निराधार हिंदूंकडून साधना करवून घेणे, हाच त्यांच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

हल्लीचे बहुसंख्य धर्माचार्य मिरवणुका, पाद्यपूजा, सन्मान यांशिवाय काय करतात ? बहुतेक कीर्तनकार आणि प्रवचनकार केवळ कीर्तने आणि प्रवचने करतात. त्यामुळे कितीजण साधना करायला लागले, याचा ते विचारही करत नाहीत. मुसलमानांना मुल्ला-मौलवींचा आणि ख्रिस्तींना फादरचा आधार वाटतो. तसा हिंदूंना कोणाचाही आधार वाटत नाही. काही धर्माचार्यांचा हिंदूंना आधार वाटला असता; पण तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यांच्याहीबद्दल हिंदूंच्या मनात विकल्प निर्माण केले. यामुळे हिंदू निराधार झाले आहेत. त्यांना साधनेसंदर्भात सांगून त्यांच्याकडून साधना करवून घेणे, हाच हिंदूंच्या समस्या सोडवण्याचा एकमेव उपाय आहे. – डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष १, कलियुग वर्ष ५११५ (११.५.२०१३))

Leave a Comment