खाऊ देऊन मुलगा ऐकत नसेल, तर त्याला शिक्षा करावी लागते,…

खाऊ देऊन मुलगा ऐकत नसेल, तर त्याला शिक्षा करावी लागते, नाहीतर मूल डोक्यावर बसते. हेही ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले आणि अल्पसंख्यांकांचे सर्व तर्‍हेने लाड करणारे हिंदू आतंकवाद्यांविरुद्धचे युद्ध कधी जिंकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अडचणी दूर करण्याचे मूलभूत चार उपाय ज्ञात नसलेले हिंदू कधी जिंकतील का ?

१. साम (सामोपचाराने अडचण दूर करणे), २. दाम (पैसे देऊन अडचण दूर करणे), ३. दंड (शिक्षा करून अडचण दूर करणे) आणि ४. भेद (विरोधकांत फूट पाडून अडचण दूर करणे) हे अडचणी दूर करण्याचे चार उपाय आहेत. ते ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले हिंदू कधी जिंकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुटुंबात सर्वपुत्रसमभाव नसतांना राष्ट्रात मात्र सर्वधर्मसमभाव अशी घोषणा करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही !

कुटुंबातील ४ मुलांपैकी सगळ्यात सक्षम मुलाला वडील त्यांचा व्यवसाय चालवण्यास देतात. ते सर्वपुत्रसमभाव म्हणून इतर मुलांनाही चालवायला देत नाहीत. असे असतांना राष्ट्राचा कारभार मात्र सर्व राजकीय पक्ष आरक्षण ठेवून सर्वांच्या हातात देतात आणि सर्वधर्मसमभाव म्हणत केवळ अल्पसंख्यांकांना अधिक साहाय्य करतात; म्हणूनच देशाचे दिवाळे निघाले आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताच्या परमावधीच्या अधोगतीला रज-तमप्रधान राज्यकर्ते आणि प्रजा उत्तरदायी !

द्वापरयुगापर्यंत बहुसंख्य हिंदु राजे आणि प्रजा सत्त्वगुणप्रधान होती. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा असल्याने ते समर्थ होते. आता कलियुगातील बहुसंख्य हिंदु राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, तसेच प्रजाही रज-तमप्रधान असल्याने कोणीच व्यष्टी साधनाही करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा नसल्याने भारताची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंना स्वतःची काळजी घेता आली नाही; म्हणून ते मोगल आणि…

हिंदूंना स्वतःची काळजी घेता आली नाही; म्हणून ते मोगल आणि इंग्रज यांच्या पारतंत्र्यात हजार वर्षे राहिले. अशा हिंदूंच्या मतानुसार लोकशाहीत निवडून आलेल्यांनी स्वातंत्र्यापासून ६८ वर्षे भारतात राज्य करणे यांसारखी हास्यास्पद, तसेच भारत आणि हिंदु धर्म यांचा नाश करणारी दुसरी गोष्ट कोणती नसेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्राधान्य न कळणारे धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी !

लव्ह जिहाद, महिलांची असुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, जिहादींची आक्रमणे, गंगाप्रदूषण इत्यादी अनेक ज्वलंत प्रश्‍न देशापुढे उभे असतांना बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रियांनी शनीदेवाच्या चौथर्‍यावर चढणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी हे लक्षात ठेवावे !

काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खाजगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील मुख्य अडथळा म्हणजे हिंदु धर्माचे महत्त्व न समजलेले हिंदू !

मुसलमानांना इस्लाम धर्माचे आणि ख्रिस्तींना ख्रिस्ती धर्माचे महत्त्व ज्ञात असते. त्यामुळेच ते सर्व जग इस्लाम धर्माचे किंवा ख्रिस्ती धर्माचे करण्याचे शेकडो वर्षे अहर्निष प्रयत्न करत असतात. याउलट अतीशहाण्या, आंग्लाळलेल्या, बुद्धीप्रामाण्यवादी आणि स्वतःला सुधारक म्हणवणार्‍या हिंदूंनी हिंदु धर्माचा अभ्यास केलेला नसल्याने आणि थोडीफारही साधना केलेली नसल्यामुळे त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व समजत नाही. याउलट जगात कोठेही ईश्‍वरप्राप्तीची … Read more

हिंदु धर्म

युगानुयुगे जगात भारताला महत्त्व आहे, ते केवळ हिंदु धर्मामुळे आहे आणि त्यालाच नष्ट करायला निघाले आहेत बुद्धीप्रामाण्यवादी, विद्रोही आणि साम्यवादी ! पुढे त्यांच्या लक्षात येईल की, ते स्वतःच नष्ट होत आहेत आणि हिंदु धर्म अनंत काळ टिकणार आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक आणि राज्यकर्ते असल्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत !

या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले