संत कोणत्या नात्यांशी जोडलेले असतात ?
‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)
‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)
‘विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, तर अध्यात्माची भाषा संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा आहेत. यामुळे ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्यांनी संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषेतच अध्यात्म शिकावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)
‘पालक त्यांच्या मुलांमध्ये कला-गुणांचा विकास व्हावा; म्हणून त्यांच्या आवडीनुसार संगीत, नृत्य यांसारख्या कलांचे शिक्षण देतात; परंतु फारच थोडे पालक मुलांच्या जन्माचे सार्थक व्हावे, या उद्देशाने त्यांना साधना शिकण्यास साहाय्य करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)
‘माझ्या खोलीतील देवघरात राम पंचायतनाचे चित्र आहे. त्या चित्राकडे बघून ‘राम-हनुमान’, असे १० वेळा म्हटल्यावरच भावजागृती होऊन माझी छाती भरून आली. असा अनुभव देवघरातील अन्य देवतांच्या संदर्भात आला नाही. यातूनच ‘राम-हनुमान’ हे देव आणि भक्त म्हणून जास्त जवळचे वाटतात, हे लक्षात येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.८.२०२१)
‘सध्याच्या काळात आई-वडील मुलांना वाढवतांना त्यांच्या मनात ‘मुले आपल्याला म्हातारपणी सांभाळतील’, असा सुप्त विचार कुठेतरी असतो. प्रत्यक्षात मुलगा मोठा झाला की, तो नोकरीसाठी दुसर्या गावी जातो आणि मुलगी सासरी जाते. शेवटी वय झालेल्या आई-वडिलांच्या मुलांच्या संदर्भातील आशा-आकांक्षांवर पाणी पडते. ही वस्तूस्थिती पहाता प्रश्न पडतो, ‘आई-वडील आपल्या आयुष्यातील उमेदीची ३० – ३५ वर्षे अशा खोट्या आशा-आकांक्षांसाठी … Read more
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. चरणांना हा मान मिळत असल्याने हातांनी चरणांना विचारले, ‘सर्व जण तुझ्याच पाया का पडतात ?’ तेव्हा चरणांनी हातांना पुढील दोन प्रकारे समजावले. १. ‘मी भूमीवर असतो; म्हणून सर्व जण माझ्यावर डोके टेकवून नमस्कार करतात. त्यासाठी तुलाही भूमीवर यावे लागेल. भूमीवर यावे लागेल, म्हणजे अहं न्यून करावा लागेल. अहं … Read more
स्त्रियांमध्ये भाव असल्याने साधनेतील प्राथमिक टप्प्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची प्रगती लवकर होते. नंतर पुरुष लवकर संत होतांना दिसून येतात; कारण स्त्रियांपेक्षा पुरुष मायेत अल्प प्रमाणात अडकलेले असतात. स्त्रीला तिचा नवरा, मुले-बाळे, नातवंडे या सर्वांविषयीचे विचार मायेत अडकवतात. त्यामुळे तिचा अध्यात्मात पुढे जाण्याचा वेग काही ठराविक टप्प्यानंतर मंदावतो; म्हणून अध्यात्मात स्त्रिया संत होण्याची संख्या त्यामानाने अल्प असते. … Read more
‘आतापर्यंत जगत आलेले मायेतील आयुष्य संपवून, सर्वसंगपरित्याग करून अध्यात्माच्या मार्गाने जातांना सतत दुसर्यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच साधनेत प्रगती होते. दुसर्यांना आनंद देता देता आपल्याला गुरुकृपेने केव्हा ‘सत्-चित्-आनंदाची अनुभूती येऊ लागते’, ते कळतही नाही. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.४.२०२०)
‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही कारण त्याने जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी त्याचा जप खर्च झाला आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही त्याला ईश्वरप्राप्ती झाली नाही. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, … Read more