स्थळ जरी बदलले, तरी साधना तितक्याच निष्ठेने केली पाहिजे.

काळानुसार साधना करण्याच्या प्रक्रियेत फरक पडतो. वर्तमानात कधी व्यष्टी साधनेला महत्त्व येते, तर कधी समष्टी साधनेला महत्त्व येते. येथे अखंड अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. कधी कौटुंबिक जीवन जगत घरी राहून साधना करावी लागते, तर कधी कुटुंबियांच्या समवेत न रहाता आश्रमजीवन स्वीकारून समष्टी साधना करावी लागते. स्थळामध्ये जरी भेद झाला, तरीही साधनेच्या प्रक्रियेत भेद होता कामा नये. ती तितक्याच उत्कटतेने केली पाहिजे.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment