आध्यात्मिक उपाय
सध्याच्या कलियुगात एकंदरित समाज धर्माचरणापासून विन्मुख झाल्याने आसुरी शक्तींनी उच्छाद मांडला आहे. आपण भौतिक साधनांनी वा अन्य मार्गांनी आनंदी व्हायचा प्रयत्न केला, तरी आसुरी शक्तींच्या त्रासांमुळे आनंदी होऊ शकत नाही. मग हा त्रास दूर होण्यासाठी नियमित कोणते नामजप आदी आध्यात्मिक उपाय आणि साधना करावी ? अतृप्त पूर्वजांमुळे होणार्या बुद्धीअगम्य त्रासांसंबंधी काय करावे ?, तसेच वास्तूदोष दूर होण्यासाठी अत्यल्प खर्चात वास्तूशुद्धी आणि प्रवास आनंददायी होण्यासाठी वाहनशुद्धी कशी करावी ? यांसारख्या सूत्रांचे विवेचन या सदरात केले आहे.
काळानुसार कोणते नामजप किती वेळ करावेत ?
अ. ‘ज्या साधकांचा व्यष्टी साधनेसाठीचा कुलदेव / कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप आणि वाईट शक्तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठीचा जप कमीतकमी ५ वर्षे चांगल्या तर्हेने होत असेल, त्यांनी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक असलेले पुढील समष्टी जप करावेत.
आ. ज्यांची समष्टी सेवा योग्य तर्हेने होत आहे, त्यांनीही पुढील समष्टी नामजप करावेत.