कर्म करतांना चूक झाल्यास क्षमायाचना करावी !

काही कारणामुळे आपल्या हातून कर्म करतांना चूक झाल्यास ईश्वराच्या चरणी क्षमायाचना करावी. नंतर ‘ते कर्म योग्य पद्धतीने करत आहे’, असा भाव ठेवावा. यामुळे चित्तावर योग्य कर्म करण्याचा संस्कार होतो. कर्म करतांना आपल्या समवेत असणार्‍या व्यक्तींचीही प्रत्यक्ष क्षमा मागावी. आपले कर्म साक्षात् ईश्वर पहात असतो. आपण असे केलेले ईश्वराला आवडते. आपण असे करत गेल्यास एक दिवस ईश्वर आपल्यावर प्रसन्न झाल्याविना रहाणार नाही.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment