राज्यकर्त्यांनो, हे लक्षात घ्या ! षड्रिपुंमुळे नष्ट झालेले अनेक राजे, तर जितेंद्रिय असल्याने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवणारा परशुराम

अनेक राजे इंद्रियांचे दास बनूनच नष्ट झाले आहेत. रावण आणि कीचक स्त्री वासनेने नष्ट झाले. दुर्योधन मत्सराने समाप्त झाला. शिशुपाल क्रोधाने. प्रजेवर प्रचंड कर लादणारा अभिजित राजा लोभाने नष्ट झाला. जितेंद्रिय परशुरामाने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवली. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २०१०)

आमच्या शहाण्या शासनकर्त्यांना भारतीय राजनीतीचे अनुसरण करण्याची बुद्धी कधी येईल ?

पाकिस्तान आक्रमण करणार, या भीतीने भारतीय शासन जो अपरंपार पैसा, शक्ती आणि प्रज्ञा संरक्षणावर वेचते आहे, त्यामुळे विधायक योजना खोळंबून पडल्या आहेत, पुष्कळशी कामे स्थगित करावी लागली आणि त्यामुळे जनतेत नैराश्य पसरले आहे. केवळ पाकिस्तानच्या आक्रमणाच्या भयाने थरथरणारे आपले शासन. प्रचंड संपत्ती संरक्षणावर बरसते आहे. हे सगळे भारतीय प्रजेला एक वेळ उपाशी ठेवूनच करावे लागते … Read more

राजकीय पक्षांना नव्हे, तर भक्तांना भारतावर राज्य करू द्या !

राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्वार्थासाठी पक्ष बदलतात, तसे विविध संप्रदायांचे भक्त संप्रदाय पालटत नाहीत; कारण त्यांच्यात गुरु आणि ईश्‍वर यांच्याप्रती श्रद्धा असते. असे असतांना राजकीय पक्षांना भारतावर राज्य करून द्यायचे कि भक्तांना ? – डॉ. आठवले (६.५.२०१४)

चोरांनी चंद्राचा, मत्सरी लोकांनी महाकाव्याचा, तर कुलटा स्त्रियांनी पतिव्रतेचा द्वेष करणे

चन्द्रिकां तस्करो द्वेष्टि कवितां मत्सरी जनः । कुलटा च स्त्रियं साध्वीं स्वभावो दुरतिक्रमः ॥ अर्थ : चोर चंद्राच्या चांदण्याचा द्वेष करतो. मत्सरी मनुष्य कवितेचा द्वेष करतो. व्यभिचारिणी स्त्री पतिव्रतेचा राग करते. स्वभाव खरोखरच ओलांडून जाण्याजोगा (बलण्याजोगा) नसतो ! स्पष्टीकरण : चोराला काळाकुट्ट अंधार प्रिय असतो. शुभ्रधवल चंद्राकाशाचा तो द्वेष करतो. कुलटा, जारिणी स्त्री महासाध्वी पतिव्रतेचा … Read more

धर्मबंधन का आवश्यक ?

अ. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! गर्भपाताला शासनाची संमती आहे, हे खरं; परंतु गर्भजल चिकित्सेविरुद्ध शासकीय कायदे आहेत. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! टाईम्सचा लेख (४.७.१९८८) सांगतो की, आता धार्मिक संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावा. म्हणजे स्त्रियांना गर्भजल चिकित्सेपासून परावृत्त करावे. या बाबतीत कायदा हतबल आहे. अन्य … Read more

आर्थिक तत्त्वज्ञान नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते !

नेहरूंनी ‘सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ दारिद्य्रात आहे’, असे सांगितल्यावर डॉ. राधाकृष्णन् यांनी ‘आर्थिक परिस्थिती नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते’, असे सांगणे : नेहरूंनी सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ आपल्या दारिद्य्रात आहे. लोकांच्या जीवनमानाची पातळी उंचावल्यास सर्व प्रश्न आपोआप सुटतील, अशी आशा व्यक्त केली.   त्या वेळी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् म्हणाले, … Read more

हिंदु राष्ट्रात खर्‍या संतांनाच स्वतःला महाराज, स्वामी इत्यादी म्हणवून घेण्याचा अधिकार असेल !

हल्ली भोंदू महाराज, स्वामी इत्यादींचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्यांच्यामुळे खर्‍या संतांपर्यंत बहुतेक व्यक्ती पोहोचू शकत नाहीत. भोंदू महाराज आणि स्वामी यांचे पितळ काही काळाने उघड होते. असा अनुभव आला की, सर्वसाधारण जनतेचा खर्‍या संतांवरचाही विश्‍वास डळमळीत होतो. त्यामुळे त्यांचा साधना, अध्यात्म आदी विषयांवरचाही विश्‍वास उडतो. अशा व्यक्ती बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या जाळ्यात सापडतात आणि धर्मद्वेष्ट्या होतात. … Read more

साम्यवाद्यांनो, विश्‍वात साम्यवाद कुठेच नसतो, तर केवळ अद्वैतात असतो, हे लक्षात घ्या !

विश्‍वातील अनंत सजीव आणि निर्जीव गोष्टींच्या प्रत्येक गटात, उदा. माती, वनस्पती, प्राणी, मानव यांत अब्जावधी प्रकार आहेत. असे असतांना साम्यवाद हा शब्द हास्यास्पद ठरतो. साम्यवाद फक्त अद्वैतात असतो; कारण तेथे फक्त ब्रह्मच असते. असे असतांना साम्यवाद हा शब्द उच्चारणे, हे स्वतःला काही कळत नाही, याचे आणि इतरांना हा शब्द सांगणे, हे अज्ञान पसरवण्याचे लक्षण आहे. … Read more

संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन

त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे ! : संचलनाला साथ देणाऱ्या संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन करतांना सावधान साप्ताहिकाने म्हटले होते, ‘त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे. ती आशेची हाक आहे. तो पराक्रमाला हुंकार आहे. तो विजीगिषेचा … Read more

स्वामी विवेकानंदांची
तथाकथित समाजसुधारकांना चपराक !

इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, “माझ्यासमोर हिंदु समाज सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे”. समारोप करतांना विवेकानंद कडाडले, “रानडे आणि इतर समाजसुधारकहो जिंदे रहो ! या तुमच्या समाजसुधारणा आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की, आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा … Read more