गुरुकृपेने कर्मसंपन्नता प्राप्त होणे

‘गुरूंचे सांगणे ऐकल्याने साधकाला देवाचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे तो पुण्यशील बनतो. पुण्यशीलता म्हणजेच साधकाच्या जीवनातील खरी धनसंपन्नता ! यामुळे साधकाचे कित्येक जन्मांचे कर्मदारिद्य्र नष्ट होऊन त्याला कर्मसंपन्नता येते, म्हणजेच त्याचे प्रत्येक कर्म फलद्रूप होते. गुरूंच्या सत्संगात राहूनही जो कोरडाच रहातो, तो खर्‍या अर्थाने कर्मदरिद्री म्हणायला हवा !’

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment