आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य

आत्म्यावरील आवरण काढून आत्मशक्ती निर्माण झाली की, ‘तो जीव कोणतेही कार्य सहज सुलभ रितीने करू शकतो.’ जिवाची इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती मिळून जेव्हा कार्य होते, तेव्हा ते कार्य चैतन्याद्वारे सुलभ रितीने पार पडते. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे

साधनेला महागाईची अडचण नसते. साधनेला कशाची आवश्यकता नसते. कुठेही बसून साधना करता येते. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

आत्मशक्तीचे सामर्थ्य !

भौतिक सुखाने तुमची चैतन्य शक्ती, सामर्थ्य वाढत नाही, उलट तुम्ही निर्बल, दुर्बल होता. यासाठी साधना करून आत्मशक्ती (चैतन्य शक्ती) वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, अशी स्थिती असण्यापेक्षा ‘तुम्ही राजा व्हा, तुम्ही कारभार करा !’, अशी स्थिती निर्माण होणे आवश्यक !

‘वेदांमध्ये म्हटले आहे, ‘हे इंद्रा, तू सर्वार्थांनी लायक आहेस. तू राजा हो.’ असे लोकांनी राजासाठी म्हणायला पाहिजे; परंतु भारतात मात्र ‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, असे शब्द ऐकू येतात.’ – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

आजची बिघडलेली तरुण पिढी !

‘चेन्नई येथील उच्च न्यायालयाने आजच्या तरुण पिढीविषयी खेद व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘चित्रपटातील अश्‍लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या मनामध्ये दुष्ट विचार येतात आणि त्यात हिंसाचाराच्या घटना दाखवल्यामुळे तरुण पिढीची मने बिघडली आहेत. यासाठी चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वतःचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासावी.’

प.पू. गुरुमाऊलीने सनातनच्या संतांना दिलेली शिकवण

समाजातील संत मानसन्मान आणि हेवेदावे यांत गुंतलेले असतात. याउलट प.पू. गुरुमाऊलीने सनातनच्या संतांना साधी राहणी आणि निष्काम भाव यांची शिकवण देऊन आत्मिक शक्ती दिली आहे. ती ते केव्हाही वापरू शकतात. गुणातीत शक्ती त्रिभुवनाला पुरेशी होते.’ आत्मानुसंधान ‘आत्म्याशी संबंध म्हणजे आत्मानुसंधान ! सूक्ष्मातून संधान साधणे, म्हणजे सर्व चैतन्यमय असल्याची अनुभूती घेणे.’

जीवनमुक्तीचे रहस्य

‘निश्‍चययुक्त आत्मतत्त्वात रत रहाणारे (गुरु) जीवनमुक्त असतात.’ (महोपनिषद्, अध्याय ६)

भासमान आणि शाश्वत यांची प्रमाणे

अयं प्रपञ्चो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमद्वयम् । अत्र प्रमाणं वेदान्ता गुरवोऽनुभवस्तथा ॥ – योगवासिष्ठ, प्रकरण ३, अध्याय २१, श्‍लोक ३५ अर्थ : अनुभवाला येणारा प्रपंच विस्तार, नानात्व (विविधता) हे केवळ भासमान होणारे आहे. केवळ एकमात्र ब्रह्मच सत्य, शाश्‍वत आहे आणि ते आपणच आहोत. याविषयी वेदादी सत्शास्त्रे, गुरु आणि शेवटी स्वतःचा अनुभव हीच प्रमाणे होत.

दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचतांना ‘चैतन्यामुळे कार्य होत आहे’, असा भाव ठेवा !

‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन … Read more

सध्याच्या कलियुगात चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही असणे

सध्या भारतात लोकशाहीच्या नावाखाली लुटारूंचा धंदा चालू आहे. चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही चालू आहे. काही टक्के लोकांची मते मिळाली की, ते राज्य करतात, उदा. ३० टक्के लोक ७० टक्के लोकांवर राज्य करतात. लोकही तसेच आहेत. पर्याय नसल्याने लोकांना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधींना केवळ मत द्यायचे; म्हणून मत दिले जाते. आज जरी नकारात्मक मतदानपद्धत … Read more