युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे

२५ वर्षे संमोहन उपचारतज्ञ म्हणून अनेक पती-पत्नींवर त्यांचे आपसात पटत नाही; म्हणून महिनोन्महिने उपाय केले, तरी त्यांचे फारसे जुळत नाही, हे लक्षात आले. याची दोन प्रमुख कारणे आहेत साधनेचा अभाव आणि कालमाहात्म्य. युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे युग पती-पत्नीचे एकमेकांशी पटण्याचे प्रमाण (टक्के) १. सत्ययुग १०० २. त्रेतायुग ७५ ३. द्वापरयुग ५० ४. कलियुग २५ ४ … Read more

असे संत हिंदूंपुढे आचारधर्माचा आदर्श काय ठेवणार ?

संत एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करत आहेत, असे बर्‍याचदा पहायला मिळते. विविध संप्रदायांच्या नियतकालिकांतही तसे दर्शविणारी छायाचित्रे असतात. पाश्‍चात्त्यांप्रमाणे फीत कापून उद्घाटन केल्यामुळे दर्शनार्थी हिंदूंवर आपण अयोग्य संस्कार करत आहोत, याचेही त्यांना भान नसते ! – (प.पू) डॉ. आठवले (२०.११.२०१४)

प.पू. डॉ. आठवले यांचा कर्मकांडांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे !

कर्मकांडानंतर उपासनाकांड येते. मी उपासनाकांडांतर्गत नामजपापासून साधनेला आरंभ केला. त्यामुळे मला यज्ञयागादीच नाही, तर साध्या पूजापाठाचीही ओढ नव्हती. असे असले, तरी विविध ठिकाणी होणार्‍या कर्मकांडांचे गेली १५ वर्षे ध्वनीचित्रीकरण करवून घेऊन मी ते संग्रही ठेवले आहे. त्याचा काय उपयोग हे मला ज्ञात नव्हते. २० ते २६ जून २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या तिसर्‍या अखिल भारतीय हिंदू … Read more

नामजप करतांना मन एकाग्र होण्यासाठी वापरावयाच्या पद्धती

" जप करतांना मन एकाग्र झाल्यासच त्याचा लाभ होतो. नामजप करतांना आरंभी मन एकाग्र होणे कठीण जाते; कारण पंचज्ञानेंद्रियांकडून मनाकडे येणार्‍या विविध संवेदना आणि चित्ताकडून मनामध्ये येणारे विविध विचार आणि भावना यांमुळे मन एकाग्र होत नाही. यावर मात करण्यासाठी पुढील उपाय करता येतात. टप्पा १ १ अ. पंचज्ञानेंद्रिये १. नाक : नामजपाच्या ठिकाणी दुर्गंध नसावा. … Read more

प्रकृतीनुसार आणि काळानुसार त्या त्या देवतेची उपासना करणे आवश्यक

गुरुप्राप्ती होईपर्यंत पुढील तत्त्वे लक्षात घेऊन त्यानुसार साधना केल्यास प्रगती लवकर होते. १. व्यष्टी साधना : प्राथमिक टप्प्याची साधना म्हणजे कुलदेवतेची उपासना आणि त्या त्या देवतेची तिच्या त्या त्या सणांच्या दिवशी, तसेच अमावास्या इत्यादी दिवशी करायची उपासना. पुढे गुरुप्राप्ती झाल्यावर गुरु सांगतील, ती उपासना करायची असते. २. समष्टी साधना : ही अधिकतर काळानुसार असते, उदा. … Read more

त्रासांसंदर्भात तज्ञांचा सल्ला आणि साधना

जीवनातील ८० टक्के त्रास प्रारब्धामुळे होतात. त्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक असे विविध प्रकारचे त्रास असतात. त्या त्या विषयातील तज्ञ त्यांना प्रारब्ध इत्यादी ज्ञात नसल्याने लक्षणांनुसार आणि वरवरच्या कारणांनुसार सल्ला देतात. त्यामुळे लाभ व्हायचे प्रमाण बरेच अल्प असते. याउलट साधना केली की, चिरंतन आनंदाच्या, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होते आणि आनुषंगिक लाभ म्हणून त्रासही दूर … Read more

खरी नाती !

संत आणि गुरु यांच्याशी असलेले नाते सगुणातील, तर ईश्‍वराशी असलेले नाते निर्गुणातील असते. ती खरी नाती होत. इतर सर्व नाती खोटी असतात. – प.पू. डॉ. आठवले (२७.६.२०१४) मुलांना खेळणी देऊन करमणूकप्रधान बनवणारे आधुनिक पालक मुलांवर नैतिक आणि धार्मिक संस्कार करण्यासाठी एकतरी प्रयत्न करतात का ? – प.पू. डॉ. आठवले (१८.२.२०१४) पुढे संत, गुरु, सद्गुरु, परात्पर … Read more

स्वतःच्या मृत्यूकडे ईश्‍वरेच्छा म्हणून पहाणारे प.पू. डॉक्टर !

ईश्‍वरेच्छा हा शब्द माझ्या मनावर एवढा बिंबला आहे की, ख्रिस्ताब्द २००५ या वर्षापासून आतापर्यंत कमीत कमी पाच वेेळा तरी मी मृत्यूच्या जवळ होतो. तेव्हाही मृत्यू टाळा, अशी संतांना प्रार्थना करावी, असे मला एकदाही वाटले नाही. – प.पू. डॉ. आठवले (२६.६.२०१४)

मानवाच्या देवावरील श्रद्धेपेक्षा माकडिणीच्या पिल्लाची तिच्यावर पूर्ण श्रद्धा असते !

माकडिणीच्या पिल्लाची तिच्यावर पूर्ण श्रद्धा असते; म्हणून माकडीण खूप उंचीवरून १०-१५ फूट अंतरावरील झाडांवरून, घरांवरून उड्या मारत जाते, तेव्हा तिच्या पोटाला घट्ट धरणार्‍या पिल्लाला भीती वाटत नाही. याउलट मानवाची देवावर श्रद्धा नसल्यामुळे तो देवाला घट्ट धरून ठेवत नाही. त्यामुळे तो देवाला सोडतो; म्हणून देव त्याला वर घेऊन जाऊ शकत नाही. – डॉ. आठवले (११.७.२०१४)

वेळ मिळेल तेव्हा कधीही नामजप करावा !

१५ ते २० वर्षांपूर्वी रात्री १२ ते ४ नामजप करू नये, असे सांगण्यात आले होते. त्यामागचे कारण होते, रात्री तमप्रधानता अधिक असल्याने, म्हणजेच तो काळ असुरांचा असल्याने त्या काळात नामजपावर लक्ष केंद्रीत करणे कठीण असते.   आता संपूर्ण दिवसच तमप्रधानता अधिक असल्याने, नामजपासाठी दिवस किंवा रात्र असा भेद उरलेला नाही; म्हणून वेळ मिळेल तेव्हा कधीही … Read more