वैराग्य म्हणजे काय ?

सेवा करतांना व्यक्तीपेक्षा तत्त्व पहाणे, हेच वैराग्य होय. व्यक्तीनिष्ठता सोडून तत्त्वनिष्ठता जपणे, म्हणजे वैराग्य अंगी बाणवणे होय. प्रत्येक गोष्टीत देवाला पहाणे, हे खरे वैराग्य ! – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

सत्सेवेचे महत्त्व

अ. ‘सेवेतून चित्तावरील संस्कार लवकर अल्प होतात आणि मनही निर्विचार होते. त्यामुळे नामाच्याही पलीकडे जाणे लवकर शक्य होते. आ. साधना करतांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्यात वेळ दवडू नये. कृती करून अनुभवातून शिकून लवकर पुढे जावे. यामुळे बुद्धीचा अडथळा दूर होऊन अध्यात्मात लवकर प्रगती होते !’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ

आपल्या लक्षात आलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी इतरांना सांगितल्याने आपल्यातही पालट होतो !

‘एखादी गोष्ट मी करत नाही, तर ती दुसर्‍याला करायला कशी सांगू ?’, असा विचार करू नये. जेव्हा तुम्ही एखादी चांगली गोष्ट किंवा चूक लक्षात आल्यावर साहाय्य म्हणून दुसर्‍याला लगेच सांगता, तेव्हा तुमच्या सांगण्यातील तळमळीमुळे तुमच्यावरही तिचा परिणाम होतो.’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ

केवळ अभ्यासाने उत्कर्ष होत नाही, तर साधनेने खरा उत्कर्ष होतो !

‘साधनेने मनोलय आणि बुद्धीलय झाला की, ईश्‍वर आवश्यक ते देतो. त्यामुळे तेव्हा अनावश्यक वाचन करण्यात आपला वेळ जात नाही. जगात अनावश्यक वाचन करणारे अभ्यासक अनेक आहेत; परंतु साधना करून ईश्‍वरप्राप्ती करून घेणारे मोजकेच आहेत. केवळ अभ्यासाने उत्कर्ष होत नाही, तर साधनेने खरा उत्कर्ष होतो ! – पू (सौ.) अंजली गाडगीळ

मनात भावनिक विचार आल्यास सनातनच्या ग्रंथातील एखादे पान वाचा !

विचारांनीच विचारांशी युद्ध करावे. मनात भावनिक विचार आल्यावर लगेच सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या कोणत्याही ग्रंथाचे पान उघडून वाचावे. मनातील भावनेचे विचार नाहीसे होऊन मनात सतचे विचार येतील. – पू (सौ.) अंजली गाडगीळ

प्रारब्धावर मात केल्यावर देव लवकर भेटतो !

‘वर्तमान स्थितीला आपले प्रारब्ध समजून त्याला आनंदाने सामोरे जावे. प्रारब्धातच देवदर्शन करावे. जो प्रारब्धावर मात करतो, त्याला देव लवकर भेटतो !’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ

समष्टी मौन

‘अनावश्यक न बोलणे, म्हणजे खर्‍या अर्थाने समष्टी मौन !’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ

अनेकांतून एकात जाणे

‘अनेकांतून एकात जाणे’, या अध्यात्मातील सिद्धांताप्रमाणे अनेक विचारांपेक्षा देवाच्या नामजपाचा एकच विचार महत्त्वाचा आहे आणि तोच आपल्याला अद्वैतात नेतो.’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ

प्रतिदिन शिका आणि नदीच्या वहात्या पाण्यासारखी प्रगती करून एक दिवस मोक्ष नावाच्या सागरात जाऊन विलीन व्हा !

‘आपले आध्यात्मिक जीवन नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखे असले पाहिजे. पाणी वहात असतांना या प्रवाहाला वाटेत असंख्य दगडधोंडे, माती, झाडे अडथळे आणतात. अनेक गावांतून वहात वहात नदी पुढे पुढे जात असते आणि अगदी शेवटी कधी ना कधी ती समुद्राला जाऊन मिळतेच. येथेच तिचा प्रवास थांबतो. रोजच्या जीवनातही आपण असेच वहात राहिले पाहिजे. ‘नित्यनूतन सनातन’ या उक्तीप्रमाणे जीवनात … Read more

देवाचा नामजप सतत केल्यास देहातील देवत्व जागृत होऊन अध्यात्मात लवकर उन्नती होते !

मंत्रोपचारामुळे देवाच्या मूर्तीत लवकर सजीवपणा येतोे, म्हणजेच ती जागृत होते. अगदी याच पद्धतीने आपणही देवाचा नामजप सतत केल्यास आपल्या देहातीलही देवत्व लवकर जागृत होते, म्हणजेच आपली अध्यात्मात लवकर उन्नती होते ! – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ