समष्टी साधना करतांना संचित आणि प्रारब्ध नष्ट कसे होते?

समष्टी साधना करतांना साधक जसजसा समाज, राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्याशी हळूहळू एकरूप होतो, तसतसा त्याचा अहं हळूहळू न्यून होत जातो. साधक समष्टीशी पूर्णपणे एकरूप झाला की, त्याचा अहं पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार, मीपणा संपला की, पाप-पुण्य, क्रियमाण, संचित, प्रारब्ध इत्यादी काहीच उरत नाही. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई.(२५.६.२०१३)

प्रल्हादाच्या भक्तीचा उगम त्याच्या जन्मापूर्वीच्या संस्कारांत असणे

१. एकदा हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी वनात गेला होता. तेव्हा बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन नारायण नारायण असे म्हणत त्याचा तपोभंग केला. हिरण्यकश्यपू रागावून घरी आला. पत्नी कयाधूने विचारले, पोपट काय म्हणत होता ? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. तिने पुनःपुन्हा तेच विचारले. तेव्हा हिरण्यकश्यपूचा १०८ वेळा नारायण नारायण असा जप झाला. त्या रात्री संभोग होऊन कयाधूला गर्भधारणा … Read more

अधिवक्त्याला त्याने शिकवलेल्या भाषेत उत्तर देणारे अशील !

एका अधिवक्त्याने खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी आपल्या अशिलाला सांगितले, ‘न्यायाधिशांनी काहीही विचारले, तरी तू बॅह ऽ बॅहऽऽ असेच म्हणायचे’. दाव्याचा निकाल देतांना न्यायाधिशांनी हा माणूस वेडा आहे, असे समजून त्याला शिक्षा केली नाही. दावा जिंकल्यावर अधिवक्त्याने त्याच्याजवळ शुल्क मागितले. तेव्हा त्यालाही त्याने बॅहऽ बॅहऽऽ, असेच उत्तर दिले ! हुशार राजा फ्रान्समधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात आलेला … Read more

व्यक्ती आणि देव यांवरील प्रेम

१. व्यक्तीवरील प्रेम : शारीरिक आकर्षण हा साध्या प्रेमाचा पाया असतो. प्रेयसीविषयीचे किंवा प्रियकराविषयीचे प्रेम हे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक उपजत बुद्धीपासून निर्माण होते आणि ते प्रत्येक जिवंत प्राण्यात आणि माणसात असते. १ अ. देवावरील प्रेम : देवाविषयी प्रेम केवळ माणसात असते. जे निर्माण करावे आणि वाढवावे लागते. २. व्यक्तीवरील प्रेम : पुरुषाचे स्त्रीविषयी आणि … Read more

दुःखे नष्ट करण्याचे अध्यात्म सोडून इतर उपाय निश्चितपणे परिणामकारक नसतात !

रोग औषधांनी बरे होऊ शकतात. वातावरण पालटण्याने मानसिक रोगांची तीव्रता अल्प होते. मंत्रांनी किंवा देवतांची पूजा केल्याने पिशाचांचे निवारण होऊ शकते; परंतु हे उपचार निश्चितपणे रोग किंवा दुःख निवारण करतीलच, अशी खात्री नसते. काही रोग असाध्य असतात. प्रारब्धामुळे होणारे रोग किंवा दुःखे उपाय करूनही नाहीसे करता येत नाहीत. सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तर सुखम् । – महाभारत, … Read more

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

बकऱ्यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. वाघीण गरोदर होती. उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. तिचे पिल्लू त्या बकऱ्यांच्या कळपात वाढू लागले. बकऱ्यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले. बकऱ्या ‘बें बें करीत. तसेच तेही ‘बें बें’ करू लागले. हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. एक दिवस त्या बकऱ्यांच्या कळपावर एका वाघाने … Read more

मनापासून विषयांचा त्याग केल्यासच प्रगती होणे

एकदा संत तुकारामांनी आपल्या पत्नीस बराच वैराग्यपर उपदेश केला आणि विषय कसे वाईट आहेत, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. उपदेश ऐकून तिच्या मनात वैराग्य आले. दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. घरात काही एक ठेवले नाही. दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून ती विचारात … Read more

गुरुपादुकांचे मूल्य प्राणापेक्षाही अधिक असणे

एका भक्ताला गुरूंचे दर्शन झाले नाही. दुसरा भक्त गुरूंना भेटला, तेव्हा गुरूंनी त्याच्या पुत्राच्या विवाहानिमित्त त्याला पादुका दिल्या. त्याने हे पहिल्या भक्ताला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘मला गुरूंच्या पादुका दे, मी तुला माझी जीवनभराची मिळकत देतो.’ दुसऱ्या भक्ताने त्याला पादुका दिल्या. पहिल्या भक्ताने पादुका हृदयाला लावल्या आणि तो नाचू लागला. गुरूंना हे समजल्यावर त्यांनी पहिल्या भक्ताला … Read more

रावण आणि रामनाम

सीता वश होत नाही; म्हणून रावण खूप अस्वस्थ झाला. त्याने कुंभकर्णाला उठवले. कुंभकर्ण रावणाला म्हणाला, ‘तू श्रीरामाचे रूप घे’. रावण म्हणाला, ‘श्रीरामाचे नाव घेतले, तरी सीता बहिणीसारखी वाटते. मग श्रीरामाचे रूप घेतले, तर मीच सीतामय होईन’. जाण्याची ठिकाणे अनेक, तर यायचे ठिकाण एकच ! श्रीकृष्ण नारदाला सांगतो, “तू वृंदावनात जा, वैकुंठाला जा, पाताळात जा. जाण्याची … Read more

प्रेम

अ. पालकांचे मुलाविषयीचे प्रेम सात्त्विक असते. त्यांच्यात स्वार्थ नसतो. मुलाची उत्पत्ती, स्वभाव, कर्तव्ये, धैर्य, बुद्धी, स्मरण, जाणीव इत्यादी चांगले राखणे हे माता-पिता यांना देवाचे वरदान आहे. आ. संत, साधू किंवा देव यांच्या कृपेनेच केवळ माणसाचे देवाविषयीचे प्रेम वृद्धींगत होते. इ. ज्या प्रमाणात लैंगिक इच्छा न्यून होतात, त्या प्रमाणात देवावरचे प्रेम भरपूर होते. जेव्हा लैंगिक इच्छा … Read more