पालकांनो, मुलांच्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी त्यांना साधना शिकवा !

‘पालक त्यांच्या मुलांमध्ये कला-गुणांचा विकास व्हावा; म्हणून त्यांच्या आवडीनुसार संगीत, नृत्य यांसारख्या कलांचे शिक्षण देतात; परंतु फारच थोडे पालक मुलांच्या जन्माचे सार्थक व्हावे, या उद्देशाने त्यांना साधना शिकण्यास साहाय्य करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)

शिक्षणात माणुसकी शिकविण्याचे महत्त्व !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देव आणि भक्त यांच्या जोड्यांमध्ये ‘राम-हनुमान’ हे अधिक जवळचे वाटण्याचे कारण

‘माझ्या खोलीतील देवघरात राम पंचायतनाचे चित्र आहे. त्या चित्राकडे बघून ‘राम-हनुमान’, असे १० वेळा म्हटल्यावरच भावजागृती होऊन माझी छाती भरून आली. असा अनुभव देवघरातील अन्य देवतांच्या संदर्भात आला नाही. यातूनच ‘राम-हनुमान’ हे देव आणि भक्त म्हणून जास्त जवळचे वाटतात, हे लक्षात येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.८.२०२१)

म्हातारपणात स्वतःची मुले नाहीत, तर साधना हाच खरा आधार !

‘सध्याच्या काळात आई-वडील मुलांना वाढवतांना त्यांच्या मनात ‘मुले आपल्याला म्हातारपणी सांभाळतील’, असा सुप्त विचार कुठेतरी असतो. प्रत्यक्षात मुलगा मोठा झाला की, तो नोकरीसाठी दुसर्‍या गावी जातो आणि मुलगी सासरी जाते. शेवटी वय झालेल्या आई-वडिलांच्या मुलांच्या संदर्भातील आशा-आकांक्षांवर पाणी पडते. ही वस्तूस्थिती पहाता प्रश्न पडतो, ‘आई-वडील आपल्या आयुष्यातील उमेदीची ३० – ३५ वर्षे अशा खोट्या आशा-आकांक्षांसाठी … Read more

भगवंताचा भक्त होणे श्रेष्ठ !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकारणी आणि राष्ट्रप्रेमी यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांच्या सर्व कार्यांमागे एकमेव उद्देश असतो, ‘पुढच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येणे’, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा उद्देश असतो, ‘राष्ट्र आणि धर्म यांना सुस्थितीत आणणे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे सिद्ध करणारे व्यवहारातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत आणि पाकिस्तान !

‘भारत पाकिस्तानपेक्षा आकाराने अनेक पटींनी आणि लोकसंख्येने मोठा असूनही भारताला छोटा पाकिस्तान गेली ७४ वर्षे भारी ठरत आहे. याचे कारण म्हणजे तेथील नागरिकांची कुराण आणि अल्ला यांच्यावरील श्रद्धा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या आश्रमांची अद्वितीयता !

‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी जप खर्च होतो आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही ईश्वरप्राप्ती होत नाही !

‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही कारण त्याने जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी त्याचा जप खर्च झाला आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही त्याला ईश्वरप्राप्ती झाली नाही. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, … Read more

सनातन संस्था शिकवत असलेली समष्टी साधना ही काळानुसार आवश्यक साधना असणे

‘सध्या अनेक संत आणि संप्रदाय त्यांच्या भक्तांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी भजन, कीर्तन, नामजप, ध्यान यांसारख्या विविध साधना शिकवतात. यातून केवळ साधना करणार्‍या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. ती व्यष्टी साधना होते. सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर सर्व बाजूंनी आक्रमण होत असतांना ‘मी आणि माझी साधना’ या कोषात राहिलो, तर धर्म आणि राष्ट्र यांचा नाश होईल. … Read more