जिज्ञासू

जिज्ञासूपणा असणे, म्हणजे आपल्यामध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती असणे. प्रत्येक गोष्टीतील नाविन्यता साधना करण्यात आपला उत्साह वाढवते. उत्साहामुळे नवनवीन शिकण्याची वृत्ती जागृत राहिल्याने आपला आनंदही टिकून रहातो. याच आनंदात ईश्वराची प्रसन्नता असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाचा गुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन करतांना कितीही संघर्ष झाला, तरीही त्याने तो सहन करणे आवश्यक !

‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. … Read more

आध्यात्मिक स्तराचे महत्त्व

१. ‘उच्च आध्यात्मिक स्तर असला की, रज-तम यांचा परिणाम होत नाही. याउलट उच्च आध्यात्मिक स्तरामुळे निर्माण झालेल्या चैतन्याचा रज-तम यांच्यावरच परिणाम होतो आणि रज-तम अल्प होतात. २. आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात. ३. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांच्या पुढे पोचली, म्हणजे जीव संतपदाला पोचला की, त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवच … Read more

काळानुसार ‘उत्तम कर्म’ हेच ‘उत्तम ध्यान’ असणे

‘काळानुसार ‘उत्तम कर्म’ करणे, हेच सध्याच्या घडीला ‘उत्तम ध्यान’ आहे. केवळ ध्यानाने प्रगती होत नाही; कारण ध्यान लागण्याएवढी सात्त्विकता आपल्यात नसते. ती उत्तम कर्म करून मिळवावी लागते. उत्तम आचरण, उत्तम विचार आणि देवाचे उत्तम अनुसंधान यांमुळे देह सात्त्विक होऊ लागतो. असा देहच ‘उत्तम ध्यान’ करू शकतो.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. … Read more

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढणे आणि याउलट संत कृती करून दाखवत असल्याने ते साधकांना अधिक प्रिय असणे

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढू शकतो. त्यामुळे बरेच प्रवचनकार, कीर्तनकार आणि सत्संग घेणारे यांच्यामध्ये अध्यात्म कृतीत न आणल्याने ज्ञानाचा तीव्र अहं निर्माण होतो. ते आयुष्यभर लोकांना ज्ञान सांगतात; पण स्वतः त्याला अनुसरून कृती करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य नसते. याउलट संतांचे असते. संत अल्प … Read more

‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

‘सत्ययुगात पृथ्वीवरील सर्वच लोक साधना करणारे असल्याने ते सात्त्विक होते. मृत्यूनंतर त्यांचे प्रेतही सात्त्विक असे. अशा साधना करणार्‍या आणि सोहम्भावातील जिवाला काशीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्नी दिल्यावर स्वतः शिव त्या जिवाच्या कानात ‘मुक्तीमंत्र’ सांगून त्याला मुक्ती देत असे. आता कलियुगात हा नियम लागू नाही; कारण आताचा मनुष्य सोहम्भावापासून पुष्कळ दूर आहे. देव न मानणार्‍या, देवाच्या कार्याला … Read more

साधना मनोभावे सांगण्याचे महत्त्व

नवीन लोकांना भेटून ‘त्यांना साधना सांगणे, आपले कार्य सांगणे’, हे आपले साधनेतील कर्म आहे. त्या लोकांनी साधना करणे, न करणे हे त्यांचे कर्म आहे; पण आपण साधना सांगण्याचे आपले कर्म मनोभावे पूर्ण केल्याने त्यांच्या चित्तावर आपण सांगितलेल्या साधनेच्या गोष्टींचा संस्कार होतो. आपले कार्य त्यांच्या चित्तावर कोरले जाते. पुढे कुठल्यातरी जन्मात त्या लोकांना आपल्या कार्याचे, साधनेचे … Read more

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो. देवाला ओळखण्यासाठी, तसेच त्याच्या अस्तित्वाची देह, मन आणि बुद्धी यांना जाणीव होण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. साधनेत शीघ्र आध्यात्मिक प्रगती … Read more

संत देवाचे सगुण रूप असल्याने ते सुंदर दिसतात !

संत देवाचे सगुण रूप असल्याने सुंदर दिसतात. त्यामुळे संत बाह्यतः कसेही दिसले, तरी ‘त्यांच्याकडे बघत रहावे’, असे वाटते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.४.२०२१)

ईश्वराचा सर्वाेच्च गुण प्रीती असल्याने ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात !

ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात. ईश्वराचा सर्वाेच्च गुण म्हणजे प्रीती ! पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती काळी असली, तरी ती सुंदर दिसते. विठ्ठलामध्ये सर्वांप्रती असलेल्या प्रीतीची एक प्रकारची आकर्षणशक्ती आहे. देवतांच्या मूर्ती बाह्यतः निर्जीव दिसल्या, तरी त्यांच्यात असलेल्या चैतन्यामुळे त्या सजीव आणि सुंदर दिसतात. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.४.२०२१)