उत्तम शिष्याचे लक्ष्य (ध्येय) आणि लक्षण

१. लक्ष्य (ध्येय) : ‘श्री गुरूंच्या शिकवणीनुसार स्वतःला पूर्णत: गुरुचरणी (परमात्मास्वरूपात) समर्पित करणे, हे उत्तम शिष्याचे ध्येय असते. २. लक्षण : गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’ – (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, (१३.१.२०२३)

महत्त्व तर भगवंतालाच आहे !

भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही सेवक । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही दास । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही साधक ।। – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

भाव, श्रद्धा आणि भक्ती

अ. ‘जेवढा वेळ ईश्वराची अनुभूती येते’, ती अवस्था म्हणजे ‘भाव.’ आ. ‘ईश्वर जे करेल, ते योग्यच आहे’, असे वाटणे, म्हणजे ‘श्रद्धा.’ इ. ‘ईश्वराने जे केले, ते योग्यच आहे’, असा विचार करणे, म्हणजे ‘भक्ती.’ – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

स्वभावदोष आणि अहं

अ. (वाईट) सवयी मोडण्यासाठी ईश्वरासमोर ध्येय ठरवून घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करणे. आ. स्वतःचे निरीक्षण जागृत असले पाहिजे, तरच स्वतःतील अहंचे पैलू आणि त्रुटी लक्षात येतात. इ. जो स्वतःच्या चुका सांगतो आणि मान्य करतो, तोच ईश्वराला आवडतो अन् ईश्वर त्याचे रक्षण करतो. ई. ‘आम्ही जे करत आहोत, ते स्वतःच्या शुद्धीसाठी आहे’, हे लक्षात घ्यावे. – … Read more

मनमोकळेपणाचे महत्त्व

अ. जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते. आ. ‘मन मोकळे करणे’, म्हणजे ईश्वराने सुचवलेले बोलणे आणि सांगणे होय. मन रिकामे (मोकळे) केल्यानंतरच ते शांत होते. मनमोकळेपणा, म्हणजे ‘आपल्याला जे सांगावेसे वाटत नाही’, तेच सांगायचे. इ. मनोबलासमवेत … Read more

मनाचे कार्य !

आपले मन हेच अनुसंधानाचे माध्यम आहे. मनच आपल्याला मायेमध्ये अडकवून ठेवते आणि मनच ईश्वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जाते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे