ॐ’ कार स्थिती क्षणिक साधणे, म्हणजे साधना नाही. बर्याचदा काय होते की, ‘कुंडलिनी शक्ती जागृत झाली की, काही जणांचा ॐकार आतूनच चालू होतो.’ यामुळे देहातील तमोगुण न्यून होऊ लागतो; मात्र ही स्थिती कायम टिकेल, असे नसते. त्यासाठी नियमित स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे लागते. यामुळे जिवावरील अयोग्य संस्कार नष्ट होऊ लागतात आणि जिवाचे चित्त हळूहळू शुद्ध होऊ लागते. साधनेमध्ये तळमळीला अत्यंत महत्त्व आहे. ईश्वरप्राप्तीची तळमळ, गुरुसेवेची तळमळ, मोक्षप्राप्तीची तळमळ यांनी साधक झपाटून गेला पाहिजे. साधकाने जीवनामध्ये अखंड समष्टी सेवेचा ध्यास घेतला, तर त्याची लवकर प्रगती होते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
अहं आणि स्वभावदोषांवर मात, तरच होईल भवसागर पार !
आपत्काळात तरून जाण्यासाठी आतापासूनच ‘कोणत्याही परिस्थितीत देवाच्या अनुसंधानात कसे रहाता येईल ?’, हेच पहावे !
सद्गुरु शिष्याचा मनोलय आणि बुद्धीलय करून घेऊन त्याच्यावर पूर्णतः ‘ईश्वरी सत्ता’ प्रस्थापित करतात !
साधना सदा सर्वकाळच करावी !