अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

खऱ्या मनुष्याचे लक्षण

‘परमात्म्याची कृपा श्रेष्ठ असून संसार मिथ्या आहे, हे कुणालाच आपोआप उमजत नाही. नुसत्या गप्पा येतील; पण आचरण मात्र त्यानुरूप होत नाही. जन्माला आलेल्यास मरण चुकत नाही, लक्ष्मी चंचल आहे, इंद्रियवशतेमुळे नाश ओढवतो’, या सगळ्या गोष्टी ठाऊक नाहीत, असा कुणीही नाही; पण मनातले विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे किती निघतील ? मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत … Read more

मोक्ष

‘अज्ञानरूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्वत्र परिपूर्ण असणे, यालाही मोक्ष म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, सप्टेंबर १९९९)

व्यष्टी साधनेचा पाया भक्कम हवा !

‘व्यष्टी साधना चांगली असेल, तर आपली क्षमता वाढते, सकारात्मकता निर्माण होते आणि समष्टी साधना करण्यासाठी ऊर्जा मिळते. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्‍या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

नश्ववर देह आणि आत्मा

‘या नश्‍वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचेही काही वाटत नसते. जसे ताप आलेल्या मनुष्याने कुपथ्य केल्यास ताप वाढतो, तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतोे. क्षयी मनुष्यास … Read more

संशोधनाच्या संदर्भात कुठे बालवाडीतील असल्याप्रमाणे पाश्चात्त्य संशोधक, तर कुठे सर्वज्ञ ऋषि !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

‘या सुकणार्‍या, नश्‍वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ? भ्रमात राहू नकोस, आपल्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन हो, खरोखरंच दुसरे काहीही नाही. जन्म-मरणाची वार्ता हे शेवटचे भाष्य आहे.’ – प.प. भगवान … Read more

चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

‘जे दृश्य आहे, ते विनाशी आणि जे अदृश्य असून चेतन स्वरूपी आहे, ते अविनाशी; पण विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, मार्च २००२)

दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, जून २००१)

दुस-यांना विचारून करण्याचे महत्त्व

‘श्रीगुरूंच्या आश्रमाचे किंवा संस्थेचे सर्व नियम न चुकता पाळले पाहिजेत. तसे न करता जर एखाद्याने नियमबाह्य (नियमाविरुद्ध) वर्तन केले आणि ते पाहून जर दुसराही तसेच वागला, तर त्यामुळे सर्वांचेच अहित होईल, तसेच संस्थेची शिस्त आणि सुव्यवस्था कोलमडून जाऊन त्यामुळे श्रीगुरुही अपकीर्त होतील. असे झाल्यास आपली प्रगती (आध्यात्मिक) होणार नाही. त्यामुळे श्रीगुरूंनी आपल्याच उद्धारासाठी स्थापलेली संस्था … Read more