‘आत्मा एकच आहे आणि केवळ त्याची रूपे भिन्न आहेत’, हे समजल्यावर द्वैत संपून ‘एकत्व साधणे’ शक्य होते !

‘देह जरी भिन्न असले, तरीही सर्वांठायी ‘ब्रह्म’ एकच आहे’, असे सांगून रेड्याच्या मुखातूनही वेद वदवणारे संत ज्ञानेश्वर म्हणतात की, ‘आत्मा हा एकच आहे. आपली वेगवेगळी देहाची रूपे त्यावर जरी असली, तरी आपल्यातील ईश्वराचे आत्मरूप एकच आहे.’ ‘सर्वत्र ब्रह्म’ या नात्याने सर्व समानच आहे. ईश्वरमय आहे.’ मग आपण तुलना करण्याचे कारण काय ? आणि कशाला तो … Read more

संत सहवासाचे महत्त्व आणि लाभ !

‘साधकाच्या आयुष्यात संतांचा सहवास महत्त्वाचा असतो. संत सहवासाने साधकामधील देवत्व वाढते. मनुष्याला बुद्धी असल्याने तो या सहवासाचा योग्य लाभ करून घेऊ शकतो. बर्‍याच वेळा त्याचा अहं त्याच्या प्रगतीच्या आड येतो. वस्तूंना मात्र भाव-भावना आणि अहं नसतो. वस्तू संतांच्या सहवासात लगेच भारित होतात आणि त्यांच्यात पालट होतांना आढळतो. संत सहवासाने साधकाचे मायेतील विचार न्यून होतात. साधकाच्या … Read more

साधनेतही मातेसारखा प्रेमभाव हवा !

साधनेतही ‘आई’च व्हावे लागते. सर्वांना आपलेसे करून त्यांच्याकडून साधना करून घ्यावी लागते. इतरांना सत्संग द्यावा लागतो, प्रसंगी त्यांना रागावून त्यांना योग्य-अयोग्य यांची जाणीव करून द्यावी लागते, तरच इतरांच्यात खर्‍या अर्थाने ईश्वराप्रती ओढ निर्माण व्हायला साहाय्य होते. यालाच प्रेमभाव असे म्हणतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘सद्गुरु’ पदाचे तत्त्वज्ञान

‘सद्गुरु’ म्हणजे एक आध्यात्मिक पद नसून त्या त्या वेळी त्या त्या स्थितीनुसार काळाला अनुसरून केलेला समष्टीच्या कल्याणाचा विचार आणि त्यानुसार केलेली कृती असते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

स्थळ जरी बदलले, तरी साधना तितक्याच निष्ठेने केली पाहिजे.

काळानुसार साधना करण्याच्या प्रक्रियेत फरक पडतो. वर्तमानात कधी व्यष्टी साधनेला महत्त्व येते, तर कधी समष्टी साधनेला महत्त्व येते. येथे अखंड अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. कधी कौटुंबिक जीवन जगत घरी राहून साधना करावी लागते, तर कधी कुटुंबियांच्या समवेत न रहाता आश्रमजीवन स्वीकारून समष्टी साधना करावी लागते. स्थळामध्ये जरी भेद झाला, तरीही साधनेच्या प्रक्रियेत भेद होता कामा … Read more

साधनेत परिस्थिती, काळ आणि समष्टीचा विचार करायला हवा !

‘काळाला धरून, समष्टीला अनुसरून आणि परिस्थितीनुरूप आपले विचार असायला हवेत. नेहमी एकाच सूत्रावर अडून चालत नाही. ‘परिस्थिती साधनेच्या दृष्टीने कशी हाताळायची ?’, हे लक्षात येत नसेल, तर उन्नतांना विचारून घ्यावे, नाहीतर संघर्ष करण्यातच आपली साधना वाया जाते. -– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘साधेपणा’ हीच आपली श्रीमंती !

‘आपला साधेपणा’ हीच आपली श्रीमंती आहे; कारण साधेपणात अहंकार नसल्याने त्यात देवपण असते आणि देवाला या जगात काय न्यून आहे ? – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

कर्म करतांना चूक झाल्यास क्षमायाचना करावी !

काही कारणामुळे आपल्या हातून कर्म करतांना चूक झाल्यास ईश्वराच्या चरणी क्षमायाचना करावी. नंतर ‘ते कर्म योग्य पद्धतीने करत आहे’, असा भाव ठेवावा. यामुळे चित्तावर योग्य कर्म करण्याचा संस्कार होतो. कर्म करतांना आपल्या समवेत असणार्‍या व्यक्तींचीही प्रत्यक्ष क्षमा मागावी. आपले कर्म साक्षात् ईश्वर पहात असतो. आपण असे केलेले ईश्वराला आवडते. आपण असे करत गेल्यास एक दिवस … Read more

स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा !

अ.स्वेच्छेप्रमाणे वागलो, तर अध्यात्मात एकाच पातळीला अडकून राहू. आ.परेच्छेने वागलो, तर दुसर्‍यांचे ऐकता ऐकता एवढे नम्र होऊन जाऊ की, यातून अहंच्या लयाचाही आनंद घेऊ शकू. इ.ईश्वरेच्छेने वागू लागलो, तर आपण देवाचेच झाल्याने आपोआपच विश्वव्यापक होऊन जाऊ. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अंतर्बाह्य एकरूपता म्हणजे देवाला सर्वत्र आणि सर्वांमध्ये पहाणे

आपल्या आतही देवाला पहावे, तसेच त्याच पद्धतीने बाहेरही देवाला पहावे. ‘देव आणि केवळ मी’, असे न पहाता देवाला सर्वत्र आणि सर्वांमध्ये पहावे. यालाच ‘अंतर्बाह्य एकरूपता येणे’, असे म्हणतात. अशा गोष्टींचा सराव केला की, आपोआपच मन आणि बुद्धी त्या त्या गोष्टीशी तादात्म्य पावू लागते आणि मग साधनेचा खरा आनंद मिळू लागतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल … Read more