कलियुगातील आध्यात्मिक गुरू !

हे कलियुग आहे. हे दांभिकपणा आणि ढोंगीपणा यांचे युग आहे. आजच्या युगातले काही स्वामी जे शिकवितात, ते स्वतः ते आचरणात आणत असतीलच असे नाही. काही आध्यात्मिक गुरु लबाड असू शकतात. याचा असा अर्थ नाही की, आध्यात्मिक गुरु प्रामाणिक असूच शकत नाहीत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (वाङ्मय पत्रिका घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक ११)

दया म्हणजे दुसऱ्याच्या जीवनाचे मूल्य समजणे

आपल्या आतील परमात्म्याला पहाणे हे ज्ञान आहे. दुसऱ्यांमध्ये परमात्मा आहे हे न विसरणे, म्हणजे करुणा, दया. घराचा आश्रम किंवा आश्रमाचे घर होणे घरात राहूनही तुम्ही कोणाला उद्विग्न करत नसाल, तर तुमचे घर आश्रमच आहे. वाल्मीकींच्या आश्रमात जाऊनही तुमचे मन उद्विग्न होत असेल, तर तुम्ही वाल्मीकींना ओळखले नाही. – डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

पू. अप्पाकाका यांचे चिंतन !

निंदा-स्तुती दुसर्‍याचा स्वभाव आणि त्याची कर्मे यांची निंदा करू नये. जो सर्व भूतांमध्ये परमेश्‍वर पहातो, तो कोणाचीही निंदा करूच शकत नाही. जेथून आपल्याला अपाय, धोका होण्याचा संभव वाटतो, तेथे भगवत्भाव ठेवावा, म्हणजे अपाय, धोका घालवण्याचा तो उपाय होऊन जातो. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)

गुरु आणि ईश्‍वर

यांच्या संदर्भात बोलतांना बरेच जण पुढील ओळी सांगतात. गुरु थोर की देव थोर म्हणावा नमस्कार आधी कुणासी करावा । मनी चिंतिता सद्गुरु थोर वाटे तयाचे प्रसादे रघुनाथ भेटे ॥ (पाठभेद – गुरु थोर कि देव थोर म्हणावा नमस्कार आधी कोणा करावा । मना माझीया गुरु थोर वाटे जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ ) त्यांनी हे … Read more

तंत्रशास्त्राची वैशिष्टे

१. तंत्रशास्त्र शक्तीशी संबंधित आहे. त्याच्या पुढे भाव, चैतन्य, आनंद आणि शांती असे स्तर आहेत. २. तंत्रशास्त्राप्रमाणे कृती करतांना बहुदा स्थुलातील वस्तू लागतात, तर भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूतीसाठी स्थुलातील वस्तू लागत नाहीत. ३. व्यवहारातील अडचणी सोडवण्यासाठी तंत्रशास्त्र उपयुक्त आहे. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

स्वभावदोष आणि अहं यांच्या त्यागाचे महत्त्व

साधनेत केवळ तन, मन आणि धन यांचा त्याग पुरेसा नाही. अहंचा त्याग महत्त्वाचा असतो. अहंचा त्याग करणे अत्यंत कठीण असल्यामुळे सुरूवातीला तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास सांगितले जाते. त्यांचा त्याग केला, तरी मी त्याग केला, असा अहं रहातो. त्याचबरोबर काही स्वभावदोषही रहातात. यासाठी साधनेत तन, मन आणि धन यांच्या त्यागापेक्षा स्वभावदोष आणि अहं … Read more

नामजप लिहून खिशात ठेवा

प्रसारात असलेल्या साधकांना बर्‍याचदा नामजप करण्यास वेळ मिळत नाही. अशा वेळी त्यांनी नामजप लिहिलेला कागद खिशात आणि साधिकांनी पर्समध्ये ठेवावा. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)

देवघरातील प्रत्येक देवतेला निराळा नमस्कार करा !

घरी एखाद्याने पूजा केली की, घरातील इतर देवघरापुढे उभे राहून सर्व देवांना मिळून एक नमस्कार करतात. याऐवजी त्यांनी प्रत्येक देवतेच्या चित्राकडे किंवा मूर्तीकडे पाहून तिला तिचे नाव घेऊन नमस्कार केल्यास नमस्काराचा, साधनेचा अवधी थोडा वाढतो, तसेच त्यामुळे प्रत्येक देवतेबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागते. – डॉ. आठवले (२१.३.२०१४)

भाव असला, तरी अहंभाव असू शकतो !

हल्लीच एकजण भेटायला आले होते. त्यांच्या चेहर्‍यावर भाव दिसत होता आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रूही होते. ते बोलतांना त्यांची साधना, त्यांचे कार्य, त्यांना आलेल्या अनुभूती इत्यादींविषयी ते बोलायला लागल्यावर त्यांच्यात अहं असल्याचे जाणवले. नंतर हे लक्षात आले की, एखाद्यात भाव असला, तरी अहंभावही असू शकतो ! हे आयुष्यात पाहिलेले पहिलेच उदाहरण आहे. – प.पू. डॉ. जयंत … Read more