स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

१. पशूला द्रव्याचा लोभ नसतो; परंतु हाच द्रव्यलोभ माणसाला पशू बनवतो. २. ‘मी देह नाही’ हे म्हणण्यापेक्षा ‘मी आत्मा आहे’ हे म्हणण्यामुळे ‘नाहमकर्ताची’ जाणीव होऊन नरदेहाचे सार्थक होते. ३. आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे. (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

उदासीनता घालवून कार्यप्रवृत्त करणारा आणि राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक संदेश !

‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही. सांप्रत आपणा सर्वांना आपाद्मस्तक राजसभाव अंगी बाणलेला आदर्श नेता हवा आहे, ज्याच्या नसानसांमधून प्रचंड चैतन्य ओसंडत आहे. असा युवक नेता हवा आहे, ज्याच्या अंगी रणांगणावरील योद्ध्याचा आदेश भरून राहिला आहे. आयुष्याच्या रणभूमीवर सध्या आपणांस लढाऊ, शूर … Read more

वक्त्याचे बोलणे आत्मविश्‍वासपूर्वक असण्याचे महत्त्व

‘संवादातून सुसंवाद साधण्याच्या हातोटीवर पुष्कळ लोकांनी जीवनात यश मिळवले आहे. अनेकांना विषयाचे भरपूर ज्ञान असूनही इतरांवर तेवढा प्रभाव पाडता येत नाही. उलट अधिक ज्ञान नसूनही काही लोक उत्तम प्रभाव पाडू शकतात. याला कारण म्हणजे ‘संभाषणचातुर्य’. जो आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतो, तोच लोकांची हृदये जिंकू शकतो. आत्मविश्‍वासपूर्वक केलेले छोटेसे संभाषणसुद्धा प्रभावी होऊ शकते. आपले प्रेमळ, … Read more

स्वामी विवेकानंदांची शिकवण

सर्व जगाच्या कल्याणासाठी दीपस्तंभ असलेल्या हिंदु धर्माचे तेज संपूर्ण विश्‍वात प्रस्थापित केल्याविना शांत बसू नका !

स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचारधन

‘आज भारतातून श्रद्धाभाव जवळजवळ लुप्त झाला आहे. एखादा माणूस महान बनतो आणि दुसरा दुबळा रहातो, याचे कारणही श्रद्धाच आहे. माझे गुरुदेव म्हणत, ‘जो स्वत:ला दुबळा समजतो, तो दुर्बळच राहील. पाश्‍चात्त्यांचा स्वत:च्या बाहुबलावर, स्वत:च्या शक्तीवर विश्‍वास आहे. त्यांनी जी ऐहिक प्रगती केली, तो त्यांच्या श्रद्धेचाच परिणाम आहे. तुम्ही जर तुमच्या आत्मबलावर विश्‍वास ठेवलात, तर तुम्ही प्रगती … Read more