आध्यात्मिक उपाय
सध्याच्या कलियुगात एकंदरित समाज धर्माचरणापासून विन्मुख झाल्याने आसुरी शक्तींनी उच्छाद मांडला आहे. आपण भौतिक साधनांनी वा अन्य मार्गांनी आनंदी व्हायचा प्रयत्न केला, तरी आसुरी शक्तींच्या त्रासांमुळे आनंदी होऊ शकत नाही. मग हा त्रास दूर होण्यासाठी नियमित कोणते नामजप आदी आध्यात्मिक उपाय आणि साधना करावी ? अतृप्त पूर्वजांमुळे होणार्या बुद्धीअगम्य त्रासांसंबंधी काय करावे ?, तसेच वास्तूदोष दूर होण्यासाठी अत्यल्प खर्चात वास्तूशुद्धी आणि प्रवास आनंददायी होण्यासाठी वाहनशुद्धी कशी करावी ? यांसारख्या सूत्रांचे विवेचन या सदरात केले आहे.
काळानुसार कोणते नामजप किती वेळ करावेत ?
‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धिलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.
आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी देवाने सुचवलेला नामजप !
संबंधित ग्रंथ
मीठ – मोहरी, नारळ, तुरटी आदींनी दृष्ट कशी काढावी ? ( दृष्टविषयीच्या शास्त्रीय विवेचनासह )
कापूर , काळे उडीद , विड्याचे पान आदींनी दृष्ट कशी काढावी ? (रुग्ण आणि बाळ यांची दृष्ट काढण्यासह )
उतारा आणि मानस दृष्ट
नामजपांमुळे दूर होणारे विकार (नामजपाविषयीच्या सूचनांसह मुद्रा व न्यासही अंतर्भूत)