मोक्षाचे अधिदैवत !

‘मोक्षाचे अधिदैवत म्हणजे सदगुरु !’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर २००२)

ज्ञानोपदेश करणारे गुरु !

गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा. या दिवशी पाऊस असतोच. गुरुपौर्णिमा आणि पावसाळा यात काहीतरी समजून घेण्यासारखे आहे. पाऊस म्हणजे जलवर्षाव आणि जल म्हणजे जीवन. जीवनधारा तत्त्वांचा वर्षाव म्हणजे पावसाळा आणि याच वेळी गुरुपौर्णिमा येते. या दिवशी गुरुही जीवनधारा असे तत्त्व पावसाप्रमाणे वर्षतो. आत्मतत्त्वाचा म्हणजे आत्मज्ञानाचा वर्षाव करतो. पावसामध्ये सर्वसमत्व आहे. त्याचप्रमाणे गुरुही आप-पर, सुष्ठ-दुष्ट असे न … Read more

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे । समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन ॥ -रामायण, काण्ड २, सर्ग १०५, श्‍लोक २६ अर्थ : ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात. ‘कुठून तरी या संसारात एकत्र आलेले, … Read more

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

‘आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते. शुद्ध आहार, शुद्ध वृत्तीच्या मनुष्याकडून झालेली शुद्ध पाकसिद्धी, भोजनाच्या पंक्तीतही आपल्या नुसत्या दर्शनाने सद्भाव उत्पन्न करू शकणार्‍या उच्चकोटीतील आदर्श व्यक्तींची उपस्थिती आणि त्या समवेतच त्या … Read more

लोकांचे एकमेव ध्येय ‘सुखप्राप्ती’ !

‘विश्व ही सुखाची एक प्रयोगशाळा आहे. येथे जो प्रयत्न केला जातो, तो एका सुखप्राप्तीसाठीच. जगातील सर्व लोकांचे एकमेव ध्येय कोणते असेल, तर ते ‘सुखप्राप्ती’ हेच होय. असे अगदी ठळक अक्षरांनी लिहून दाखवता येईल.’ यःकश्चित् सौख्यहेतोः त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः ॥ – शतश्लोकी, श्लोक १५ अर्थ : या त्रैलोक्यात प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करत असतो, … Read more

अन्नरसांचा प्रकृतीवर उत्तम परिणाम होण्यासाठी नामजप करत जेवणे श्रेयस्कर !

‘अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात. आपणास इतर काही साध्य झाले नाही, तर जेवणास बसण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून नामस्मरण करत वायफळ न बोलता, वाईट न ऐकता, ध्यानातच मन ठेवून अथवा पवित्र अध्यात्म … Read more

व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग

१. ‘सर्वांचेच अधिकार सारखे नसतात. नियम हे सर्वसाधारण माणसांच्या धोरणाने आखलेले असतात. एकच नियम सर्वांना लागू पडत नाही. पूर्वार्जिताप्रमाणे स्वभाववैचित्र्य असते. उत्तम आचार जरी असला, तरी एक आचार सर्वांनाच लागू होत नाही. २. ‘न हि सर्वहितः कश्‍चित् आचारः सम्प्रवर्तते ।’ – महाभारत, पर्व १२, अध्याय २६६, श्‍लोक १७ अर्थ : सर्वांसाठी हितकर असेल, असा कोणताही … Read more

स्वतःतील उणिवा दूर केल्यामुळे होणारा आत्मसूर्याचा साक्षात्कार !

जो दुसर्‍याच्या उणिवा काढण्यात चांगल्या प्रकारे निपुण असतो, तसाच जर तो स्वतःतील उणिवा समजून घेऊन त्या काढण्यात निपुण झाला, तर तो मुक्त का होणार नाही ? ‘दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’. ‘स्वाज्ञान जानि नो विरला ।’ स्वतःचे दुर्गुण जागरूकतेने जाणून घेणे ! त्याने जर जागरूकतेने स्वतःमधील दुर्गुण जाणून घेतले आणि … Read more

नेहमी सत्संगात रहावे !

‘व्यवहारात ‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ।’ म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान आणि परधनाला मातीच्या ढेकळासमान मानावे.’ ही दृष्टी कधीच घालवू नये. ‘अति तेथे माती’ म्हणजे ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो.’ निसरड्यावर जपून चालावे. गृहस्थाला परस्त्री आणि परधन विष होय. याविषयी निःस्पृहांना दोन्हीकडचा ‘पर’ शब्द काढून ‘स्त्री आणि धन विष आहे’, असे सांगितले म्हणजे पुरे ! विषाची परीक्षा … Read more

आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी म्हणजे मोक्ष !

‘मीपणा’ची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून, स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव होत होत ‘मीपणा’ची जाणीव शेष राहिली, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. अशा स्थितीने दु:खाची जाणीव न होता, देह भावाचा अभाव होऊन, कुठलीही चिंता न रहाता, केवळ एका आनंदाचाच अनुभव शेष रहाणे म्हणजेच ‘जीवनमुक्ती’ होय, यालाच ‘कैवल्य’ किंवा ‘मोक्ष’ असेही म्हणतात. ही आत्मचिंतनाची … Read more