तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केल्याने ते बलहीन होणे आणि त्यामुळे त्यांची स्थिती केविलवाणी होणे

मुसलमानांमध्ये धर्माविषयी बुद्धीभेद करणारे बुद्धीप्रामाण्यवादी नसल्याने त्यांच्यात एकजूट आहे आणि त्यामुळे ते आज सर्व जगाला भारी पडत आहेत. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केल्याने हिंदू साधनेपासून दूर गेले आणि त्यामुळे ते बलहीन झाले. – (प.पू.) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची फलनिष्पत्ती शून्य असण्याचे कारण

एखाद्या विषयाचा त्या विषयाच्या पद्धतीनुसार अभ्यास केला नसला, तर त्याविषयी ठामपणे माझेच म्हणणे बरोबर आहे, असे कोणी म्हटले, तर ते कोणी गांभीर्याने घेत नाही. तीच स्थिती बुद्धीप्रामाण्यवाद्यांची असते. अध्यात्माचा अभ्यास, म्हणजे साधना न करता ते त्यासंदर्भात बोलत रहातात; म्हणून त्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची फलनिष्पत्ती शून्य असते ! – (प.पू.) डॉ. आठवले

हस्तसामुद्रिकांना भोंदू म्हणणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, बुद्धीने एवढे तरी समजून घ्या !

मनाचा शरिरावर आणि शरिराचा मनावर परिणाम होतो; म्हणूनच मनाच्या काळजीने आम्लपित्त, रक्तदाब इत्यादी शारीरिक विकार होतात आणि शारीरिक विकारामुळे मनाला निराशा येणे इत्यादी विकार होतात. मनाचा शरिरावर परिणाम होत असल्यामुळे परिणाम होणार्‍या इतर अवयवांप्रमाणे हात आणि पाय यांच्यावरही परिणाम होऊन त्यांवरील रेषांतही पालट होतात. ते पालट केवळ या जन्मातील घटनांच्या संदर्भातील नसून जन्मोजन्मी तेच मन … Read more

कलियुगातील ऋषीमुनी !

प.पू. रामानंद महाराज प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. अण्णा कर्वे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी एखादा राजा अत्याचार करायला लागला, तर ऋषीमुनी त्यांचे तपःसामर्थ्य वापरून त्याला धडा शिकवायचे. कलियुगाच्या सध्याच्या काळात प.पू. रामानंद महाराज, इंदूर यांनी ११.३.२०१४ या दिवशी देहत्याग करीपर्यंत अनेक अनुष्ठाने केली. प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. अण्णा कर्वे, प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी इत्यादी संत अहोरात्र साधना आणि … Read more

हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ?

रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाची फुले आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना अधिक प्रमाणात लागतात. आंब्यांच्या झाडाचेही तसेच आहे, आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना जास्त आंबे लागतात. फुले-फळेही आश्रमाच्या दिेशेने जास्त प्रमाणात येतात, तर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ? – (प.पू.)डॉ. आठवले (५.४.२०१४) रामनाथी आश्रमात आल्यावर तीर्थक्षेत्री गेल्याप्रमाणे लाभ होतो. … Read more

अध्यात्म समजायला विज्ञानाची भाषा उपयुक्त

पंचमहाभूतांनी जग बनले आहे, असे सांगितल्यावर काही जणांना वाटते, हे कसे शक्य आहे ? त्यांना हायड्रोजनचे दोन भाग आणि ऑक्सिजनचा एक भाग एकत्र आले की, पाणी (H2O) बनते, त्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या विविध प्रमाणांतील एकत्रिकरणामुळे जग बनते, असे सांगितले की, त्यांना ते पटते. यांमुळेच सनातनचे ग्रंथ वैज्ञानिक पद्धतीने लिहिले आहेत. – डॉ. आठवले (२७.५.२०१४)

एकत्र कुटुंबपद्धतीमुळे भारतामध्ये आपत्काळात केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मनोधैर्य ढासळणे, तर पाश्‍चात्त्य देशांत ३० ते ४० टक्के एवढ्या जणांचे मनोधैर्य ढासळणे

त्सुनामी झाली, तरी तामिळनाडूचा समुद्रकिनारा आणि अंदमान-निकोबार येथील उद्ध्वस्त कुटुंबे केवळ त्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे, तसेच नातेवाईक आणि जातभाई यांच्याकडून मिळालेल्या आश्‍वासक साहाय्यामुळे स्वतःला सावरू शकली. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये लातूर आणि ख्रिस्ताब्द २००० मध्ये भूज येथे झालेल्या भूकंपांत कुटुंब, तसेच नातेवाईक यांच्याशी असलेल्या संबंधामुळे लोक सावरू शकले. केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मानसिक स्थैर्य ढासळले. याउलट पाश्‍चात्त्य … Read more

अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू

भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्‍लोक ११) अर्जुनाला सांगितले, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । म्हणजे हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तिवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सिंहाने प्राणी किंवा माणसाला मारणे आणि मनुष्याने प्राणीहत्या करणे यांतील भेद

कोणत्याही कर्मामागील हेतू काय असेल, त्यानुसार फळ मिळते. सिंहाला ज्या वेळी भूक लागते, त्या वेळी तो प्राण्यांना मारून पोट भरतो. तो माणसालाही मारू शकतो. ही नैसर्गिक क्रिया असल्याने येथे पाप-पुण्याचा प्रश्न येत नाही. मनुष्य स्वतःला शिकारीचे आणि मांस खाण्याचे सुख मिळावे; म्हणून तो प्राण्यांची हत्या करतो. तसेच द्वेष, लोभ, मत्सर, सूड घेणे इत्यादींसाठी एक मनुष्य … Read more

अधिवक्त्याला त्याने शिकवलेल्या भाषेत उत्तर देणारे अशील !

एका अधिवक्त्याने खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी आपल्या अशिलाला सांगितले, ‘न्यायाधिशांनी काहीही विचारले, तरी तू बॅह ऽ बॅहऽऽ असेच म्हणायचे’. दाव्याचा निकाल देतांना न्यायाधिशांनी हा माणूस वेडा आहे, असे समजून त्याला शिक्षा केली नाही. दावा जिंकल्यावर अधिवक्त्याने त्याच्याजवळ शुल्क मागितले. तेव्हा त्यालाही त्याने बॅहऽ बॅहऽऽ, असेच उत्तर दिले ! हुशार राजा फ्रान्समधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात आलेला … Read more