‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून आत्मानुसंधानात राहिल्यास देवाला अपेक्षित असे कार्य होईल !

‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्‍वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more

प्रायश्चित्ताने मन वळवले पाहिजे !

मन, आत्मा, इंद्रिये आणि वस्तू यांचे संतुलन अन् संयोग झाला, तर कार्य होते. योगः कर्मसु कौशलम् ।, म्हणजे समत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. मनाची शांतता आणि आत्म्याशी संतुलन होणे महत्त्वाचे. मन हे वृत्तीप्रमाणे बनते. त्यामुळे वृत्तीत पालट होणे महत्त्वाचे आहे. प्रायश्‍चित्ताने मन वळवले पाहिजे.

लोकहो, ‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते’, हे जाणा !

‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते; परंतु आपण बहिर्मुख होऊन आवरणाशी संबंध ठेवतो आणि ‘आवरणाद्वारे कार्य चालते’, अशी आपली भावना होते. त्यामुळे सामान्य जनतेची फसगत होत आहे. भौतिक सुखाच्या लालसेमुळे भौतिक सुखात रमणे, भौतिक सुखाची प्राप्ती करणे, यासाठीच सर्व वेळ घालवला जातो. विज्ञान आणि संशोधन हेसुद्धा याच विचारसरणीला पूरक झाले आहे. त्यामुळे … Read more

हिंदु राष्ट्रात असे राज्यकर्ते असतील !

‘अथर्ववेद कांड ७, सूक्त ९२, ऋचा १ मध्ये म्हटले आहे, ‘राष्ट्राचे रक्षण करणारा, राष्ट्र समर्थ करणारा, राष्ट्राला साधन संपन्न करणारा, गुप्त रूपाने साम-दाम-दंड-भेद उपायांद्वारे दुष्ट शक्तींचे निर्मूलन करणारा, अशा प्रकारे उत्तम शासन करणारा, गुणवान, ‘सर्वांना सुख मिळावे’, असा मनापासून विचार करून राज्य करणारा राजा असावा.’

अवतारी कार्यात धर्मग्लानी दूर करून सत्धर्म स्थापन करणे, हेच ध्येय असणे

धर्मग्लानी दूर करण्यासाठी अवतारी पुरुष जन्म घेतात. ते दृष्टांचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करतात. तेव्हा ते मायेतील संबंध बाजूला ठेवतात. जसे मामा असूनही कृष्णाने कंसाचा वध केला. कौरव-पांडव भाऊ असूनही कौरवांच्या दृष्ट वृत्तीमुळे पांडवांनी त्यांचा नाश केला. अगम्य कर्तृत्व त्या वेळी भारतात सर्वत्र मुसलमानी राज्य असूनही अगम्य क्षात्रतेज युक्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील पाच … Read more

कर्मनियंत्रणासाठी भगवंताशी सतत अनुसंधानित रहाण्याची आवश्यकता !

कर्म नियंत्रणात असेपर्यंत सुधारणा करणे शक्य असणे ‘एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील सत्य-असत्य आणि परिणाम जाणून कृत्य केले पाहिजे, उदा. अन्न घशातून आत जाण्यापूर्वी त्यावर आपले नियंत्रण पाहिजे. एकदा ते पोटात गेले की, त्यावरील आपले नियंत्रण संपते. बोलण्याचेसुद्धा असेच आहे. आपल्या मुखातून बोल निघेपर्यंत विचार करूनच बोलले पाहिजे. … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले हे सध्याच्या निधर्मी राजवट असलेल्या लोकशाहीतील अयोग्य कारभार उघड करत असून ही हिंदु राष्ट्र येण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची लक्षणे आहेत !

‘हे सर्व पहातांना वाटते की, जसे श्रीकृष्णाने पुतना आणि श्रीरामाने शूर्पणखा राक्षसींची खरी रूपे, म्हणजे मायावी रूपे उघड केली, तसे परात्पर गुरु डॉ. आठवले हे सध्याच्या निधर्मी राजवट असलेल्या लोकशाहीतील अयोग्य कारभार उघड करत आहेत. ही हिंदु राष्ट्र येण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची लक्षणे आहेत.’

आजच्या काळात ‘मोह’ आणि ‘लोभ’ यांनी अंध झालेल्या चोरांचे वाढत चाललेले माहात्म्य !

सर्वत्र चैतन्यच भरलेले असून तेच कार्य करते. सर्व सृष्टीच चैतन्याने भारित झालेली आहे. असे असतांना यामध्ये तुम्ही-आम्ही कुठून आलो ? एखाद्याने १० कोटी रुपये मिळवले आणि त्यातील १ लाख रुपये दान केले, तर त्याला दानशूर म्हणतात का ? यावरून आजच्या काळात ‘मोह’ आणि ‘लोभ’ यांनी अंध झालेल्या चोरांचे माहात्म्य वाढत असल्याचे दिसत आहे.