दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचतांना ‘चैतन्यामुळे कार्य होत आहे’, असा भाव ठेवा !

‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन … Read more

ईश्वराने मनुष्याला बनवतांना रचलेली लीला !

ईश्‍वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्‍वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्‍वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्‍वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्‍वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्‍वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण … Read more

जागरण करून केलेल्या सेवेपेक्षा सकाळी लवकर उठून केलेली सेवा अधिक फलनिष्पत्तीदायी !

‘दिवसभर श्रम झाल्यामुळे निसर्गतःच रात्री शरीर थकते, तसेच मन आणि बुद्धी हेही थकतात. रात्री वातावरणातील वाईट शक्तींचा संचार अधिक असल्यामुळे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जागरण करून सेवा, विशेषतः बौद्धिक सेवा करतांना सेवेत सुचण्याचे प्रमाण आणि सेवेची गती अल्प होते अन् चुका होण्याची शक्यता वाढते. यामुळे सेवेची फलनिष्पत्ती घटते. जागरणाचे … Read more

अध्यात्मात वेडे व्हा !

अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’

आश्रमात रहाण्याचे महत्त्व

आश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्‍याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.

‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून आत्मानुसंधानात राहिल्यास देवाला अपेक्षित असे कार्य होईल !

‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्‍वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more

प्रार्थनेचा खरा लाभ म्हणजे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होणे !

आपल्या प्रारब्धात असेल, तेवढेच देव देतो. साधना न करता सकामातील नुसत्या प्रार्थना कितीही केल्या, तरी आपण मागतो, ते देव देत नाही. असे असतांना प्रार्थना करायची कशाला, तर प्रार्थनेमुळे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होते; म्हणून !

प्रश्‍न : भावाच्या पुढे कसे जायचे ?

भावाच्या पुढे अव्यक्त भाव असतो. गुरूंचे रूप समोर असतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून कार्य करणे, हा ‘व्यक्त भाव’. गुरूंचे रूप समोर नसतांनाही त्याची अनुभूती घेत कार्य करणे, म्हणजे ‘अव्यक्त भाव’. हाच भावाच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा मार्ग आहे.

प्रायश्चित्ताने मन वळवले पाहिजे !

मन, आत्मा, इंद्रिये आणि वस्तू यांचे संतुलन अन् संयोग झाला, तर कार्य होते. योगः कर्मसु कौशलम् ।, म्हणजे समत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. मनाची शांतता आणि आत्म्याशी संतुलन होणे महत्त्वाचे. मन हे वृत्तीप्रमाणे बनते. त्यामुळे वृत्तीत पालट होणे महत्त्वाचे आहे. प्रायश्‍चित्ताने मन वळवले पाहिजे.