मंत्रांचे जसेच्या तसे ध्वनीमुद्रण करून त्यावर कोणत्याही इतर असात्त्विक नादाची प्रक्रिया न करणेच अधिक फलदायी आहे !

‘इको’ (Eco sound) नादामध्ये सात्त्विकता अल्प असते. बरेच जण मंत्रांचे ध्वनीमुद्रण करतात. मंत्रांच्या ध्वनीमुद्रणाचे संकलन करतांना त्या नादाला वेगवेगळे संगीत जोडले जाते किंवा ‘तो नाद घुमल्यासारखा वाटावा’, यासाठी त्याच्यावर संगणकीय प्रणालीद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामुळे मंत्रांतील मूळ नादातील सात्त्विकता अल्प होत जाते. मंत्रांच्या उच्चारामध्येच त्यांची सात्त्विकता दडलेली आहे. उच्चाराचा नादच जर संगणकीय विज्ञानाद्वारे नष्ट … Read more

कलियुगाला ‘संधिकाल’ का म्हटले आहे ?

कलियुगात १५ वर्षे खडतर साधना करणे, म्हणजे पूर्वीच्या युगांतील अनेक वर्षांची साधना करण्यासारखे आहे; कारण कलियुगात साधनेसाठी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळेच या युगात इतर युगांच्या तुलनेत देव लवकर प्रसन्न होतो; म्हणूनच कलियुगाला ‘संधिकाल’ म्हटले आहे. संधिकाल म्हणजे थोडी साधना आणि पुष्कळ पुण्य ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !

देवाप्रती असलेल्या भावामुळे साधकाला निर्णयक्षमता प्राप्त होते, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. दैवी प्रेरणा आणि शांत मन यांच्या साहाय्य्याने तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला परिस्थितीतून जलद पुढे जाता येते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !

साधकाला जीवनातील नकारात्मक आणि सकारात्मक, अशा दोन्ही प्रकारच्या प्रसंगांतून शिकावे लागते. ‘साधकजीवन’, म्हणजे परिस्थितीला गुरु मानून सतत तिच्याकडून शिष्याप्रमाणे काहीतरी शिकत रहाणे. असे केल्याने साधकाला प्रारब्धभोगाचे काहीच वाटत नाही. कालांतराने साधकाची साधना वाढली की, त्याचे भोग न्यून होऊन गुरुकृपेला आरंभ होतो. एकदा का गुरु जीवनात आले की, नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्हींतही उरतो, तो केवळ … Read more

खरा अभ्यास !

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने, देवाच्या संगतीने आणि संतांच्या आशीर्वादाने विविध विषयांचे केलेले चिंतन अन् मनन म्हणजेच खरा अभ्यास ! – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.

‘मायेत मनुष्य ‘स्व’मध्ये अडकतो, तेव्हा तो ‘सर्व मीच करत आहे’, असा विचार करतो आणि देव निर्विचार स्थितीत असतो. याउलट भक्त जेव्हा सर्वकाही देवावर सोडतो, तेव्हा भक्त निर्विचार अवस्थेत जातो आणि देव त्याचा विचार करतो किंवा त्याचे कार्य करतो. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

गुरुकृपेने कर्मसंपन्नता प्राप्त होणे

‘गुरूंचे सांगणे ऐकल्याने साधकाला देवाचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे तो पुण्यशील बनतो. पुण्यशीलता म्हणजेच साधकाच्या जीवनातील खरी धनसंपन्नता ! यामुळे साधकाचे कित्येक जन्मांचे कर्मदारिद्य्र नष्ट होऊन त्याला कर्मसंपन्नता येते, म्हणजेच त्याचे प्रत्येक कर्म फलद्रूप होते. गुरूंच्या सत्संगात राहूनही जो कोरडाच रहातो, तो खर्‍या अर्थाने कर्मदरिद्री म्हणायला हवा !’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

अध्यात्मातील प्रत्येक विचार देवापर्यंत नेतो.

मायेतील कोणताही विचार हा देवाण-घेवाण वाढवणाराच असतो; परंतु अध्यात्मातील प्रत्येक विचार हा देवापर्यंत नेणारा असतो, म्हणजेच देवाण-घेवाण संपवणारा असतो. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

प्रेमभावाचे महत्त्व

‘कार्यपद्धतीतील तत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वांना एकच कार्यपद्धत लागू करून त्यांच्याकडून सेवा करवून घेता येत नाही. साधकांना प्रेम दिल्यानेच ७० टक्के अडचणी सुटतात आणि साधकांना साधनेचा अन् सेवेचा आनंदही मिळतो.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ