संतांचा मायेकडे पहाण्याचा दृष्टीकोन !
तुम्ही ‘जीवन’ म्हणून आयुष्याकडे पहाता, तर संत ‘जीव-न’ म्हणजे ‘जीव नसलेली, माया नसलेली गोष्ट’ म्हणून आयुष्याकडे पहातात; म्हणून ते आनंदी असतात. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
तुम्ही ‘जीवन’ म्हणून आयुष्याकडे पहाता, तर संत ‘जीव-न’ म्हणजे ‘जीव नसलेली, माया नसलेली गोष्ट’ म्हणून आयुष्याकडे पहातात; म्हणून ते आनंदी असतात. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
प्रत्येक साधकाने वर्षाच्या शेवटी गुरुपौर्णिमेला मनाची घालमेल करून घेण्यापेक्षा, रोज रात्री स्वतःच्या साधनेचा आढावा घेतला पाहिजे. आपल्या साधनेतील उणिवा रोजच्या रोज दूर करून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे हाच खरा गुरुमंत्र आहे. असे रोजचे आत्मपरीक्षण केले, तरच ईश्वराच्या प्रगतीपुस्तकात आपली चांगल्या गुणांनी नोंद होईल. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
साधक, शिष्य, संत, गुरु आणि सद्गुरु हे सर्व जण मोक्षप्राप्तीच्या ध्येयातील आपल्याला शिकवणारे टप्पे आहेत. आपल्या साधनाप्रवासात ते विविध टप्प्यांना आपल्या संपर्कात येतात; पण आपले मुख्य ध्येय मात्र ईश्वरप्राप्तीच आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘आपल्या समवेत असलेला सहसाधक म्हणजे त्याच्याकडून शिकण्याची देवाने दिलेली एक संधी आहे’, असे समजावे. बर्याचदा तो साधकच आपला गुरु बनतो. त्याच्याकडून शिकण्यासारखे अनेक गुण देव आपल्याला लक्षात आणून देतो. आपण आपल्या सहसाधकाकडे त्याच भावाने पहावे. देवाने एखाद्या साधकाला आपल्या संपर्कात पाठवले आहे, तर प्रसंगी त्याच्या साधनेचे संपूर्ण दायित्वही आपल्याला घेता आले पाहिजे. ‘आपणच एकमेकांचे उत्तरदायी … Read more
साधकांनी सेवा करून उत्तरदायी साधकांचे मन जिंकायला हवे. उत्तरदायी साधकांनी पुन्हा सेवा देतांना म्हटले पाहिजे, ‘‘अरे, हा साधक ना ! पुष्कळ चांगली सेवा करतो. त्याने केलेली सेवा मला परत पहावी लागत नाही.’’ अशा प्रकारे उत्तरदायी साधकांनी आपल्याला १०० टक्के गुण देऊन सेवारूपी परीक्षेत उत्तीर्ण केले पाहिजे. सेवेतील फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी दुसर्या दिवसाच्या सेवेचे ध्येय आदल्या दिवशीच … Read more
‘साधकांनी एखादी कृती केली आणि अमूक इतके घंटे सेवा झाली, म्हणजे सेवा झाली’, असे होत नाही. हे काम झाले. तेव्हा साधक ‘मी साधना केली किंवा सेवा केली’, असे म्हणू शकत नाही. सेवा करण्याचा ध्यासच लागायला हवा. ‘एखादी कृती केल्यावर त्या माध्यमातून माझी साधना झाली का ?’, याचे सतत चिंतन करायला हवे. असे चिंतन करण्याची स्वतःला … Read more
प्रेमभावातून प्रीतीकडे आणि प्रीतीकडून थेट आत्मचिंतनापर्यंत जाता येते. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
गुरु नेहमीच एखाद्या प्रकृतीकडे पहातांना त्याच्या बाह्य वैगुण्याकडे पहात नाहीत, तर त्या व्यक्तीत असणार्या ईश्वरप्राप्तीच्या धडपडीकडे त्यांचे लक्ष असते. गुरूंचे त्या व्यक्तीविषयीचे बोल, हे नेहमी त्याच्या अंतर्मनात चालू असणार्या ईश्वरप्राप्तीच्या तळमळीला उद्देशून असतात. तेव्हा गुरूंच्या त्या व्यक्तीविषयींच्या बोलांचा अर्थ समजून घेतल्यास आपल्या मनात गुरूंविषयी विकल्प येत नाहीत. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
अनेक वेळा आपण ‘छायाचित्रे चांगली दिसावीत’, यासाठी त्यात पालट करत असतो. छायाचित्रांत पुष्कळ पालट केल्यास त्यांतील नैसर्गिकतेत पालट होईल आणि छायाचित्र कृत्रिम वाटू लागेल. छायाचित्रातील अनैसर्गिकतेमुळे त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
ईश्वरी ज्ञान ग्रहण करत असतांना प्रत्येक वेळी आपल्या ज्ञानात भर पडत असल्याने आपला आनंद द्विगुणित होत असतो. ज्ञानामुळे आपल्याला सेवा करतांना आनंद मिळतो. असे प्रत्येक गोष्टीचेच आहे. कुठलीही गोष्ट करतांना त्यामागील शास्त्र किंवा उद्देश समजून केली, तर कृती करण्यातील आनंद मिळण्याचे प्रमाण वाढते. कुठलीही गोष्ट समजून करावी. अंधतेने करू नये. अंधतेने केलेल्या गोष्टीतून ताणच निर्माण … Read more