साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

साधनेची खरी प्रक्रिया जाणून त्याप्रमाणे कृती करा ! ‘साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे भगवंताचा अंश आहे’, असे वाटले पाहिजे. चुका झाल्याने त्यांच्या आत्म्याला दु:ख होते. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्या हातून चुका होत रहाणार. भगवंताला, म्हणजे आत्म्याला सुख मिळावे; म्हणून आनंदी राहिले पाहिजे. हे आता सर्वांना समजले पाहिजे. आत्म्याला त्रास होऊ नये; … Read more

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

२१.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या संपादकीय लेखामध्ये एका व्यक्तीचे नाव चुकीचे लिहिले गेले. या प्रसंगाला अनुसरून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी चुका का होतात ?’ आणि प्रायश्‍चित्ताविषयी कसा दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे. श्रीरामाप्रमाणे प्रायश्‍चित्त घ्यायला हवे ! ‘सध्या साधक कितीही मोठी चूक झाली, तरी लहान-सहान प्रायश्‍चित घेतात. चित्तावर पुन्हा चूक … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपाय म्हणून देवतांची चित्रे कुंडलिनीचक्रांवर लावण्यासाठी सांगण्यामागील शास्त्र

कुंडलिनी शक्ती प्रथम सुप्त असते. साधनेद्वारे (गुरुकृपायोगाद्वारे) ती जागृत झाली, तरी ती सहस्रारचक्रापर्यंत वर जातांना मध्ये असलेल्या चक्रांतील अडथळ्यांमुळे तिची शक्ती आपल्याला उपभोगता येत नाही. ते अडथळे नाहीसे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला देवतांची चित्रे तिथे लावायला सांगितली आहेत. हे आपले केवढे भाग्य आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपाय म्हणून देवतांची चित्रे कुंडलिनीचक्रांवर लावण्यासाठी सांगण्यामागील शास्त्र

मूलाधार चक्रातील चैतन्यशक्ती कुंडलिनी जागृतीनंतर पुढे सुषुम्ना नाडीतील विविध चक्रांद्वारे सर्व इंद्रियांत जाऊन आनंद देते; परंतु त्या चक्रात वाईट शक्ती अडचण आणतात. त्यामुळे आपल्याला विविध स्वरूपाचा त्रास होतो. हा अडथळा दूर करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निरनिराळे उपाय सांगितले आहेत.

जे बोलल्याप्रमाणे वागत नाहीत, त्यांच्याशी शत्रूप्रमाणे वागावे !

‘कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे होते. अर्जुनाने आपल्यासमोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि कौरवांना पाहिले, तेव्हा त्याच्या मनात प्रश्‍न उपस्थित झाला की, माझे बांधव, पितामह आणि प्रत्यक्ष माझे गुरु यांना मी मारल्यास मला नरक मिळेल. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले, ‘‘अरे ! आता हे तुझे बांधव नाहीत. द्रोण हे गुरु नाहीत आणि भीष्म … Read more

साधकांनो, आनंद आपल्यातच आहे, हे जाणा !

‘आनंद’ हा प्रत्येक जिवाचा स्थायी भाव आहे. खरेतर जीव या आनंदालाच शोधत असतो; परंतु भ्रमामुळे त्याला आपल्यातच ‘आनंद’ आहे, हे ठाऊक नसते. त्यामुळे त्याची स्थिती कस्तुरी मृगाप्रमाणे होऊन तो विविध मार्गांनी आनंद प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत रहातो. त्याच्यातील स्वभावदोषांमुळे तो दुष्कृत्यांकडे वळतो. साधनेमुळे गुुरुप्राप्ती झाल्यावर ‘खरा आनंद कशात आहे’, हे कळायला लागते आणि जीव महानंदात राहू … Read more

भूमीत जीवतत्त्व आहे !

‘बिजातून झाड उगवते, याचा अर्थ त्यात प्राणशक्ती आहेच. भूमीत जीवतत्त्व असल्याने ते वाढते. १० प्रकारची झाडे असतील, तर भूमी १० प्रकारची वेगवेगळी पोषकद्रव्ये देते.याचा अर्थ भूमीत जीवतत्त्व आहे.’

कर्माच्या सहस्रो पटींनी भगवंताशी संलग्नता वाढवायला हवी !

अशक्य ते शक्य होते; मात्र ते त्या प्रमाणात पाहिजे. ज्या प्रमाणात कर्म असेल, त्याच्या सहस्रो पटींनी भगवंताशी संलग्नता वाढवायला पाहिजे. ‘एकदा नाम घेतले की, काम होऊन जाईल’, असे नसते. नाम कर्माच्या सहस्रो पटींत पाहिजे. नामाचा पुष्कळ साठा पाहिजे. तुमची अधिकोशात जितकी जमा अधिक, तितका तुम्हाला तिचा आधार वाटतो. असे असूनही अधिकोशात जमा असलेले पैसे ऐन … Read more

भगवंताच्या अनुसंधानात राहून केलेल्या कर्मावर भगवंताचे नियंत्रण रहाणे

कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हे केवळ भगवंताच्या हातात असते. भगवंताच्या अनुसंधानात राहिले की, भगवंत तिच्यावर नियंत्रण ठेवतो; कारण ते त्याचे नियोजन आहे. तो निर्माता आहे. तो अंतर्बाह्य दोन्ही ठिकाणी आहे. आपण अंतरंगात जाऊ शकत नाही; परंतु भगवंत अंतरस्थ असल्यामुळे तो नियंत्रण ठेवू शकतो. तो सर्वत्र असून प्रभावशील नियोजक असतो. त्याचे नामस्मरण, भजन, क्षमायाचना आणि शरणागती … Read more

हिंदु लोकहितार्थ अशा सूज्ञांनाच निवडून द्या !

‘धर्मांधांविषयी काही ‘खुट्ट’ घडले, तर सर्वत्र हाहाःकार माजतो. हा निधर्मीपणा का ? गोध्रामध्ये ज्या हिंदूंना जाळले, त्यांच्याविषयी कुणी वाच्यताही करत नाही. म्हणजे जे खरे आहे, त्याला दाबून टाकले जाते आणि जे खोटे आहे, त्याला उत्थान (प्रोत्साहन) दिले जाते. त्यांनी केलेल्या दुष्कर्मांची कुठे वाच्यताही नाही आणि हिंदूंनी काही केले नसतांना त्यांना वेठीस धरले जाते, ही आजची … Read more