आजची बिघडलेली तरुण पिढी !

‘चेन्नई येथील उच्च न्यायालयाने आजच्या तरुण पिढीविषयी खेद व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘चित्रपटातील अश्‍लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या मनामध्ये दुष्ट विचार येतात आणि त्यात हिंसाचाराच्या घटना दाखवल्यामुळे तरुण पिढीची मने बिघडली आहेत. यासाठी चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वतःचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासावी.’

प.पू. गुरुमाऊलीने सनातनच्या संतांना दिलेली शिकवण

समाजातील संत मानसन्मान आणि हेवेदावे यांत गुंतलेले असतात. याउलट प.पू. गुरुमाऊलीने सनातनच्या संतांना साधी राहणी आणि निष्काम भाव यांची शिकवण देऊन आत्मिक शक्ती दिली आहे. ती ते केव्हाही वापरू शकतात. गुणातीत शक्ती त्रिभुवनाला पुरेशी होते.’ आत्मानुसंधान ‘आत्म्याशी संबंध म्हणजे आत्मानुसंधान ! सूक्ष्मातून संधान साधणे, म्हणजे सर्व चैतन्यमय असल्याची अनुभूती घेणे.’

जीवनमुक्तीचे रहस्य

‘निश्‍चययुक्त आत्मतत्त्वात रत रहाणारे (गुरु) जीवनमुक्त असतात.’ (महोपनिषद्, अध्याय ६)

भासमान आणि शाश्वत यांची प्रमाणे

अयं प्रपञ्चो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमद्वयम् । अत्र प्रमाणं वेदान्ता गुरवोऽनुभवस्तथा ॥ – योगवासिष्ठ, प्रकरण ३, अध्याय २१, श्‍लोक ३५ अर्थ : अनुभवाला येणारा प्रपंच विस्तार, नानात्व (विविधता) हे केवळ भासमान होणारे आहे. केवळ एकमात्र ब्रह्मच सत्य, शाश्‍वत आहे आणि ते आपणच आहोत. याविषयी वेदादी सत्शास्त्रे, गुरु आणि शेवटी स्वतःचा अनुभव हीच प्रमाणे होत.

दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचतांना ‘चैतन्यामुळे कार्य होत आहे’, असा भाव ठेवा !

‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन … Read more

सध्याच्या कलियुगात चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही असणे

सध्या भारतात लोकशाहीच्या नावाखाली लुटारूंचा धंदा चालू आहे. चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही चालू आहे. काही टक्के लोकांची मते मिळाली की, ते राज्य करतात, उदा. ३० टक्के लोक ७० टक्के लोकांवर राज्य करतात. लोकही तसेच आहेत. पर्याय नसल्याने लोकांना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधींना केवळ मत द्यायचे; म्हणून मत दिले जाते. आज जरी नकारात्मक मतदानपद्धत … Read more

‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून आत्मानुसंधानात राहिल्यास देवाला अपेक्षित असे कार्य होईल !

‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्‍वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more

प्रायश्चित्ताने मन वळवले पाहिजे !

मन, आत्मा, इंद्रिये आणि वस्तू यांचे संतुलन अन् संयोग झाला, तर कार्य होते. योगः कर्मसु कौशलम् ।, म्हणजे समत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. मनाची शांतता आणि आत्म्याशी संतुलन होणे महत्त्वाचे. मन हे वृत्तीप्रमाणे बनते. त्यामुळे वृत्तीत पालट होणे महत्त्वाचे आहे. प्रायश्‍चित्ताने मन वळवले पाहिजे.

लोकहो, ‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते’, हे जाणा !

‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते; परंतु आपण बहिर्मुख होऊन आवरणाशी संबंध ठेवतो आणि ‘आवरणाद्वारे कार्य चालते’, अशी आपली भावना होते. त्यामुळे सामान्य जनतेची फसगत होत आहे. भौतिक सुखाच्या लालसेमुळे भौतिक सुखात रमणे, भौतिक सुखाची प्राप्ती करणे, यासाठीच सर्व वेळ घालवला जातो. विज्ञान आणि संशोधन हेसुद्धा याच विचारसरणीला पूरक झाले आहे. त्यामुळे … Read more