‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !

‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात. प्रार्थनेच्या माध्यमातून देवाची अनुभूती आल्यावर त्यांचा देवाप्रती थोडाफार भाव निर्माण होतो. ते या टप्प्याला केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करतात. त्यापुढे गेल्यावर म्हणजेच संत झाल्यावर ‘सर्वकाही ईश्वरइच्छेने होते’, हे लक्षात घेऊन मग पुन्हा प्रार्थना करत नाहीत. … Read more

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते. यासाठी पूजेसारख्या कृती नामजप करत कराव्यात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा संस्कार होणे

साधकाची जसजशी आध्यात्मिक प्रगती होते, तसतसे त्याच्या जीवनातील सर्वकाही देवाशी जोडले जाऊ लागते. ‘देव एके देव’ एवढेच शेष रहाते. बहुतेक लोक विचारांच्या पातळीला बराच काळ रहातात. त्यांच्याकडून साधनेची कृती होत नाही. केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, … Read more

इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्‍हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्‍या मनातील विचारांचाही आपल्‍या अवतीभवतीच्‍या परिसरावर परिणाम होत असतो, उदा. एखादी गृहिणी स्‍वयंपाक करत असेल, तर तिच्‍या मनातील विचारांचा परिणाम त्‍या पदार्थांवर होतो. चांगले विचार असतील, तर चांगला परिणाम होतो आणि अयोग्‍य विचार असल्‍यास त्‍याचा नकारात्‍मक परिणाम होतो. याच कारणास्‍तव स्‍वयंपाक … Read more

साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !

‘साधना करतांना ‘सर्वस्वाचा त्याग’, हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. यासाठी काही वेळा काही साधकांकडून इतरांचे ऐकून भावनेपोटी कृती केली जाते. त्यामुळे अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. कधी साधक सर्वस्वाचा त्याग करतांना त्यामध्ये ‘मला हे पाहिजे.’, यांसारख्या विचारांनी कृती करत असल्यास त्यामध्ये स्वार्थ असतो. त्यामुळे केलेल्या कृतीसाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभत नाही. परिणामी अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. हीच … Read more

मनोविकारांचे मूळ कारण स्वेच्छा होय !

‘स्वतःच्या इच्छेप्रमाणे झाले नाही, की मानसिक ताण वाढून पुढे अनेकविध मनोविकार होतात. त्यावर हल्लीचे मनोविकार तज्ञ विविध उपाय सांगतात; पण कोणीही ‘स्वेच्छाच नको’, असे शिकवत नाहीत. त्यामुळे जगभर अशा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वस्वाचा त्याग केलेल्या ऋषी-मुनी आणि संत यांना कधीच मनोविकार झाला नाही. याउलट ते नेहमी सत्-चित् आनंदात असायचे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठल्याही परिस्थितीत त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करत असणे

‘तुमच्या देहाचे मडके अध्यात्मात एकदा चांगले सिद्ध झाल्यावर तुम्ही कधीही, कुठेही गेलात, तरी ते फुटत नाही; उलट ते चांगला नाद निर्माण करते. श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

वर्तमान स्थितीत भगवंताचे तत्त्व ज्या देवतेच्या रूपात समोर येईल, त्या रूपाला प्रार्थना करून त्या रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता आल्यास सर्वव्यापी भगवंताशी एकरूप होता येणे

‘वर्तमान स्थितीत समोर येईल, त्या देवाच्या तत्त्वांशी एकरूप होता आले पाहिजे. त्या वेळी समोर दिसणार्‍या देवाच्या तत्त्वाला प्रार्थना करून त्याची सेवा करता आली पाहिजे. यामुळे ईश्वराच्या प्रत्येक तत्त्वाशी जुळवून घेता येते आणि मग सर्वव्यापी असणार्‍या भगवंताशी एकरूप होता येते. काही जणांमध्ये सांप्रदायिकतेमुळे देवाच्या एकाच तत्त्वाविषयी भाव असतो, उदा. काहींना श्रीराम जवळचा वाटतो; परंतु हनुमंत नाही. … Read more

साधना करतांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व !

‘अध्यात्मशास्त्र म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या संदर्भातील तात्त्विक माहिती, तर साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या कृती. त्यामुळे काही जणांना प्रश्न पडतो की, ‘प्रत्यक्ष कृती करणे, म्हणजे साधना करणे महत्त्वाचे असतांना अध्यात्मशास्त्र किती महत्त्वाचे असते?’ त्याचे उत्तर म्हणजे, साधना करतांना ईश्वरप्राप्तीच्या टप्प्याला जाईपर्यंत साधकाला अनेक अनुभूती येतात. या अनुभूतींबद्दल त्या साधकाला अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर, म्हणजे त्याच्या … Read more