टेबल-खुर्चीचे दुष्परिणाम

पूर्वी सर्वजण मांडी घालून बसून जेवण, लिखाण इत्यादी सर्व करायचे, आता बहुतेक सर्वच कृती टेबल-खुर्चीचा वापर करून केल्या जातात. त्यामुळे पाय गुडघ्यात पूर्णपणे वाकत नाही; म्हणून खाली मांडी घालून बसता येत नाही. पुढे शौचालयातही खाली बसता येत नाही. एवढेच नव्हे, तर कमोडवरही बसता येत नाही. हे त्रास होऊ नयेत म्हणून घरी जेवण, लिहिणे, वाचणे इत्यादींसाठी … Read more

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे सर्वनाशाकडे वाटचाल !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छा. जितके व्यक्तीस्वातंत्र्य अधिक तितका व्यक्तीचा अहंकार अधिक असतो आणि तितकी ती व्यक्ती प्रथम परेच्छा आणि नंतर ईश्‍वरेच्छा यांपासून अधिकाधिक दूर जाते आणि दुःखी होते. – डॉ. आठवले (४.४.२०१४)

बुद्धीप्रामाण्यवादी आणि पाश्‍चात्त्य

बुद्धीप्रामाण्यवादी आपल्याला ज्ञात आहे, तेवढेच ज्ञान समजतात आणि जिज्ञासा नसल्यामुळे इतर गोष्टी नाकारतात. याउलट पाश्‍चात्त्य जिज्ञासा असल्यामुळे पुढे शिकत जातात, नवीन शोध लावतात ! – डॉ. आठवले (२१.३.२०१४)

पहाण्यापेक्षा ऐकणे अधिक महत्त्वाचे !

पहाणे हे तेजतत्त्वाच्या स्तरावरील असते, तर ऐकणे हे आकाशतत्त्वाच्या स्तरावरील असते. त्यामुळे पहाण्यापेक्षा ऐकण्यात अधिक आनंद असतो. एखादी कलाकृती किंवा व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी तिच्याकडे अधिक काळ पहाता येत नाही. त्याचे आणखीन एक कारण म्हणजे तेथे विषय एकच रहातो. याउलट आकाशतत्त्वाच्या स्तरावर विविध विषयांवर बोलता येते; म्हणूनच चित्रे किंवा मूक चित्रपट यांच्यापेक्षा आकाशवाणी अधिक … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, बुद्धीची मर्यादा लक्षात घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी आयुष्यभर बुद्धीने मायेतील स्थूल गोष्टींचा शोध घेत रहातात, तरी त्यांना त्यासंदर्भात अतिशय अत्यल्प आणि तेही फक्त वर्तमान स्थितीतील कळते. त्यांना स्थूल गोष्टींतील चिरंतन तत्त्व कळत नाही. याचे कारण हे की, साधना नसल्यामुळे त्यांना विश्‍वबुद्धीचे साहाय्य होत नाही. त्यामुळे त्यांचे विचार आणि संशोधनही ५० – ६० वर्षांनी कोणाला ज्ञात नसते. याउलट अनादी वेद विश्‍वबुद्धीतून ग्रहण … Read more

खेडेगावात रहाणारे निरोगी आणि आनंदी लोक, तर शहरात रहाणारे व्याधीग्रस्त लोक !

शहरात रहाणारे लोक मायेच्या आधीन जीवन जगत असतात. बहुतेकजण या मायेच्या चक्रामध्ये देवाला विसरलेले असतात. अनेक सुखसुविधांमुळे त्यांच्या शरिराला कष्ट करायची सवय रहात नाही. तसेच प्रलोभने आणि स्वार्थ यांमुळे त्यांची वृत्ती संकुचित आणि प्रेमभाव नसलेली बनते. त्यामुळे त्यांच्या मनातील निर्मळता आणि आनंद लोप पावलेला असतो आणि त्यांचे मन तणावानेच ग्रस्त असते. तसेच शरिराला कष्टाची सवय … Read more

कोणता जयघोष कधी करावा ?

१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)

हल्लीच्या कुटुंबांची केविलवाणी स्थिती !

एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more

कधी साध्या गोष्टीही लक्षात न येणे

गेले ४ – ५ महिने मी तोंडाला अतिशय कोरड पडते, या त्रासासाठी डॉक्टर आणि वैद्य यांचे उपाय केले. तेव्हा लिमलेटच्या गोळ्या चघळायचो; पण फरक पडला नाही. कोरड पडते तेव्हा पाणी प्यायला हवे, हे लक्षात यायचे नाही. काल ते लक्षात आले आणि पाणी अधिक प्रमाणात प्यायला लागलो. तेव्हापासून तोंडाला कोरड पडणे कमी झाले. – डॉ. आठवले … Read more

विज्ञानामुळे दुष्परिणाम होण्याची प्रक्रिया

विज्ञानाने शोधून काढलेल्या यंत्रांमुळे दैनंदिन कार्य, प्रवास इत्यादींसाठी लागणारा बराच वेळ वाचला; मात्र त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे व्यसने, स्वैराचार इत्यादी गोष्टींत मानव वेळ घालवू लागला. त्यामुळे त्याची अधोगती अती वेगाने झाली आणि होत आहे. – डॉ. आठवले (१९.१.२०१४)