‘आसुरी प्रवृत्तींनी सनातनच्या साधकांना त्रास देणे’, हे सनातन संस्थेचे कार्य वृद्धींगत होत असल्याचे द्योतक !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने सनातनचे साधक ‘विश्‍वातील दुष्प्रवृत्तींचा नाश करून धर्मराज्य (ईश्‍वरी राज्य) स्थापन करणे आणि विश्‍वात शांती निर्माण करणे’, यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. सनातनच्या साधकांचे प्रयत्न आणि साधनेमुळे जागृत होणारे त्यांच्यातील चैतन्य यांमुळे समाजातील दुष्प्रवृत्तींना त्रास होत आहे. त्यामुळे आसुरी प्रवृत्ती सनातनच्या साधकांना त्रास देऊन ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्यांच्या आश्रमात शिरून हत्या करू’, ‘साधिकांवर बलात्कार करू’, अशा धमक्या देत आहेत. ‘आसुरी प्रवृत्तींकडून असे प्रकार होणे’, हे सनातनचे कार्य गतीने वृद्धींगत होत असल्याचे द्योतक आहे.

सनातनच्या एका साधकात एवढे आध्यात्मिक सामर्थ्य आहे की, समाजातील एखाद्या व्यक्तीने केलेल्या कार्याच्या तुलनेत साधकाने केलेल्या कार्याचा एक लक्ष पटींनी परिणाम होतो. त्यामुळे सनातनच्या साधकांची संख्या नगण्य असूनही कार्य गतीने होत आहे. यावरून चैतन्याचे माहात्म्य लक्षात येते.’

Leave a Comment