अंतर्बाह्य एकरूपता म्हणजे देवाला सर्वत्र आणि सर्वांमध्ये पहाणे

आपल्या आतही देवाला पहावे, तसेच त्याच पद्धतीने बाहेरही देवाला पहावे. ‘देव आणि केवळ मी’, असे न पहाता देवाला सर्वत्र आणि सर्वांमध्ये पहावे. यालाच ‘अंतर्बाह्य एकरूपता येणे’, असे म्हणतात. अशा गोष्टींचा सराव केला की, आपोआपच मन आणि बुद्धी त्या त्या गोष्टीशी तादात्म्य पावू लागते आणि मग साधनेचा खरा आनंद मिळू लागतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल … Read more

सेवा परिपूर्ण होण्यासाठी देवाला प्रार्थना करावी !

भावावस्थेत कधी कधी आपण पुष्कळ काही एकाच वेळी करायला जातो. हा एक प्रकारचा उतावीळपणाच आहे. अशा वेळी देवाला प्रार्थना करावी, ‘देवा, या क्षणाला माझ्या आणि सेवेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे, तेच तू माझ्याकडून प्राधान्याने परिपूर्ण करून घे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !

‘आत्म्याचा रंग निळा आहे. अग्निचाही मूळ रंग निळा आहे. आत्मा ही एक ऊर्जा आहे. श्रीविष्णूचाही रंग निळा आहे. ब्रह्मांडाची स्थिती समतोल राखण्याचे कार्य महाविष्णु करतो. आत्मा जर अविनाशी आहे, तर त्यातील विष्णूतत्त्वाशी एकरूप होतांना आपल्यालाही आपल्या आत्मप्रकाशाशी अनुसंधान जोडावे लागेल. यासाठी आपल्याच अंतर्मनाशी आपल्याला एकरूप व्हावे लागेल. यासाठी आपल्याला तीव्र साधना करून स्वभावदोष आणि अहं … Read more

आधुनिक संगीताची शोकांतिका

आताचे आधुनिक संगीत म्हणजे माणूस हरवलेले संगीत आहे. ज्यात माणसासारखा जिवंतपणाच नाही, तेथे देव कुठून येणार ? श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

मन सतत सकारात्मक आणि आनंदी ठेवण्याचे महत्त्व

आपण आपल्या अडचणी एखाद्या व्यक्तीला जेव्हा मनमोकळेपणाने सांगतो, तेव्हा माणुसकीच्या नात्यानेही त्या व्यक्तीशी आपली जवळीक वाढते. त्या व्यक्तीकडून आपल्याला शिकायला मिळते. आपण शिकल्यावर आपल्या आनंदात वाढ होते. आपले मन सतत सकारात्मक आणि आनंदी राहिले, तर जीवनात साधूसंतांची कृपा प्राप्त करणे आणि ईश्वर मिळवणे सोपे जाते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

परमेश्वराला जिंकणे

अध्यात्मात ‘जिव्हाळा’ पुष्कळ महत्त्वाचा आहे. प्रत्येक जिवाला लळा लावणे, म्हणजे जिव्हाळा. जिव्हाळ्यातून प्रत्यक्ष परमेश्वरालाही जिंकता येते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

योग्यांची ‘ब्रह्मदृष्टी’

केवळ शाश्वताला पहाण्याच्या दृष्टीला ‘ब्रह्मदृष्टी’ म्हणतात. ती एकत्वात स्थिर झालेली असते. अशी दृष्टी योग्यांची असते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भावामुळे कर्मसिद्धांत लागू होत नाही

साधकामध्ये ‘भाव’ असला की, प्रत्येक जिवासाठी कार्यरत असणारा कर्मसिद्धांत त्याला लागू होत नाही; कारण भावामुळे कर्म ‘अकर्म’ होते; म्हणून ‘भाव’ महत्त्वाचा ! भाव हा कर्माला पुसण्याचा ‘खोडरबर’ आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

संतांचा मायेकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

तुम्ही ‘जीवन’ म्हणून आयुष्याकडे पहाता, तर संत ‘जीव-न’ म्हणजे ‘जीव नसलेली, माया नसलेली गोष्ट’ म्हणून आयुष्याकडे पहातात; म्हणून ते आनंदी असतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असणे महत्त्वाचे आहे !

प्रत्येक जण स्वतःच्या आध्यात्मिक पातळीचे अनुमान करू शकतो. ‘आपण या वर्षात किती मन लावून साधना केली ?’, हे सर्वांना तसे सहजच कळते. त्यामुळे आपणच आपले परीक्षक बनून आपल्या साधनेचा मागील वर्षाचा आढावा घ्यायला हवा. अगदी वर्षाच्या शेवटी, म्हणजे गुरुपौर्णिमा जवळ आली की, ‘आपली प्रगती झाली आहे कि नाही ?’, या विचाराने आपल्या मनाची घालमेल होते; … Read more