बळी राजाची भक्ती

शुक्राचार्यांनी बळीला सांगितले, ‘हा वामन नाही, श्रीविष्णु आहे’. तेव्हा बळी राजा म्हणाला, ‘धन्य गुरुमहाराज’. गुरु त्यालाच म्हणतात, जो भगवंताचे दर्शन करवतो. देहाला मलीनता येण्याची कारणे १. नेत्र : परनारीला पहाणे. (उपाय : तिला पर नारी म्हणून नाही, तर देवी, आई किंवा बहीण म्हणून पहा.) २. कान : परनिंदा ऐकणे ३. जीभ : दुसऱ्यांचे दोष सांगणे … Read more

गोष्टीरूप अध्यात्म

सर्वजण कोणत्या ना कोणत्या चक्रात पडतात; पण जे चक्रधारीच्या (श्रीकृष्णाच्या) चक्रात पडतात, ते संसारचक्रातून वाचतात. हिंसेपोटी भीती : सिंह हत्तीला मारतो, तरीही तो वनात जातांना मला कोण मारणार तर नाही ना, या भीतीने मागे-पुढे पहात जातो. सिंहाला कोण मारणार ? पण सिंह हिंसा करत असल्याने त्याला भीती वाटते. ज्ञानाचा दिवा आणि संयमाचा आरोध (ब्रेक) नसेल, … Read more

आवश्यक त्या मार्गानुसार उन्नतांंनी साधना सांगणे

एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले ‘महाराज, मुक्ती मिळवण्यासाठी वनात जायला हवे का ?’ साधू म्हणाला, ‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनकराजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्याच वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. … Read more

संतांचे महत्व!

रोग बरा करणार्‍या आधुनिक वैद्यांपेक्षा भवरोगातून, जन्म-मृत्यूतून मुक्त करणारे संत महत्त्वाचे ! – डॉ. आठवले (११.५.२०१४)

खरी समाजसेवा, म्हणजे समाजाला साधना शिकवणे !

काही जण समाजसेवा करतात. आत्मकेंद्रित, स्वार्थी व्यक्तींपेक्षा समाजसेवा करणारे निश्‍चितच उच्च स्तराचे होत; कारण ते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाहीत. असे असले, तरी साधकांनी समाजसेवेत अडकू नये; कारण समाजसेवा करणे हेही सात्त्विक मायेत येते. साधकांना याच्याही, म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जायचे असल्याने त्यांनी समाजासाठी काही करावे, असे वाटत असले, तर समाजाला साधना शिकवावी. त्याच्याकडून साधना करवून … Read more

विज्ञानाची किंमत शून्य आहे !

ज्या विज्ञानाला ईश्‍वर म्हणजे काय ?, याची तोंडओळखही नाही, ते कधी ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवू शकेल का ? नाही. त्यामुळेच विज्ञानाची किंमत शून्य आहे ! – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष १३/१४, कलियुग वर्ष ५११५ (२१.७.२०१३))

शब्दज्ञान नव्हे, तर सूक्ष्मज्ञान असणे अध्यात्मात महत्त्वाचे असणे !

‘एखाद्याला शब्दज्ञान किती आहे, याला अध्यात्मात किंमत नाही. टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद व शांती या गोष्टी ओळखता येणे व त्या स्वतःत असणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे. आपल्यापेक्षा २ टप्पे पुढच्या अवस्था ओळखता येतात; म्हणून शक्तीपातळीवाल्यांना भाव व चैतन्य असलेले ओळखता येतात; पण आनंद व शांती या स्थितींतील संत ओळखता येत नाहीत. पुढे … Read more

देव हवा असेल, तर साधनाच करावी लागते !

आपल्याला व्यवहारातील काही हवे असेल, तर आपण प्रार्थना करतो. आपल्याला देव हवा असेल, तर प्रार्थना करून भागत नाही, तर साधनाच करावी लागते ! – डॉ. आठवले (७.५.२०१४)

ऋषींचे अध्यात्मिक महत्व!

ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ? – डॉ. आठवले (७.५.२०१४)

देवळे आणि व्यासपीठ येथे चपला न वापरण्याची कारणे

१. देऊळ आणि तीर्थक्षेत्र अशा चैतन्यमय जागी चपला वापरल्या, तर पावलांतून चैतन्य ग्रहण होत नाही. २. व्यासपीठ व्यासपिठाला व्यासपीठ म्हणतात; कारण त्यावर खरा अधिकार महर्षी व्यासांचाच आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।’ म्हणजे या जगातील अध्यात्मविषयक सर्व ज्ञान हे महर्षि व्यासांचे उच्छिष्ट (उष्टे) आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. आपण तेथे जातो, तेव्हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून … Read more