काम करतांना क्षमता आणि नियोजन दोघांनाही महत्त्व असणे

‘एक काम पूर्ण करण्यासाठी समजा एक घंटा लागतो. एकाने ते काम एका घंट्यात केले, तर दुसर्‍याने ते काम इकडे तिकडे फिरून विलंबाने केले. यात दोघांमध्ये काय भेद आहे ? हे ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे असते. परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न खूप लवकर करत आहेत. बाकीच्यांना इतकी वर्षे झाली, तरीही अजून जमले नाही. यावरून दिसून … Read more

नामस्मरणाद्वारे मिळणाऱ्या शक्तीचे सामर्थ्य

१. आपण आपल्या इच्छाशक्तीद्वारे कार्य करत असतो. ती शक्ती अतिशय अल्प असल्याने कार्यासाठी आपल्याला समर्थ करत नाही. यासाठी भगवंताच्या अनुसंधानात राहून नामस्मरण केल्यास भगवंताच्या शक्तीद्वारे ते कार्य सहज सुलभ फलद्रूप होऊन आनंददायी होते. २. नामस्मरणाद्वारेच जिवातील शक्ती ईश्‍वरी शक्तीने भारीत होते. अशी ईश्‍वरी शक्तीच आपले कार्य यशस्वी करते. ३. नामस्मरणामुळे भगवंताशी कायम अनुसंधानात रहात असल्यामुळे … Read more

‘आसुरी प्रवृत्तींनी सनातनच्या साधकांना त्रास देणे’, हे सनातन संस्थेचे कार्य वृद्धींगत होत असल्याचे द्योतक !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने सनातनचे साधक ‘विश्‍वातील दुष्प्रवृत्तींचा नाश करून धर्मराज्य (ईश्‍वरी राज्य) स्थापन करणे आणि विश्‍वात शांती निर्माण करणे’, यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. सनातनच्या साधकांचे प्रयत्न आणि साधनेमुळे जागृत होणारे त्यांच्यातील चैतन्य यांमुळे समाजातील दुष्प्रवृत्तींना त्रास होत आहे. त्यामुळे आसुरी प्रवृत्ती सनातनच्या साधकांना त्रास देऊन ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्यांच्या … Read more

परात्पर गुरु डॉक्टर या भूमंडलाचेच शुद्धीकरण करत असणे

‘आपण थोड्या कालावधीपुरता विचार करतो; परंतु आपल्याशी संबंधित घटना संपूर्ण ब्रह्मांडात कुठे ना कुठे कार्यरत असतात. असे असतांना परात्पर गुरु डॉक्टर त्यातून ओढून साधकांची प्रगती करून घेत आहेत. ही त्यांची कृपा आहे. परात्पर गुरु डॉक्टर या भूमंडलाचेच शुद्धीकरण करत आहेत. आपण संकुचित विचारांत रहातो; पण परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ व्यापक विचार करतात. भूमंडलाचीच शुद्धी झाली … Read more

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

आपला अपराध मान्य करणे, ही विद्वत्ता आहे. एखादी गोष्ट चैतन्यविरहित झाली की, तिची अवनती (मूल्य अल्प) होते. भाजीतील चैतन्य गेलं की, तिला दुर्गंध येतो.’

माणूस आणि प्राणी यांच्यातील भेद आणि साधर्म्य

‘भगवंताने माणसाला विपुल धन दिले आहे, तशीच त्याने त्याला बुद्धीही दिली आहे. मनुष्याने भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी बुद्धीचा सदुपयोग करायला हवा; पण मानव बुद्धीचा दुरुपयोग करून स्वतःची हानी करून घेत आहे. हिरे-माणके गाढवासमोर ठेवले, तर तो काय करील ? त्याला त्याचे काय मूल्य असणार ? त्याला आपली उपजिविका करणे, एवढेच ज्ञान आहे. तसेच … Read more

आपला देह चैतन्याने भारित होण्यासाठी देवाचा नामजप करा !

‘भगवंत चैतन्यमय आहे. त्यामुळे देवाच्या नावातही, म्हणजे नामजपातही चैतन्य आहे. नामजप करतांना ‘प्रत्येक नामजपामुळे आपल्यामध्ये कण कण चैतन्य साठवले जात आहे’, असा भाव ठेवावा. तीच आपली खरी पुंजी आहे. प्रतिदिन आपली ही पुंजी व्यय (खर्च) होत असते. त्यामुळे आपल्याकडून अधिकाधिक नामजप व्हायला हवा. भ्रमणभाषचा विद्युतघट (बॅटरी) रिक्त झाला की, आपल्याला कळते आणि आपण त्याला भारित … Read more

तुलनेचीही आवश्यकता !

‘जागृतीसाठी तुलना आवश्यक आहे. तुलनेमुळे आपली स्थिती कळते. पशु-पक्ष्यांना केवळ भोग भोगायचे असतात. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, तर त्याचा लाभ करून घेतला पाहिजे. ‘आज आपण आश्रमात राहिलो नसतो, साधना केली नसती, तर आज आपली परिस्थिती काय झाली असती ? चाकरी केली असती, तरी त्यात किती धन मिळाले असते ? कसे राहिलो असतो ? आतापर्यंतच्या सहस्रो … Read more

अनुभूतीजन्य विचार मार्गदर्शक असणे

‘मनुष्याने विचार करू नये’, असे नसते; मात्र कोणत्या विचारांपासून काय लाभ होतो, हे पहायला पाहिजे. ‘कोणत्या विचारांनी उन्नती होते आणि कोणत्या विचारांनी अवनती होते ?’, हे पहायला हवे. विचार हा मार्गदर्शक आहे. तो वाटाड्या आहे. त्याला ज्ञानाने समर्थ करणे आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे अनुभूतीजन्य विचार. ते घेऊन पुढे चालणे आवश्यक आहे. रानटी लोकांना कोण मार्गदर्शक … Read more

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंता, तू किती रे करतोस ! तूच सर्वत्र कार्य करत आहेस’, अशी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत ठेवली की, अनिष्ट शक्ती रहात नाही. आपला अहं उघड करणे, हा मोठेपणा आहे. त्याने अहं अल्प होतो.’