जिज्ञासेमुळे तळमळ निर्माण होऊन आत्मज्ञान प्राप्त होण्यास साहाय्य होणे

‘एखाद्या गोष्टीची जिज्ञासा असली, तरच ती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्यातूनच तळमळ निर्माण होते. आत्मज्ञानासंदर्भात तळमळ असली, तरच साधकाकडून साधनेसाठी तीव्र प्रयत्न होतात आणि शेवटी त्याला आत्मज्ञान होते.’ – डॉ. आठवले (मार्गशीर्ष शुद्ध पक्ष ६, कलियुग वर्ष ५११४ (१८.१२.२०१२)

अध्यात्मात ‘बुद्धीप्रमाण’ हा शब्दच नसणे

‘मनाने मनन केले जाते. चित्ताने चिंतन केले जाते, तर बुद्धीने निर्णय घेतले जातात. अध्यात्मात शास्त्रप्रमाण हा शब्द आहे; पण प्रत्येकाची बुद्धी निराळी असल्याने ‘बुद्धीप्रमाण’ हा शब्दच नाही !’ अर्थ : बुद्धी निर्णय घ्यायचे कार्य करते. ‘बुद्धी’ हा शब्द ‘अहं’शी संबंधित असतो आणि ‘अहं’ हा आध्यात्मिक उन्नतीला घातक असल्याने त्याला अध्यात्मात शून्य टक्के महत्त्व आहे.’ – … Read more

अध्यात्माचा अभ्यास करण्यात शब्दांना असलेली मर्यादा

‘अध्यात्मात जास्तीतजास्त ५० टक्के एवढेच ज्ञान शब्दांत मिळू शकते. त्यापुढचे सर्व ज्ञान अनुभूतींनीच मिळते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. १. जिथे साखरेची गोडी शब्दांत सांगता येत नाही, ती अनुभवावीच लागते, तिथे चांगल्या आणि वाईट शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती इत्यादी आध्यात्मिक परिभाषेतील शब्दांचा अर्थ शब्दांत कसा सांगता येईल ? २. लांबी, रुंदी, उंचीआणि काळ … Read more

पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे अध्यात्म आहे म्हणजे काय ?

‘एखाद्याचे अक्षर सुंदर आहे, हे डोळ्यांना दिसते, ते मनाला आवडते. आवडण्याचे कारण ‘अक्षर सुंदर आहे’, हे बुद्धीला कळते. याउलट पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे गेलेल्यांना सूक्ष्मातील स्पंदने कळतात. त्यामुळे त्यांना संतांचे अक्षर चांगले नसले, त्यांनी वेड्यावाकड्या रेखाट्या ओढल्या, तरी त्यांत चैतन्य असल्याचे जाणवते; म्हणून ‘ते चांगले आहे’, असे ते म्हणतात.’ – डॉ. आठवले (२४.६.२००७)