माचा उद्देश समजून घेण्यासाठी अशा सहस्रांहून अधिक बालकांचे आध्यात्मिक संशोधन चालू आहे.

सनातन आश्रम

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा मुख्य आश्रम ही एक आध्यात्मिक मरुभूमी आहे. आश्रम लोकांना अखंडित साधना करण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देते. आश्रमात अध्यात्माचे पुढच्या पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन केले जाते. आश्रमात साधकांना इतरांकडून शिकणे, स्वतःवर आध्यात्मिक उपचार करणे, आध्यात्मिक जीवन जगणे, तसेच स्वतःतील ईश्वरी अंशाची अनुभूती घेण्याची संधी प्राप्त होते. मोक्षप्राप्तीची तळमळ असणार्‍या जिवांसाठी सनातन आश्रम म्हणजे आधुनिक गुरुकुल आहे. जात, संप्रदाय, भाषा आणि अन्य भेद विसरून ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने एकत्रित आलेले सहस्रो साधक आश्रमात आनंदाने राहून खऱ्या अथार्न एक आध्यात्मिक जीवन जगतात.

मान्यवरांनी सनातन संस्थे‍विषयी व्यक्त केलेले अभिप्राय

गौरवोद्गार

सनातनचे कार्य

तणावमुक्त जीवनासाठी व्याख्याने

विनामूल्य ऑनलाइन साप्ताहिक सत्संग

विनामूल्य वैद्यकीय शिबिरे

मूल्य शिक्षण आणि बालसंस्कार वर्ग

सनातन-निर्मित ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन

हिंदु धर्मशिक्षण देणारी प्रवचने

शाश्वत आनंदप्राप्तीसाठी या कार्यात सहभागी व्हा !

तुमचे योगदान आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल !