खरे अध्‍यात्‍म !

‘साधनेचे प्रयत्न करतांना प्रथम बुद्धीच्‍या स्‍तरावर ‘देवच माझ्‍या माध्‍यमातून सर्व करत आहे’, असा भाव ठेवावा लागतो. साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्‍यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्‍हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्‍यात्‍म आहे !’ – (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)

साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात. हे प्रयत्न केल्‍यामुळे आपली साधनेची तळमळ आणखी वाढते. असे चक्र चालू रहाते. यावरून आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व लक्षात … Read more

खरा त्याग !

‘साधनेसाठी पैसा, वेळ आदींच्या त्यागापेक्षा ‘मी’पणाचा त्याग, हा खरा त्याग आहे. ‘मी’पणाचा त्याग म्हणजे, ‘मी’, ‘माझे’, ‘स्वकेंद्रित वृत्ती’ आदींचा त्याग. यासाठी गुरु किंवा देव यांना प्रार्थना करावी, ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगात मला माझ्या ‘मी’पणाची जाणीव होऊन तो दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होवोत.’ यानुसार केलेल्या प्रयत्नांचा आढावा प्रतिदिन देवाला द्यावा.’ – (पू.) संदीप आळशी (१४.१२.२०२२)

‘सर्व ईश्वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

‘गुरु किंवा ईश्‍वर यांच्या चरणी पूर्ण समर्पित झाल्यावर स्वतःविषयीचे विचार पुष्कळ अल्प होतात. आपण सतत ईश्‍वरी अनुसंधानात असलो, तर ईश्‍वराचेही आपल्याकडे लक्ष असते. गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना एखाद्या वेळी आपल्या संदर्भात काहीतरी प्रतिकूल जरी घडले, तरी ‘ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे; म्हणून … Read more

प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्या !

‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण. या दोन्ही रामायणांचा परिपोष जीवनात होणे, म्हणजे रामायण खर्‍या अर्थाने अनुभवणे होय. प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्यायचा प्रयत्न करा !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१५.४.२०२१)

साधनेच्या प्रयत्नांची ताकदच आपत्काळात आपल्याला तारून नेईल !

‘साधनेसाठीच्या अनुकूल परिस्थितीत साधनेचे प्रयत्न चांगले होतात. साधनेसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत मात्र साधनेचे प्रयत्न चांगले होणे, हे साधनेच्या प्रयत्नांच्या ताकदीवर अवलंबून असते. ही ताकद प्रयत्नांची तळमळ आणि प्रयत्नांमधील नियमितता यांवर अवलंबून असते. ‘आगामी आपत्काळात कोणकोणत्या भीषण परिस्थितींचा आपल्याला सामना करावा लागेल’, याचा आपण आता अंदाजही करू शकत नाही. यासाठी आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण … Read more

जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !

‘प्रत्येक मनुष्याला जीवनात कधी ना कधी तरी कुठल्या ना कुठल्या तरी स्तरावर संघर्ष हा करावाचा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनाही जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यांनी संघर्षाला मोठ्या धैर्याने तोंड दिले; म्हणून त्यांना पुढे यश अन् कीर्तीही मोठी लाभली. यास्तव जीवनात कराव्या लागणार्‍या संघर्षापुढे गुडघे टेकणार्‍यांनी, प्रतिकूल परिस्थितीला दोष देणार्‍यांनी … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्‍या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव यांच्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात आणि व्यष्टी साधनेसाठी जीवन समर्पित करू शकतात. आता काळानुसार समष्टी साधना, म्हणजे हिंदु … Read more

साधकांच्या दृष्टीने प्रगतीचे सर्वाधिक मूल्य !

‘अनेक राजे-महाराजांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे मूल्य सर्वाधिक वाटते; कारण मूठभर मावळ्यांनिशी पाच बलाढ्य परकीय पातशाह्यांशी केलेल्या संघर्षात ते विजयी ठरले. याप्रमाणेच साधनेतील अडथळ्यांविना होणाऱ्या आध्यात्मिक प्रगतीपेक्षा साधनेतील अडथळ्यांवर संघर्षपूर्वक मात केल्याने होणाऱ्या प्रगतीचे मूल्य सर्वाधिक आहे.’

साधनेचे महत्त्व !

‘प्रकाशाची गती, ग्रह-तार्‍यांचे एकमेकांपासूनचे अंतर इत्यादी अनेक शोध हिंदूंच्या ऋषिमुनींनी पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या सहस्रो वर्षे पूर्वीच लावले आहेत. पाश्‍चात्त्यांकडे असतात तशा अत्याधुनिक उपकरणांविना ऋषिमुनी हे शोध लावू शकले, ते त्यांच्या साधनेमुळे प्रगट झालेल्या अंतर्ज्ञानाच्या (ईश्‍वरी ज्ञानाच्या) बळावर ! आजच्या विज्ञानयुगातील पिढीने याचा अंतर्मुखतेने विचार करून साधना केली, तर तिला लौकिक जीवनातील यशप्राप्ती होण्यास साहाय्य होऊन पारमार्थिक … Read more