भारताच्या परमावधीच्या अधोगतीला रज-तमप्रधान राज्यकर्ते आणि प्रजा उत्तरदायी !

द्वापरयुगापर्यंत बहुसंख्य हिंदु राजे आणि प्रजा सत्त्वगुणप्रधान होती. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा असल्याने ते समर्थ होते. आता कलियुगातील बहुसंख्य हिंदु राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, तसेच प्रजाही रज-तमप्रधान असल्याने कोणीच व्यष्टी साधनाही करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा नसल्याने भारताची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले