बलात्कार करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, यासाठीचा एकमेव मार्ग, म्हणजे साधना करवून घेणे !

हल्ली भारतात बलात्कारांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यावरील उत्तर म्हणून बलात्कार्‍यांना तात्काळ फाशी द्या, अशा तर्‍हेच्या मागण्या समाजातून येत आहेत. या मागण्या बरोबर असल्या, तरी त्या वरवरचे उपाय ठरतात. प्रत्येक बलात्कार्‍याला फाशी दिली, तरी बलात्कार संपणार नाहीत; कारण एखाद्या अतिरेक्याला फाशी दिली, तरी इतर अतिरेक्यांच्या मनात त्यासंदर्भात भीती निर्माण होत नाही, तर ते विचार … Read more

अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण असल्याविना समाजोन्नती केवळ अशक्यच !

धर्माचे नियंत्रण नसल्यास मानवाचे गिधाड होणे अर्थ आणि काम पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण अटळ आहे. तेच धर्माचे ध्येय आहे. ते डोळ्यांसमोरून हटले की, माणसाचे गिधाड होते. मग सत्य-असत्य, शुभ-अशुभ, सत्प्रवृत्ती-दुष्प्रवृत्ती, विधी-निषेध यांतील अंतर त्यांच्या लेखी संपून जाते. विधि-निषेधशून्य नागडा स्वार्थ असलेला गिधाडाचा जीवनधर्म समाजाच्या सुधारणा आणि क्रांत्यांच्या मुळाशी असणे अन् त्यामुळे धर्मजीवन पाला-पाचोळ्याप्रमाणे भिरभिरणे प्रत्येक दुर्गुण … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संत आणि साधक यांचे महत्व

व्यवहारात स्वार्थ असतो, तर अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग असतो. यामुळे व्यवहारातील राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यापेक्षा संत आणि साधक हिंदु राष्ट्राची स्थापना करून खर्‍या अर्थाने समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे हित करू शकतात. – डॉ. आठवले (२६.५.२०१४)

हिंंदु संस्कृतीची वैशिष्ट्ये

१. हिंदु संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी नवीन पिढीवरील संस्कार महत्त्वाचे ! : प्रत्येक देशाचे अस्तित्व म्हणजेच त्या देशाची जीवनप्रणाली आणि संस्कृती यांचे अस्तित्व. ही संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी नवीन पिढीवर जन्मापासून केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात. २. हिंदु संस्कृतीनुसार विवाह हा करार नसून ईश्वराने निर्माण केलेला संस्कार असणे : आपली संस्कृती ४ आश्रम, १६ संस्कार, पंचयज्ञ आणि सनातन … Read more

महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानचा खड्गहस्त

हिंदुस्थान सोडून बाकीच्या सर्व लघुराष्ट्रांना आपल्या हिंदु धर्म जीवनाची, शिकवण देण्याचे दायित्व आपल्या महाराष्ट्र्राचे आहे बरं कां ! म्हणून तर आपले राष्ट्र महान आहे. ३०० वर्षांपूर्वीच ही जाणीव समर्थांनी त्यांच्या ‘दासबोध’ नामक ग्रंथात देऊन ठेवली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।’ ‘मराठा’ म्हणजे क्षात्रवृत्ती होय. मराठा हा शब्द जातिवाचक नसून भाववाचक आहे. स्वातंत्र्यवीर … Read more

हिंदुत्वाच्या र्‍हासामुळे लोकराज्यात लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाणे

१. हिंदु धर्मात सांगितलेल्या आचारधर्माचे पालन न करणे २. धर्मशिक्षण न देणे : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी लहानपणी धर्माचे महत्त्व मनावर बिंबवल्यामुळे अर्थ आणि काम मर्यादेत रहायचे आणि पुढे ते सोडून मोक्षाकडे जायची ओढ असायची. धर्मशिक्षण न देता केवळ नैतिकमूल्ये शिकवली आणि गर्भधारणा प्रतिबंधक उपाय विज्ञानाच्या साहाय्याने केले, तरी त्यांची परिणामकारकता … Read more

आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

धर्माकरता केलेला सर्व त्यागच ‘इह’ आणि ‘पर’ जीवन कृतार्थ करतो. स्त्रीची तृप्ती मातृत्वात असली, तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठतम, परमतृप्ती देणारा स्व-धर्माकरता मातृत्वाचाही त्याग करण्यात, प्रसंगी सर्वस्वाचा होम करण्यात आहे. हे सतीचे वाण आहे. किंबहुना त्याहीपेक्षा दिव्यदाहक आहे. सतीला किमान सरणावरच्या पतीशवाचा तरी आधार असतो. इथे तोही नाही. धर्म ही चीजच मुळी अमूर्त, अदृष्ट आहे. आज धर्मरक्षणाकरता … Read more

हिंदूंचा कल्पनातीत सर्वधर्मसमभाव

विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची रावण महाराज या नावाची भारतात २ – ३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको ! – डॉ. आठवले (२६.६.२०१४)

लो. टिळकांप्रमाणे साधना करणारे नेते भारताला मिळाले असते, तर एव्हाना भारत जगातील राष्ट्रांत पहिल्या क्रमांकाला पोहोचला असता !

सन १८९८ साली चाफेकर प्रकरणामुळे झालेली शिक्षा भोगून लोकमान्य तुरुंगातून ज्या वेळी सुटून बाहेर आले, त्या वेळी ते कसब्याच्या श्रीगणपतीस प्रथम आणि नंतर श्री. अण्णासाहेब यांच्या दर्शनास गेलेे. अगोदर घरी जाऊन आला का ? असा श्री. अण्णासाहेबांनी जो प्रश्‍न विचारला त्यावर लोकमान्य एकदम उद्गारले, प्रथम श्री गणपति नंतर तुम्ही ! गीतारहस्य छापल्यानंतर पहिली प्रत पंढरपूरच्या … Read more

मानसिकपेक्षा आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांच्या भाषणाचा परिणाम अधिक होणे, तो अधिक काळ टिकणे आणि म्हणूनच धर्मकार्य करणार्‍यांनी साधना करणे आवश्यक !

१. मानसिक (भावनिक) स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : याचा परिणाम तात्कालिक असतोे. सभा संपून श्रोते परतले की, सभेतील भाषण ते थोड्याच वेळात विसरतात. त्यामुळे कार्यासाठी कार्यकर्ते तयार झाले, असे अल्प वेळा दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे राजकारण्यांच्या सभांना हजारो, लाखोंची उपस्थिती असली, तरी त्यांतील फारच थोडे त्यांच्या कार्यात सहभागी होतात. २. आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : … Read more