कीर्तनकारांच्या कीर्तनाला आलेले साधनेला लागले, असे दिसून न येण्याचे कारण

बर्‍याच मंदिरांत आणि इतरत्र कीर्तनकारांची कीर्तने होतात; मात्र त्यांचा कीर्तनाला आलेल्यांवर परिणाम झाला आणि ते साधनेला लागले, असे आढळून येत नाही. याचे कारण हे की, बहुतेक कीर्तनकार जरी स्वतःला ह.भ.प., म्हणजे हरिभक्त परायण म्हणवत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यापैकी किती जण हरिभक्त परायण असतात ? भक्तीमुळे सर्वस्व सोडले, असे किती जण असतात ? फारच थोडे उलट … Read more

स्वेच्छेतून परेच्छेत जाता येण्यासाठी ईश्‍वरही परेच्छेने वागतो, हे लक्षात घ्या !

साधनेत स्वेच्छेतून परेच्छेत आणि परेच्छेतून ईश्‍वरेच्छेत जायचे असते. बर्‍याच साधकांना स्वेच्छेतून परेच्छेत जाणे कठीण जाते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ईश्‍वर सर्वत्र साक्षीभावाने पाहू शकत असतांनासुद्धा तो भक्ताची इच्छा पूर्ण करतो, म्हणजे परेच्छेने वागतो ! – प.पू. डॉ. आठवले

वैद्यकीय शिक्षण आणि अध्यात्म, म्हणजेच माया आणि अध्यात्म यांतील भेद !

१. वैद्यकीय शिक्षण शरीर सुदृढ रहावे, त्यासाठी मार्गदर्शन करते, तर अध्यात्म देहबुद्धीच नष्ट करते. २. वैद्यकीय शिक्षणातील मानसोपचारशास्त्र मन सुदृढ करायला शिकवते, तर अध्यात्म मनच नष्ट करायला, म्हणजे मनोलयच करायला शिकवते. – डॉ. आठवले

भक्ती नसल्याने देव हिंदूंना साहाय्य करत नसणे

काही जणांना वाटते, हिंदूंवर आणि हिंदु धर्मावर एवढे आघात होत असतांना देव साहाय्य का करत नाही ? याचे उत्तर हे की, भक्त प्रल्हाद,द्रौपदी, मीराबाई यांच्यासारखी भक्ती हल्लीच्या हिंदूंची नाही. भक्ती असली, तरच देव साहाय्य करतो. – डॉ. आठवले

साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करणे

साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करणे अपेक्षित असले, तरी ते क्षमतेप्रमाणे अपेक्षित असते. एखादा आजारी असल्यास त्याने तनाने, म्हणजे शरिराने सेवा करणे अपेक्षित नसते. एखाद्याकडे धन नसल्यास त्याने धनाचा त्याग करणे अपेक्षित नसते. मनाचा त्याग करणेही मनोरुग्णाला शक्य नसते. यामुळे तन, मन आणि धन यांपैकी ज्याचा जेवढा त्याग करणे शक्य असेल, तेवढे करत … Read more

जगद्गुरु कृष्ण

कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । म्हणजे जगद्गुरु कृष्णाला वंदन करतो. सर्व देवांत फक्त कृष्णालाच जगद्गुरु संबोधले आहे. याचे कारण हे की, त्याने कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग इत्यादी योगमार्ग शिकवलेले आहेत. – डॉ. आठवले (१८.७.२०१४)

खरा ज्ञानी

खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

स्वतःच्या आवडीचे नाम आणि गुरूंनी दिलेले नाम

भावार्थ : स्वतःच्या आवडीचे नाम घेतांना त्यात थोडा तरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव तर नसतोच; पण त्या नामात चैतन्य असल्याने प्रगती लवकर होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

जलद उन्नतीसाठी एकांतात राहून केलेल्या व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना उपयुक्त !

हिमालयात एकांतात राहून आयुष्यभर साधना केली, तरी साधकातील स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट झाले, याची खात्री देता येत नाही. असा साधक जेव्हा समाजात येतो, तेव्हा अनेक वर्षे प्रसंगच न घडल्याने निद्रिस्त असलेले त्याचे दोष बहुदा उफाळून येतात. याचाच अर्थ हा की, एकांतातील व्यष्टी साधनेत दोष लक्षात येत नाहीत. याउलट समष्टी साधनेत इतरांशी वारंवार संबंध येत असल्यामुळे … Read more

कुळाचाराचे पालन करा !

ईश्वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन मनाची एकाग्रता मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन