मनात भावनिक विचार आल्यास सनातनच्या ग्रंथातील एखादे पान वाचा !

विचारांनीच विचारांशी युद्ध करावे. मनात भावनिक विचार आल्यावर लगेच सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या कोणत्याही ग्रंथाचे पान उघडून वाचावे. मनातील भावनेचे विचार नाहीसे होऊन मनात सतचे विचार येतील. – पू (सौ.) अंजली गाडगीळ

प्रारब्धावर मात केल्यावर देव लवकर भेटतो !

‘वर्तमान स्थितीला आपले प्रारब्ध समजून त्याला आनंदाने सामोरे जावे. प्रारब्धातच देवदर्शन करावे. जो प्रारब्धावर मात करतो, त्याला देव लवकर भेटतो !’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ

प्रतिदिन शिका आणि नदीच्या वहात्या पाण्यासारखी प्रगती करून एक दिवस मोक्ष नावाच्या सागरात जाऊन विलीन व्हा !

‘आपले आध्यात्मिक जीवन नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखे असले पाहिजे. पाणी वहात असतांना या प्रवाहाला वाटेत असंख्य दगडधोंडे, माती, झाडे अडथळे आणतात. अनेक गावांतून वहात वहात नदी पुढे पुढे जात असते आणि अगदी शेवटी कधी ना कधी ती समुद्राला जाऊन मिळतेच. येथेच तिचा प्रवास थांबतो. रोजच्या जीवनातही आपण असेच वहात राहिले पाहिजे. ‘नित्यनूतन सनातन’ या उक्तीप्रमाणे जीवनात … Read more

देवाचा नामजप सतत केल्यास देहातील देवत्व जागृत होऊन अध्यात्मात लवकर उन्नती होते !

मंत्रोपचारामुळे देवाच्या मूर्तीत लवकर सजीवपणा येतोे, म्हणजेच ती जागृत होते. अगदी याच पद्धतीने आपणही देवाचा नामजप सतत केल्यास आपल्या देहातीलही देवत्व लवकर जागृत होते, म्हणजेच आपली अध्यात्मात लवकर उन्नती होते ! – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

गुरु

‘गुरु हे तत्त्वस्वरूप असतात. ते काळाच्या पलीकडे गेलेले असल्याने त्यांना जीवन आणि मरण सारखेच असते. जीवन म्हणजे प्रसंगांची उत्पत्ती, तर मरण म्हणजे प्रसंगांचा लय. सुखाची उत्पत्ती आणि दुःखाचा लय यांना साधणारा स्थितीवाचक आनंदाचा दुवा म्हणजेच गुरु !’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘ईश्वरेच्छेने सर्व काही घडते’, अशी स्थिती प्राप्त होणे’, म्हणजे ‘मोक्षप्राप्ती’ !

साधकाची साधनेत प्रगती झाल्यावर शेवटी मोक्ष मिळवण्याची इच्छाही रहात नाही. ‘सर्व जीवन म्हणजे ईश्वरेच्छा’, असेच साधकाचे समीकरण बनते. ‘ईश्वरेच्छेने सर्व काही घडते’, अशी स्थिती प्राप्त होणे’, यालाच खर्‍या अर्थाने ‘मोक्षप्राप्ती’ म्हणतात.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

व्यष्टी आणि समष्टी संत यांचे कार्य आणि काळानुसार साधना करण्यास शिकवणार्‍या संतांची समाजाला आवश्यकता !

बहुतेक संत हे व्यष्टी संत असतात. ते केवळ इतरांना नामजपाच्या मार्गावर आणतात; परंतु समष्टी संत लोकांना नामजप शिकवण्याच्या समवेत लोकांमध्ये क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज निर्माण करतात. असे संत लोकांना समाजात फोफावलेल्या अधर्माविरुद्ध आवाज उठवायला शिकवतात. ‘समाजातील व्यक्तींना साधनेची योग्य दिशा दाखवणे आणि त्यांची अल्प कालावधीत शीघ्र गतीने प्रगती करून घेणे’, अशा समष्टी संतांचीच समाजाला सध्या आवश्यकता … Read more

‘आत्मा एकच आहे आणि केवळ त्याची रूपे भिन्न आहेत’, हे समजल्यावर द्वैत संपून ‘एकत्व साधणे’ शक्य होते !

‘देह जरी भिन्न असले, तरीही सर्वांठायी ‘ब्रह्म’ एकच आहे’, असे सांगून रेड्याच्या मुखातूनही वेद वदवणारे संत ज्ञानेश्वर म्हणतात की, ‘आत्मा हा एकच आहे. आपली वेगवेगळी देहाची रूपे त्यावर जरी असली, तरी आपल्यातील ईश्वराचे आत्मरूप एकच आहे.’ ‘सर्वत्र ब्रह्म’ या नात्याने सर्व समानच आहे. ईश्वरमय आहे.’ मग आपण तुलना करण्याचे कारण काय ? आणि कशाला तो … Read more

संत सहवासाचे महत्त्व आणि लाभ !

‘साधकाच्या आयुष्यात संतांचा सहवास महत्त्वाचा असतो. संत सहवासाने साधकामधील देवत्व वाढते. मनुष्याला बुद्धी असल्याने तो या सहवासाचा योग्य लाभ करून घेऊ शकतो. बर्‍याच वेळा त्याचा अहं त्याच्या प्रगतीच्या आड येतो. वस्तूंना मात्र भाव-भावना आणि अहं नसतो. वस्तू संतांच्या सहवासात लगेच भारित होतात आणि त्यांच्यात पालट होतांना आढळतो. संत सहवासाने साधकाचे मायेतील विचार न्यून होतात. साधकाच्या … Read more

साधनेतही मातेसारखा प्रेमभाव हवा !

साधनेतही ‘आई’च व्हावे लागते. सर्वांना आपलेसे करून त्यांच्याकडून साधना करून घ्यावी लागते. इतरांना सत्संग द्यावा लागतो, प्रसंगी त्यांना रागावून त्यांना योग्य-अयोग्य यांची जाणीव करून द्यावी लागते, तरच इतरांच्यात खर्‍या अर्थाने ईश्वराप्रती ओढ निर्माण व्हायला साहाय्य होते. यालाच प्रेमभाव असे म्हणतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ