‘मीपणा’ची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून, स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव होत होत ‘मीपणा’ची जाणीव शेष राहिली, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. अशा स्थितीने दु:खाची जाणीव न होता, देह भावाचा अभाव होऊन, कुठलीही चिंता न रहाता, केवळ एका आनंदाचाच अनुभव शेष रहाणे म्हणजेच ‘जीवनमुक्ती’ होय, यालाच ‘कैवल्य’ किंवा ‘मोक्ष’ असेही म्हणतात. ही आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी होय. तेच आत्मज्ञानाने प्राप्त होणारे शेवटचे फळ होय.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : ‘श्रीधर संदेश’, डिसेंबर १९९८)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !