मायेतील शिक्षण आणि साधना यांच्यातील भेद
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्य कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे या अयोग्य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्यास त्याला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होण्यास साहाय्य होते, उदा. एका साधकाच्या मनातील … Read more
पूर्वीच्या काळी हिंदू धर्माचरणी आणि धर्माभिमानी होते. त्यामुळे त्यांना ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.’, हे लागू होत होते. सध्याच्या काळात हिंदू धर्माचरण करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमानही नाही. त्यामुळे ‘येणार्या आपत्काळात तुमचे रक्षण होण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी साधना करा’, असे त्यांना … Read more
‘गोपींचे कृष्णावरील प्रेम त्याच्या देहावर (शारीरिक स्तरावरचे) नसून त्याच्या मनावर (आध्यात्मिक स्तरावरचे) होते. त्यामुळे त्या एकमेकींशी भांडत नसत. त्यांच्यात एकमेकींबद्दल प्रेमच होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.१.२०२२)
‘कर्मयोगात कृतीचा भाग अधिक असल्यामुळे तो शारीरिक स्तरावरील होतो. भक्ती ही मनाची अवस्था असल्यामुळे भक्तीयोग मानसिक स्तरावरील आहे, तर ‘ज्ञान’ हे बुद्धीशी संबंधित असल्यामुळे ज्ञानयोग बौद्धिक स्तरावरील होतो. त्यामुळे कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्या तुलनेत ज्ञानयोग हा आचरण्यास कठीण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)
‘साधना करतांना साधकाने साधनेच्या स्तरावरील कितीही कृती केल्या, तरी ज्या वेळी त्याला आत्म्याच्या खर्या स्वरूपाचे ज्ञान होते, तेच सर्वश्रेष्ठ असते. हे ज्ञान विविध विद्यांच्या माध्यमांतूनच होत असते. ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)
‘प्रत्येक मनुष्य प्रारब्ध भोगण्यासाठी जन्माला येत असतो. हे प्रारब्ध भोगण्यासाठीचे बळ केवळ कुलदेवतेचे दर्शन, तिचा नामजप करणे, कुलाचारांचे पालन यांसारख्या उपासनेमधून मिळत असते. यासाठी साधनेचा प्रारंभ कुलदेवतेच्या उपासनेपासूनच करावा. हा साधनेचा प्राथमिक नियम आहे, जो सर्वांसाठी सारखाच लागू पडतो. कुलदेवता ज्ञात नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’, असा तिचा नामजप करावा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले … Read more
‘एखाद्या देवतेचे विश्वव्यापी, सहस्रमुख, सहस्रहस्त यांसारखे व्यापक रूपाचे वर्णन वाचले की, तिच्या अशा रूपाची उपासना करावी, असे काही जणांना वाटते; परंतु यामध्ये लक्षात घेतले पाहिजे की, या रूपाची कल्पना करणे शक्य होत नाही. कल्पना केली, तरी त्या रूपाची शक्ती सहन करता येत नाही. त्यामुळे देवतांच्या अशा व्यापक स्तरावरील रूपाची उपासना करणे कठीण जाते. यासाठी देवतांची … Read more
‘नामजप हे तारक आणि मारक अशा दोन पद्धतींचे असतात. नामजप ऐकतांना भावजागृती होऊ लागल्यास तो तारक पद्धतीचा असतो आणि शक्ती जाणवू लागल्यास तो मारक पद्धतीचा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.९.२०२१)
‘व्यवहारात ‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ।’ म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान आणि परधनाला मातीच्या ढेकळासमान मानावे.’ ही दृष्टी कधीच घालवू नये. ‘अति तेथे माती’ म्हणजे ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो.’ निसरड्यावर जपून चालावे. गृहस्थाला परस्त्री आणि परधन विष होय. याविषयी निःस्पृहांना दोन्हीकडचा ‘पर’ शब्द काढून ‘स्त्री आणि धन विष आहे’, असे सांगितले म्हणजे पुरे ! विषाची परीक्षा … Read more