खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सनातन करत असलेले शेकडो यज्ञ आणि ग्रंथप्रकाशने यांचा मूळ उद्देश ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा असला, तरी त्यातून प्रथम एक ‘आदर्श राष्ट्र’ निर्माण होईल आणि त्यानंतर कालांतराने खऱ्या अर्थाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही वेळ आहे !

‘रामसेतु बांधणे चालू असतांना खारही त्यामध्ये सहभागी झाली होती. ती वाळूत लोळून तिच्या अंगाला चिकटलेली वाळू सेतूवर अंग झटकून पसरवत होती. रामकार्यामध्ये इतक्या लहान जिवानेही अशा प्रकारे सहभाग घेतला होता आणि श्रीरामाने तिचाही उद्धार केला होता. आता पुन्हा आपल्याला रामराज्य आणायचे आहे. त्या खारीचा आदर्श घेऊन आपणही या कार्यात आपल्या परीने सहभागी होणे आवश्यक आहे.’ … Read more

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्‍चय प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक !

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या. त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा मनाचा निश्‍चय करून त्यासाठी प्रत्येक हिंदूने लढाऊ वृत्तीने आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more

मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !

‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर धर्मांत असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

‘अश्‍लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. ‘रामराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदर्श होते; कारण ती राज्ये चारित्र्यसंपन्न होती. सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्य संपन्नच असेल.’ – … Read more

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले