एकावेळी एकच साधना करावी

भोजन करतांना पूर्ण ताट भरून अन्नपदार्थ आपल्यासमोर ठेवले, तर ते सर्वच आपण खाऊ शकत नाही. आपल्याला जेवढे पचेल, तेवढेच आपण खाऊ शकतो. व्यावहारिक शिक्षण घेत असतांनाही एकाच वेळी सर्वच परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनेक पदव्या प्राप्त करू शकत नाही, तसेच हे आहे. अध्यात्मातही एका वेळी एकच करू शकतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

जन्मांतरीचा साधनामार्ग

‘प्रत्येक जीव त्याच्या पूर्वजन्मात काय शिकला ? त्या जिवाने कोणती साधना केली ?’, यांवरही त्या जिवाची साधनेची सद्यस्थिती अवलंबून असते. पूर्वजन्मात ध्यानयोगाने साधना केली, तर पुढील जन्मातही तोच साधनामार्ग असू शकतो. ‘परमेश्वर प्राप्तीसाठी काहीतरी करणे’, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. अध्यात्मात मार्ग जरी भिन्न असले, तरी ध्येय एकच आहे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

‘पैसे कमवणे आणि ते वापरणे, हे करतांनाही साधना होणे आवश्यक असते. कर्तव्य म्हणून सत्मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. मिळवलेले पैसे वापरतांनाही सुखाची आसक्ती न बाळगता मिळालेल्या सुखात समाधानी रहाणे योग्य ठरते. आर्थिक व्यवहार करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक अल्प करणे, हीच खरी साधना होय … Read more

जो परमेश्वराला प्राप्त करू इच्छितो, जो त्याच्यासाठी रडतो, त्याला तो लाभतो !

‘मूल झाले नाही; म्हणून लोक अश्रूंचे लोट वहातात. धन मिळाले नाही; म्हणून केवढा शोक करत असतात; परंतु परमेश्वर लाभला नाही, म्हणून किती लोक दुःख करतात अन् रडतात ? खरोखरच जो परमेश्वराला प्राप्त करू इच्छितो, जो त्याच्यासाठी रडतो, त्यालाच तो लाभतो.’ – स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)

अचल संतमन

संतांचे मन नेहमी ईश्वरी अनुसंधानात स्थिर असते. ते एखाद्या जलाशयातील संथ पाण्यासारखे अचल असते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

परलोकमार्गातील गुरुबळ

गुरूंनी साधकाला घडवलेले असते. गुरूंनी शिकवलेल्या गोष्टींचा संस्कार साधकावर मृत्यूनंतरही रहातो. तो संस्कार आपल्या परलोकातील प्रवासात एक ऊर्जा बनून साहाय्य करतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

चूक सांगण्यातूनही साधना व्हायला हवी

इतरांना चूक सांगतांना त्यांना पूर्णतः समजून घेऊन त्यांचे कल्याण होण्याच्या भावनेतूनच ती सांगायला हवी, तरच चूक सांगतांनाही आपल्या वाणीत आईच्या वाणीसारखे मार्दव येते. ‘चूक सांगण्यातूनही साधना व्हायला हवी’, तरच समष्टीचा तोल बिघडत नाही. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

प्रभु श्रीरामाने खारीचा उद्धार करणे

रामसेतूसाठी साहाय्य करणार्‍या खारीच्या पाठीवर श्रीरामाने त्याची तीन बोटे उमटवली. यातून त्याने खारीचा उद्धार केला, म्हणजेच प्रभु श्रीरामाने खारीचे मन, बुद्धी आणि अहं नष्ट केले. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ