सिद्ध, अवलिया, योगी आणि संत हे सतत निर्विचार स्थितीत असतात. त्यांना स्वतःचे असे काही विचार नसतात. ‘त्यांचे सर्वच ईश्वरेच्छेने चालू आहे’, याचे ज्ञान त्यांना झालेले असते. हे सिद्ध मायेच्या भौतिक जगात नसून दैवी जगात वावरत असतात. ते सतत ईश्वरी अनुसंधानात असतात. त्यांच्या मनाची निर्विचार स्थिती असल्याने त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक असते. ते बाह्यतः अतिसामान्य दिसत असले, तरी आतून ते असामान्य असतात. सिद्धांना ओळखणे कठीण असते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.